शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २७

 अस्तित्व पटकथा भाग २७,


फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

इकडे अपघात झालेल्या गाडीवर दगड मारा होताच. जयेश व त्याचे मित्र गाडी तेथे टाकून पळाले. थोडे अंतर गेल्यावर सुरक्षित आहोत हे जाणल्यावर जयेशने आपल्या घरी फोन केला.

जयेश, “हॅलो , हॅलो.”

बाबा, “ बोल कोण जयेश, कुठे आहेस. असा घाबरल्यासारखा आवाज का येतोय तुला.”

 जयेश, “बाबा, गाडीचा अपघात झाला आहे. मी शहराबाहेर रिंग रोडला आहे.”

जयेशने घडलेली घटना सांगितली.

बाबा, “ हे बघ, थांब तिथे, आलो लगेच.”

थोड्या वेळात जयेशचे बाबा येतात. साधूंची पाहणी करुन त्यांना हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार करतात. ड्रायव्हरला इशारा करुन ती गाडी कुणाला कळायच्या आधी घेऊन जायला सांगतात. आणखी एका कर्मचाऱ्यास जयेशला शोधून घेऊन जायला सांगतात. कर्मचारी ती गाडी घेऊन निघतो. इतर साधूंच्या भोजनाची व्यवस्था करतात. कर्मचारी अरुणला फोन करुन 

बॉस, “ हॅलो अरुण.”

अरुण, “हा बोला सर.”

बॉस, “ अरुण गाडी थेट आपल्या गोडाऊन शेजारील सर्वेक्षण विभागात जाऊ दे.”

अरुण, “ जी सर, पण काच बदलायला हवी.”

बॉस, “ ते तिथेच करु, आपल्या ओळखीचे स्लाईडिंगवाले बोलावून, उगाच शंका नको.”

अरुण, “ जी सर.”

अरुण गाडी घेऊन थेट सर्वेक्षण विभागात जातो. ज्या ठिकाणी कंपनीचा मोठा सर्वेक्षण विभाग असतो.”

त्या ठिकाणी गाडी आतील बाजूस पार्क केली जाते. अरुणने तेथील विभाग कर्मचाऱ्यास तिची किल्ली दिली. तो त्यास म्हणाला, “ गाडी नंबर सिक्स.”

अरुण पार्किंग एरियात त्या दुसऱ्या सहा नंबरवाल्या गाडीची चावी घेऊन आला. व ती गाडी घेऊन निघून गेला.

…….. ……… ………

बॉसने पाठवलेली दुसरी गाडी वरुण घेऊन थोडं पुढे गेला. त्याने कॉल केला. रिंग वाजू लागली. जयेशने फोन उचलला. “ हा बोला.”

वरुण, “ जयेश बाबा कुठे आहेत. मी वरुण बोलतोय.”

जयेश, “ पुढे थोड्या अंतरावर रानात आंब्याखाली.”

वरुण, “मी आता वळणावर पुलाजवळ आहे. तुम्ही कोठे आहात?”

जयेश, “तिथून खाली पुढे जवळचं.”

 वरुण, “ मी लोकेशन पाठवतो. तिथे या.”

वरुण लोकेशन पाठवतो. जयेश आपल्या मित्रांना घेऊन त्या दिशेने जातो. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचले. वरुण गाडीचे दार उघडतो. ती गाडीत बसतात. दार लॉक होते. गाडी निघते. थोडे अंतर गेल्यावर वरुणला फोन येतो. वरुण गाडी चालवत फोन घेतो.

वरुण, “हॅलो सर, बोला.”

बॉस, “जयेश मिळाला का?”

 वरुण, “ हो.”

बॉस, “ त्यांना थेट फार्म हाऊसवर घेऊन जा.”

वरुण, “हा सर.”

ती चौघे भेदरलेल्या अवस्थेत होती. 

जयेश, “ काही घाबरण्यासारखं नाही ना. त्यातील एखादा साधू ..,”

वरुण, “ थोडे जखमी झालेत. बॉस पाहतील ते. तू निश्चित रहा.”

 जयेश, “ आपण कोठे चाललोय.”

वरुण, “ ते पोहोचल्यावर कळेलच.”

गाडी वेगाने फार्म हाऊस रोडला लागते.

…………… ……..

क्रमशः पुढे ........































































शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २६

अस्तित्व पटकथा भाग २६




अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

क्रमशः पुढे चालू 

 चार धाम यात्रेला गेलेली सदाशिवराव व लक्ष्मीबाई जगन्नाथपुरीला पोहोचली. त्यांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. व मुक्काम केलेल्या ठिकाणी आलीत. तिथे आल्यावर.

लक्ष्मीबाई, “ कशी असतील हो आपली मुलं, काय करत असतील. “

सदाशिवराव, “ असतील मजेत, आता काय ती लहान आहेत. थोडीच. कशाला उगाच काळजी करतेस.”

लक्ष्मीबाई, “तसं नाही हो. तुम्हाला त्या दोघींचे स्वभाव माहीत आहेत ना? उमाला पटवून घेणार नाहीत हो म्हणून.” 

सदाशिवराव, “ अलका आहे ना.”

लक्ष्मीबाई, “हो, पण ती आता किती दिवस, तिचंही लग्नाच बघायला हवं.”

सदाशिवराव, “ इथून गेल्यावर बघू, एखादं स्थळ, चला आता प्रसाद घेऊ व पुढील यात्रेस लागू.”

लक्ष्मीबाई, “हो चला, जय जगन्नाथ भगवान की.”

सदाशिवराव, “ जय,”

ती निघतात.

……. ……… …….

एका शहरात एका हॉटेल मध्ये एक पार्टी चालू आहे. तेथे तरुण व तरुणी जेवत आहेत. ती जयेश नावाच्या मुलास लांब नाईट पब मध्ये जाण्यासाठी कन्व्हेन्स करतात. तो आपली टू व्हीलर घेऊन निघतो. व आपल्या वडिलांच्या बिझनेस कंपनी ऑफिस मध्ये येतो. ऑफिस मध्ये हिरालाल पांचाल काम करत असतात. इतक्यात गाडी पार्क करुन जयेश आत आला.

जयेश, “ बाबा, चावी द्या.”

हिरालाल, “ नाही, मला हवी आहे. घरातील दुसरी घेऊन जा.”

जयेश, “ नको, मला हिच हवी आहे.”

तो इकडे तिकडे पाहतो. ऑफिस मधील टेबलावर त्याला किल्ली दिसते. तो ती चटकन घेतो. व निघतो. त्याचे वडील ओरडत असतात. पण त्यांकडे लक्ष न देता तो निघून पार्किंगमध्ये असलेली गाडी घेऊन जातो. हॉटेल बाहेर त्याचे मित्र उभे असतात. 

साहिल, “काय हे, किती उशीर यार.”

जयेश, “ काय करणार यार गाडी बाबा ऑफिसला घेऊन गेले होते. “

सुकन्या, “तुझ्या बाबांना सांगितलं नाहीस ना.”

जयेश, “ छे, नाही, चला बसा लवकर वेळ झालाय.”

त्याचे मित्र बसतात. तो वेगाने गाडी चालवतो. दूर शहरातील एका डिस्को पबमध्ये आवारात गाडी पोहोचली. गाडी थांबली. त्यातून ते आधीच झिंगलेल्या वेड्यावाकड्या अवस्थेत त्या पब मध्ये जातात.

 त्यातला एकजण, “ अरे यार, माझ्याकडे पैसे नाहीत.”

दुसरा, “चल यार, जयेश भरेल ना. तो असताना कशाला काळजी करतोस यार.”

 ती आतमध्ये गेली. जयेश एन्ट्री फी भरतो. व ती दारू पित सिगारेट ओढत धुंद होऊन नाचू लागलीत.”

थोड्याच वेळात जयेशचा फोन खणखणू लागला. त्याने फोन उचलला. व लगेच आपल्या मित्रांना इशारा केला. ते लागलीच पबच्या मागील बाजूने बाहेर पडले. जयेशने लगेच आपली गाडी पार्किंग मधून काढली. व वेगाने तो निघाला. त्याची गाडी बाहेर पडताच वेगाने निघाला. त्याची गाडी निघताच. एक पोलिस व्हॅन वेगाने तिथे दाखल झाली. दुसरी गाडी जयेशच्या गाडीच्या मागे लागली. त्या गाडीस चकवा देऊन तो खूप दूर गेला. नगराबाहेर गेला. सकाळ होऊ लागली. एक साधूंचा जथ्था वाटेने चालला होता. त्याने जथ्थ्यामध्ये गाडी घुसवणार इतक्यात ब्रेक मारला. तरी देखील काही साधूंना ठोकर बसल्याने जखमी झाले. त्यातील एका साधूने चिडून एक दगड फेकून मारला. व त्यांना सर्वांनी बेदम चोप दिला. गाडीचा हॉर्न एकसारखा वाजू लागला.

……. ……. …….. …… 

सूर्यगावातील एका घरात एक स्त्री आजारी आहे. ती खाटेवर झोपलेली होती. तिची मुलगी रानात आई आजारी असल्याने वांगी तोडण्यास गेली होती. तेव्हा गावातील एक गावगुंड राकेश तिथे आला. त्याने तिची छेड काढली. व तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती ओरडू लागली. त्याचवेळी मल्हारी आवाज ऐकून तिथे गेला. व त्यास खूप बदडले. व पिटाळून लावले. तो जाताना मल्हारीस तुला पाहून घेतो. सोडणार नाही. अशी धमकी देऊन गेला. 

…….. ……. ……..

क्रमशः पुढे ........

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २५

 अस्तित्व पटकथा भाग २५


अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,


क्रमशः पुढे चालू.......

घरात आणलेली केळी मल्हारीने ठेवल्याचे अवंतिका व वासविला दिसले. उमा व मल्हारी रूममध्ये असताना वासावी व अवंतिका त्या घडातील दोन दोन केळी घेऊन परस बागेत गेल्या. विहिरीच्या ओट्या शेजारी बसून खात असताना येसाजीस समजले. 

येसाजी, “वाव, केळी , आम्हाला पण हवी.”

वसावे, “ जरा कुठे खाऊ लागलो की लगेच आले हावरट पणा करायला.”

कार्तिक, “तोंड आवर वासवी मोठ बारकं काही आहे की नाही.”

वसाव , “ आहे की, आम्ही काय तुझ्यासारखे नाही. दुसऱ्याच्या हातात दिसेल ते मागायला.”

कार्तिक, “ बरं सांग, ही केळी कुठून आणली ते?”

अवंतिका, “ घरात आहेत, काका काकूंच्या पलंगाखाली.”

तानाजी, “ काय?”

वासवी, “खरंच, मी तिथूनच आणलीत.”

येसाजी, “ चला रे, जाऊन बघूया आत.”

ती पळत घरात जातात. ती गेल्यावर.

वासवी, “ कशाला सांगितलस पलंगाखाली घड आहे ते, आता संपवतील ते.”

 अवंतिका,” हं.., याना सापडतात. केळी उशीर झाला लपवून ठेवलीत.”

 वासवी, “ते पण खरं आहे. पण तू काका व काकूंकडे का लावुन दिलेस.”

 अवंतिका, “अगं, काकांनी काही केळी त्यांच्या रूममध्ये नेली होती.”

 वासवी, “चल आपण देखिल जाऊन बघू आपल्याला आणखी एखादं मिळालं तर.”

त्या देखील गेल्या. मुले मल्हारीच्या खोलीत वाकून पाहतात. तो व उमा यांना केळी खाताना पाहून.

येसाजी, “काका , शोभत का हे.”

मल्हारी, “ काय झालं.”

येसाजी, “ अस लहान मुलांपासून चोरुन लपवून केळी खाता.”

मल्हारी, “ शोभतं की.”

तानाजी, “ तुम्ही आम्हाला विसरला की काय?”

मल्हारी, “हो.”

 कार्तिक, “ अस चोरुन केळी खाणे बरे नाही. आम्हाला पण केळी हवीत.”

 उमा, “ही घ्या.”

मल्हारी, “ नाही द्यायची. तू खा.”

 तानाजी, “ काकीचा गुलामच झालास की, तुझ्यासारख्या पहिलवानाला हे शोभत नाही.”

मल्हारी, “वा रे वा, सकाळी रगडून जेवला तुम्ही, व काकीला उपाशी ठेवला. तेव्हा कुठे होता?”

कार्तिक, “ काय काकी उपाशी आहे?”

मल्हारी, “ हो, म्हणूनच मी केळी आणलीत .“

जवळ जात.

तानाजी, “ काय ग, तू जेवली नाहीस.”

 उमा, “ जेवले की आताच, खाल्ली की केळी. घ्या ही.”

येसाजी, “खरंच घेऊ?”

उमा, “ हो.”

तरी पण ती दचकतात. व त्यातील दोन दोन केळी घेऊन बाहेर खेळायला जातात.

…………. ………. ……….

थोड्या वेळाने मल्हारी रूममधून बाहेर आला. त्याला पाहून पार्वती व सरस्वतीचे तोंड पडलेले होते. त्याचवेळी अवंतिका व वासवी तिथे येते. मुलांचा दंगा ऐकून अलका जागी झाली. व खालील खोलीत आली.

अवंतिका व वासविला कळले होते की त्यांच्या आया काय कारनामे करतात. त्याचवेळी पार्वती त्यांना म्हणाली, “वासवी, पाहिलंस का कशी केळी चोरुन खाल्ली जाताहेत ते.”

वासवी, “ माहिती आहेत. की मला.”

पार्वती, “ आता तरी कळलं का? आपलं कोण आणि परक कोण ते.”

वासवी, “ हो कळलं, की” 

पार्वती, “ काय कळलं .”

वासवी, “ कळलं की तू कशी जेवण लपवून ठेवतेस. काकीला कशी उपाशी ठेवतेस. एवढा पराक्रम तू करुन देखील तुझ्या मुलीला दोन केळी का असेना खायला दिलीत. तुझ्यात व त्यांच्यात खूप फरक आहे.”

सरस्वती, “गप्प ग, नालायक कुठली. मोठ्या माणसांना असं उलट बोलतात का?”

वासवी, “ कळत की? पण तुलाही कळयलं हवं काकीला उपाशी ठेवून आपण तुपाशी राहणं बरं नव्हे. “

पार्वती, “ देवळात नेलेला नेवैद्य खाल्ला ना तिने.”

अवंतिका, “कुणी सांगितलं तुला, की नैवेद्य तिने खाल्ला म्हणून, आम्ही तो रस्त्याकडेच्या भुकेलेल्या भिकाऱ्याला दिला.”

 अलका, “बरं तो खाल्ला असेल वा नसेल. तुला वाहिनी नको तो उद्योग करायला सांगितला कुणी.”

त्या गप्प बसल्या.

……… …… ……….

पावसाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पावसाने त्रस्त झालेली भटकी कुत्री निवारा शोधत गावाबाहेरील जुन्या घाटमार्गातून जाणाऱ्या रस्त्याने निघाली होती. त्या वाटेत एक गुहा होती. त्या गुहेत प्राचीन काळापासून अनेक पांथस्थ विसावा घेत असत. पावसाळा व हिवाळा ऋतूत अनेक प्राणी निवाऱ्यासाठी तिथे थांबत. रात्रीच्या वेळी एका सशाची शिकार करुन काही कुत्री त्या गुहेत भांडत शिरलीत. त्यांच्या भांडणात गुहेतील काही दगड बाहेर गुहेच्या तोंडाशी येऊन पडले. थोड्या वेळाने त्यांचे भांडण त्या सशाच्या फडशा पाडल्याने संपले. तो ससा मटकावून थोड्या वेळाने ती कुत्री निघून गेली.

थोड्या दिवसांनी त्या वाटेवरून एक साधूंचा जथ्था नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निघाला होता. कोकण विभागातून जंगलपट्टा पार करुन ते घाटभागातील सूर्यगावी आली होती. व त्या गुहेत थांबली. तिथे भजन , कीर्तन, भोजन करुन त्यांनी विश्रांती घेतली. व दुसऱ्या दिवशी ते निघाले. जाताना त्यातील एका साधूने त्या गुहेतील कुत्र्यांच्या पायाने आलेल्या दगडातील एक दगड मोह निर्माण झाल्याने उचलून आपल्या झोळीत टाकला. व तो जथ्था निघाला. त्यातून मार्गस्थ झाला.

……… ………….





















































शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २४

 अस्तित्व पटकथा भाग २४



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ........

उमाने वाटेने जाताना अलका व मुलींना सांगितले घरी गेल्यावर यातील काही सांगू नका .

मुलीनी सुद्धा मान हलवून होकार दिला. 

अलका, “ त्यांना काय एवढं सांगायचं. त्या काय मालकीण आहेत.”

वासवी, “ विचारलं तर खूप भूक लागली म्हणून आम्ही खाल्ला. असे सांगू त्यात काय?”

घरात आल्यावर वासवी नैवेद्याचे ताट घेऊन जेवण खोलीत गेली. ताट रिकामे पाहून 

पार्वती, “ काय ग, नैवेद्य कुठे हाय? तू खाल्लास.”

वासवी, “ नाही.”

पार्वती, “ मग अवंतिका किंवा अलकाने.”

वासवी, “ नाही.”

पार्वती, “ मग कुणी खाल्ला.”

वसव, “ देवाने खाल्ला, तुला कशाला हवे. वाढ आम्हाला जेवायला.”

पार्वती, “ काकी वाढेल की तुझी.”

वसव, “ ती गोठ्यात वैरण टाकायला गेलीय. तुम्ही दोघी खूप काम करता ना .”

पार्वती, “ खूप बोलतेस , त्या अलका व उमाच्या नादाने बिघडत चाललीस.”

वासवी, “ तिच्याच संगतीत राहिले तर सुधारू आम्ही. तुमच्या संगतीत राहिलो तर बिघडू.”

पार्वती, “लई बोलतेस, देऊ का एक.”

वासवी वेडावण दाखवते. तेव्हा पार्वती तिचे गाल पीचते. व कान पिळंगळते. इतक्यात बाहेरून अलका व अवंतिका आत येतात. वासवीचा कान पिळंगळताना पाहून .

अलका, “अगं, वाहिनी हे काय करतेस, कान दुखेल ना तिचा.”

पार्वती, “ दुखला तर दुखु देत, जीभ लई चरा चरा बोलतेय तिची. “

ती पुढे होते व कान सोडवते.

अलका, “वासावे मोठ्यानं उलट बोलू नये.”

वासवी, “ स्वारी आत्या.”

अलका, “चल जेवायला.”

 अवंतिका, “ पण काकी बाहेर थांबलेय.”

अलका, “ तिचं थोडं काम आहे. ती जेवेल नंतर. आपण चल जेऊन घेऊ.”

अलका, “वाहिनी वाढ जेवायला.”

पार्वती त्या तिघींना जेवायला वाढते. त्या जेवतात. व विसावा घेण्यासाठी वरील गच्चीवर जातात. त्या गेल्यावर पार्वतीने जेवण लपवून ठेवले. व भांडी घासायला ठेवली. 

बाहेरील काम आटोपून उमा आत आली. ती स्वयंपाक खोलीत गेली. तिने भांडी पाहिली. ती रिकामी होती. 

उमा, ( पार्वतीस) “ ताई, जेवण.”

पार्वती, “ संपल.”

 उमा, “ मी तर जेवलेच नाही. संपेल कसं.”

पार्वती, “ मला वाटलं, देवळात प्रसादाचे ताट जेवली असशील. म्हणून मी उरलेल गाईला दिलं.”

उमा काय समजायचे ते समजली. तिनं थोडं गुळ पाणी घेतलं. व बाहेर आली. पुन्हा चूल पेटवून काहीतरी बनवायचे म्हंटल्यास वेळ होणार. तेव्हा ती बाहेर बागेत आली. व झाडांना मोहर आलेला होता. ओळखीच्या झाडांची पाने तिने तोडली. ती पाण्याच्या हौदावर धुतली. व आंब्याच्या गारव्यास बसून तिने खाल्ली. तिला थोडे बरे वाटले. ती आपल्या खोलीत वामकुक्षी घेण्यासाठी गेली.

……. …. ……..

थोड्या वेळाने शेतातून मल्हारी घरी आला. तो आपले हातपाय धुवून आत निघाला. तेव्हा त्याच्या कानावर सरस्वती व पार्वतीचे बोलणे पडले. 

पार्वती, “ पाहिलंस कशी ठेवली उपाशी, लई शहाणपणा करत होती.”

सरस्वती, “ बरं झालं, खोड मोडलीस, घरच्यांनी खूप डोक्यावर बसवून ठेवलीय. कानामागून आली अन् तिखट झाली.”

पार्वती, “ तर काय? सासूबाई पण उमा अगं उमा अस करत मागे मागे फिरत होत्या. आता बस म्हणावं.”

सरस्वती, “अशी जर धाकात ठेवली तर बरं. नाहीतर….”

पार्वती, “ सासूबाई तीर्थयात्रेहून यायच्या आधी हिला कशी उंदीर करते बघ.”

सरस्वती, “ आपण म्याँव केलं की तिनं असं भिऊनच राहिलं पाहिजे. कस म्याँव”

 त्या हसू लागल्या.

त्याचे बोलणे ऐकून मल्हारीस उमा उपाशी आहे हे लक्षात येतं. तो मनात, ‘ म्हणजे आज उमा जेवली नाही तर, या दोघी राक्षसिणी असल्यावर आणखी काय होणार. आपण कायतरी केलं पाहिजे.’ 

 मल्हारी आल्या पाऊली माघारी फिरुन मागे जातो. दुपार झालेली होती. तो परस बागेत गेला. त्याने झाडांचे निरीक्षण केले. झाडांना मोहर आलेला होता. कुठेही फळ दिसत नव्हते. तेव्हा तो पुन्हा रानात गेला. व तिथे एक पिकत घातलेला केळीचा लोंगर त्याने खड्यातून काढला. व घरी घेऊन आला. सरळ तो आपल्या खोलीत आला. उमा पलंगावर झोपली होती. तो घड शेजारी ठेवून व एक केळ सोलून खात तो.

मल्हारी, “ किती मधुर केळी आहेत.”

उमा दचकून उठली. तिने पाहिले. तिला खूप भूक लागली होती. पण हावरटपणा करणे बरे नाही. म्हणून भावना आवरल्या. तसं तिला चिडवण्यासाठी.

मल्हारी, “खाणार काय?”

उमा, “ दिल्या तर खाईन.”

मल्हारी, “ हे घे.”

मल्हारीने हे घे म्हणताच तिने पटकन हातातून केळी काढून घेतली. व ती आधासासारखी बकाबक खाऊ लागली. तेव्हा मल्हारी.

मल्हारी, “अगं हळू खा. जेवली नाहीस ना.”

उमा, “तुम्हाला कस ठावं.”

मल्हारी, “ अंतरज्ञानी आहे मी.”

 उमा, “ ब्रह्मदेवच ना तुम्ही.”

मल्हारी, “ ब्रह्मदेव नाही, मल्हारी आहे. तो ही उमेचा.”

 उमा, “ गप्पा बस, काहीतरीच बोलता.”

 मल्हारी, “काहीतरीच काय, खरंच सांगतो.”

तो हसू लागतो.     

………. …….. ……….












शनिवार, १८ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २३

 

अस्तित्व पटकथा भाग २३



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


एके दिवशी एक साधू भ्रमंती करत सूर्यगावात आला. खूप चालल्याने तो थकला होता. गावाशेजारील डोंगरात एक गुहा होती. ते त्याला समजले होते. त्या रात्री त्याने तेथे विश्रांती घ्यायचे ठरवले होते. दिवस मावळायच्या आधीच तो अन्न भक्षण करीत असे. त्या दिवशी त्याने रात्र पाणी पिऊन सूर्यगाव जवळील गुहेत काढली. सकाळ झाली. त्यास खूप भूक लागलेली होती. तो चारिका करत गावात भिक्षा मागू लागला. परंतु त्यास कोणीही भिक्षा दिली नाही. कारण काही दिवसापूर्वी काही साधूच्या वेशात गावातून फिरुन काही चोर लोकांनी रेकी केली. व दुसऱ्या दिवशी गावातील काही घरात चोरी झाली. व ते पळून गेले होते. जिथे तिथे कट्यावर लोक बसून याच विषयावर चर्चा करत चांगल्याचा जमाना राहिला नाही. साधू संन्याशी असे वागू लागले तर कस व्हायचं. कुणावर विश्वास ठेवायचा. या विचाराने गावात त्यास कुणी भिक्षा दिली नाही.

ज्याच्या दारी जाई, जो तो हाकलून लावत असे. भुकेने तो व्याकुळ झाला होता. तसाच तो पाटील वाड्यावर गेला. मल्हारी शेतावर गुऱ्हाळ काम असल्याने गेला होता. मुले सुद्धा त्यासोबत गेली होती. शिवांना देखील जेवण द्यायला शेताकडे गेला होता. अलका, उमा व मुली सोमवार असल्याने शिवपूजा करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या.

घरात पार्वती व सरस्वती या दोघीच होत्या. दुपारची वेळ होती. उन्हाच्या झळा मारत होत्या. साधू भिक्षा मागण्यासाठी वाड्यावर आला. त्याने हाक मारली.

साधू, “ भिक्षा दे माई.”

त्याने दोन तीन वेळा हाका मारल्या. उन्हाने त्यास खूप तहान लागली होती. जवळील पाण्याच्या हौदावर तो पाणी पिण्यासाठी वाकला. इतक्यात पार्वतीने पाहिले.

पार्वती, “ ऐ काय करतोस इथे, चोरटा आहेस वाटतं.”

तिचे बोलणे ऐकून तो दचकला व मागे वळून पाहिले.

साधू, “ नाही ताई मी काही चोरत नाही. तहान लागलीय म्हणून पाणी पितोय.”

पार्वती, “ मला माहितेय तुम्हा गोसाव्यांचे नखरे, मागे देखील असेच गोसावी येऊन गेले. अन् गावात चोऱ्या झाल्या. पाणी हवं तर मागायच. “

साधू, “ माफ करा. थोडं पाणी घेतो. थोडा सिधा द्या. “

त्याचवेळी सरस्वती बाहेर आली.

सरस्वती, “ काय झालं ताई,”

पार्वती, “ अगं, कोण गोसावडा आलाय भिक्षा मागत. मघाशी त्या पाण्याच्या हौदाजवळ काय करत होता.”

सरस्वती, “गोसावी की चोर कोण जाणे. द्या हाकलून.”

पार्वती, “ ये चालता हो इथून.”

 त्यांनी त्या गोसाव्याला हाकलले. त्याला केलेल्या धक्काधक्कीत त्याच्या हातातील कमंडलू सांडले. तो निराश होऊन वाटेला लागला. निर्जळी उपासाने शरीर अशक्त झाले होते. त्यात हे उपोषण घडले. व पाणी सुद्धा मिळाले नाही. त्याने कुठलेतरी नदी नाल्यातील पाणी प्यायचे व निघायचे ठरवले. पण थोडे अंतर गेल्यावर त्यास उन्हाने चक्कर मारू लागली. तो खाली पडला. त्या रागात त्याने या गावावर भयंकर अरिष्ट येईल असा शाप दिला.

याचवेळी उमा व मुली देवदर्शनाने परत येत होत्या.

उमा व तिच्यासोबत अलका, वासवी व अवंतिका देखील होती. मंदिरात जाऊन यायला आज खूप उशीर झाला होता. आज आद्य पूजा कोणीतरी केली होती. उमाने बिल्वपत्रे व श्वेत फुले वाहिली. व वांग्याचे भरीत दहीभात व तांदळाची भाकरी नेवेद्य आणला होता. तिने नेवैद्यातील एक घास काढून ठेवला. विभूती लावली. पूजा आटोपून त्या लगबगीने घरला निघाल्या. वाटेवर तो रस्त्याकडेला पडलेला साधू दिसला.

अवंतिका, “काकी ते बघ कोण पडलय.”

अलका, “ अंगावर भगवी वस्त्रे आहेत. कोणी साधू तर नसावा.”

उमा, “ चल बघू.”

त्या साधूजवळ आल्या उमाने ताट वासवीकडे दिले. त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्याच्या हातापायांना धरुन बाजूला एका सावलीत नेले. पाणी पाणी म्हणत तळमळणाऱ्या साधूच्या मुखात त्यांनी पाण्याची धार धरली. पाणी पिल्याने त्यास बरे वाटले. उमास तो भुकेला आहे हे जाणवले. तिने वासवीकडील प्रसादाचे ताट घेऊन त्यास तो नेवैद्य दिला. त्याने तो नैवेद्य खूप दिवस भुकेला असल्यासारखा खाल्ला. त्यास अतिशय बरे वाटले. त्याने उमास हात जोडले. उमाने तसे न करण्यास सांगून त्याचे पाय धरुन नमस्कार केला. मुलींनी ही नमस्कार केला. कल्याण नमस्तू असा आशिर्वाद त्याने दिला. त्या तो बरा आहे हे पाहिल्यावर तिथून निघाल्या.

जाताना त्याने विचारले. “ साक्षात देवरूप आहात. तुम्ही कुठे राहता?”

अलका, “आम्ही होय याच गावात राहतो. गावाबाहेर मोठा वाडा आहे ना, तेथेच आम्ही राहतो.”

त्या पुढे वळण पार करुन गेल्या. त्या साधूला रडू आले. “ रागाच्या भरात आपण हे काय करुन बसलो. श्राप दिला. परमेश्वरा वाचव रे बाबा.”

पण काही उपयोग नव्हता. तो साधू थोडा शांत बसला. व थोड्या वेळाने मार्गस्थ झाला.

…….. …… ………..

क्रमशः पुढे.......





सोमवार, ६ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २२

 अस्तित्व पटकथा भाग २२



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे चालू ......


सोमवारी उमा महादेवास जात असे. उमाने अलकास विचारले. व गावाबाहेरील दाट राईत असलेल्या देवदर्शनास अलका, अवंतिका, वासवी व उमा गेल्या. देवदर्शन झाल्यावर त्यां परत निघाल्या. वाटेत एक चोर एका स्त्रीचे मंगळसूत्र चोरुन निघाला होता. उमाने हेरुन आपले पूजेचे ताट अलकाकडे दिले. व वाटेने जाणाऱ्या आजोबांच्या कडील काठी घेतली. व फेकून मारली ती लागून तो पडला लोकांनी त्यास चोपले. त्याकडील मंगळसूत्र त्या स्त्रिस दिले.
ती स्त्री, “गुणी ग माझी बाय, माझं आहेव लेणं वाचवलस तू. परमेश्वर तुझे कल्याण करु देत.”
उमाने एक स्मितहास्य केले. व ती निघाली. अलका व मुली आश्चर्य चकित झाल्या. पुढे गेल्यावर.
अलका, “काय वहिनी किती गुपिते लपल्यात तुझ्यात.”
उमा, “ यात कसलं आलंय गुपित.”
 अवंतिका, “काकी आम्हाला पण शिकव ना.”
वासवी, “ मला पण.”
उमा, “शिकवेण की, चला आता घरी उशीर होईल.
…… …… …..

दुसऱ्या दिवशी वाड्यातील माळ्यावर वासवी काहीतरी शोधत होती. खाली उभा असणार अवंतिकास
“ हे घे, फेक खिडकीतून बाहेर.”
वासविने दिलेली काठी खिडकीतून बाहेर फेकली. अशा तीन काठ्या फेकल्या. त्या काठ्यांच्या आवाजाने येसाजी जो बागेतील पेरू काढत होता. त्याने ती काठी नारळी खाली येऊन पडलेली पाहिली. इतक्यात माळ्यावरून लपत छपत त्या दोघी खाली उतरल्या. व जिन्याने मागील दरवाजा जवळ उतरुन परसात पळाल्या. व त्या काठ्या त्या दोघींनी घेतल्या. व त्या दोघी निघाल्या. परसामागे थोडे अंतर गेल्यावर एक वावर होते. पावसाळ्याचे चार मास सोडले. तर रिकामेच असे. त्या ठिकाणी त्या गेल्या. तेथे अलका नी उमा वाट पाहत होत्या. या काठ्या घेऊन काय करणार ही जीज्ञासा जागृत होऊन येसाजी त्यामागे गेला. त्याने वावराशेजारील एका जाळीतून पाहिले. तेव्हा त्यास उमा काकी मुलींना लाठी काठी शिकवताना दिसली. ते बघून तो मागे पळत गेला. पलीकडील रानात खेळणात्या कार्तिक व तानाजीस त्याने सर्व सांगितले.
तानाजी, “ काय खरंच.”
येसाजी, “तर काय, कशी भिंगरीगत काठी फिरवत होती.”
 कार्तिक, “चल पाहुया.”
ते तिघे तिकडे निघून गेले. त्यांनी देखील पाहिले. त्या तिघींना काकी लाठी काठी शिकवत होती. तिचे काठी फिरवणे पाहून ती चकित झाली. व मागे त्यांना न दिसता आपल्या खेळण्याच्या जागेवर आली.
तानाजी, “ दादा काकी जेवढी शांत वाटते. तेवढी ती शांत नाहीये. “
कार्तिक, “जेवण पण खूप छान बनवते. मला फार आवडतो. स्वयंपाक तिच्या हातचा.”
येसाजी, “काका आमचा भाग्यवान आहे म्हणेनास.”
तानाजी, “असली काकी दिवा घेऊन शोधूनही सापडणार नाही.”
येसाजी, “पण ती ताईला व आत्तीला काठी चालवायला का शिकवत आहे.”
येसाजी, “तुझं डोक फोडायला.”
तानाजी, “बापरे, आता काय करायचं.”
कार्तिक, “ अरे वेड्या, काकी त्यांना स्वतःच्या रक्षणाचे धडे देत आहे.”
तानाजी, “ अस होय. मग काय भारीच हाय की. आपण पण जाऊयात की शिकायला.”
कार्तिक, “ आधी थोडं दिवस पाहूया. नंतर मग शिकूया. नाहीतर काकी लाजून शिकवायचं थांबवायची.”
 तानाजी, “ बरं.”
……… ……… …………
एके दिवशी रात्री लक्ष्मीबाईंना रात्री स्वप्न पडले. स्वप्नात जगन्नाथ पुरी, रामेश्वर, द्वारका, बद्रीनाथ दिसू लागले. . ती दचकून जागी झाली. तिने नवऱ्याला उठवले. व स्वप्नाबाबत सांगितले.
लक्ष्मीबाई “ या संसाराच्या व्यापात देवधर्म करायचे राहिलेत.”
सदाशिवराव, “ मग आता करूया.”
लक्ष्मीबाई, “ अस म्हणता, मग ठरवू जायचं.”
सदाशिवराव, “ पण जाण्यापूर्वी इथली व्यवस्था नीट लावायला हवी.”
लक्ष्मीबाई, “ हा, ते तर आहेच.”
सदाशिवराव, “ चल, झोप आता.”
ते झोपी गेले.
…….. …….. ……..
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाईंनी घरातीलसर्व व्यवहार नीट लावून देतात. आपले आवरुन सर्वांना बोलावून.
लक्ष्मीबाई, “ हे पहा, आम्ही दोघेजण तीर्थयात्रेस जाणार आहोत. आम्ही नसताना मी सांगितले तसे सर्वांनी राहायचं. उद्यापासून घरातील स्वयंपाकाचे काम उमा पाहील. तसेच शेतीचा व्यवहार मल्हारी पाहील. पेढीवरील व्यवहार जयसिंग व प्रताप पाहील. व त्यावर मल्हारी देखरेख ठेवेल. जर दुकानात गैर मेळ दिसला तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात राहावं. सरला बाहेरील दळप कांडप, धुणीभांडी करेल. शिवण्णा जनावरांची वैरण व शेताकडे लक्ष देईल. व राहिल्या पार्वती व सरस्वती या शेण व धारा पाहतील. व शेतावर जाणाऱ्या माणसांच्या भाकऱ्या करतील.”
कमरेच्या किल्ल्यांचा जुडगा काढत
लक्ष्मीबाई, “अलका, हे घे किल्ल्या तुझ्या ताब्यात. नीट लक्ष ठेव. काय?”
अलका, “ हा आई.”
लक्ष्मीबाई, “ समजलं काय?”
 सर्वजण, “हो.”
ते आपले आवरून बाहेर पडतात. मल्हारी गाडी काढतो. व त्यांना सोडायला जातो.
…. ….. ……

मल्हारीने गाडी काढली. मागील डिक्कीत सर्व साहित्य ठेवले. मुले आजा आजीच्या मायेने जवळ आली.
लक्ष्मीबाई, “ हे बघा, भांडयाचं नाही. अन् काकीला मदत करत जावा. नाहीतर त्या तुमच्या आया तिला त्रास देतील. अन् काळजी घ्या. “
येसाजी, “ आजी , परत कधी येणार.”
आजी, “ येईन लवकरच. “
गाडी स्टार्ट होते. लक्ष्मीबाई व सदाशिवराव यांना सोडायला मल्हारी जातो.
….. ……. ….
सासू सासरे गेल्यावर पार्वती व सरस्वती एका खोलीत गेल्या.
पार्वती, “ गेली महाराणी. “
सरस्वती, “ पाहिलंस जेवणाच काम उमेला, अन् आम्ही काय शेण धारा काढायच्या.”
सरस्वती, “ही गेल्यावर वाटलं काहीतरी हातात सत्ता येईल.तर.”
पार्वती, “ सत्ता विसरा. वॉचमन आहे डोंबलावर आमच्या ही अलका कधी लगीन होऊन जातीय कुणास ठाऊक.”
 सरस्वती, “तर काय अन् ही पोरं आम्ही काढली असून देखिल त्या काकाच्या मागणं.”
इतक्यात तिथे कार्तिक येतो. त्याची बॅट घ्यायला.
कार्तिक, “मी ऐकलंय सगळं आजीला सांगेन आल्यावर.”
पार्वती, “मोठा शहाणा आलाय, आजीला सांगणार चोमडा.”
कार्तिक, “तुम्ही वागा ना नीट, मग मिळेल की सत्ता हातात. पण त्याला सुद्धा भाग्य लागतं.”
पार्वती, “ थांब तुला दाखवतेच इंगा. आजीचा चोमडा.”
 ती तांब्यावरील पेला फेकून मारते तो पेल्याचा मार चुकवतो व पळून जातो.
…… …….. ……. …….
 दुसऱ्या दिवशी सकाळी पाचचा गजर होतो. जयसिंगराव व सरस्वती झोपलेल असतात. गजर होताच.
जयसिंगराव, “अगं, उठ त्या धारेच बघ जा.”
सरस्वती, “ अजून वेळ आहे गप्प झोपा.”
जयसिंगराव, “अगं, शेण काढून धारा काढायला वेळ होतो. डेरी जाईल.”
सरस्वती, “पार्वती ताई उठतील.”
जयसिंगराव, “हे बघ, धारा निघाल्या नाहीत तर जड जाईल बघ.”
सरस्वती, “काय धारा धारा लावलय. झोपा गप.”
इकडे पार्वतीचा नवरा देखील तिला उठवत असतो. ती देखील सरस्वती धार काढेल झोपा म्हणते. व झोपी जाते.
कोणीही न उठल्याने धारेची वेळ झाल्यावर गाय हंबरू लागते. तिचे ओरडणे ऐकून उमा उठली. ती गोठ्यात गेली. शेण मागे सारुन धार काढायला बसली. त्याचवेळी अलका देखिल उठली. तिने उमाला धार काढायला गेल्याचे पाहिले. ती जवळ जाऊन म्हणाली.
“तू का धार काढतेस. त्या महाराणींना काढू देत की.”
उमा, “ अगं, आपलं घर, त्यात कशाला वाटणी घालायची. व ताईन जर वेळेत धार नाही काढली. तर मुक्या प्राण्यांचे हाल. त्यापेक्षा आपणच काढलेली बरी.”
ती धार काढून जेवण खोलीत गेली. अलका झाडू घेऊन लोटू लागली. वासवी व अवंतिका देखील मदत करु लागल्या. त्यांनी सर्व स्वच्छता करुन अंगणात रांगोळी घातली. तोपर्यंत उमाने अंघोळ आटोपली. व ती स्वयंपाक करायला लागली. तोपर्यंत साडेसात वाजले होते. पार्वती व सरस्वती अजून झोपल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात होते. उमाने चहा बनवून सर्वांना पाठवून दिला. मुलांना दूध दिले. मल्हारी देखील उठला होता. त्यास तिने दूध दिले. व उमा जेवण करु लागली. थोड्या वेळाने पार्वती व सरस्वती उठल्या. व तोंड धुवायला न्हाणी घरात गेल्या. त्यांना पाहून
अलका, “ काय वहिनी धार काढलीस, दूध हवं होतं चहासाठी.”
त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. सरस्वती चरवी घेऊन…
सरस्वती, “ अगं बाई, विसरलेच की,”
ती धार काढायला गडबडीने जाताना पाहून.
 अलका, “ काढल्या धारा. आता शेण तेवढं काढा म्हणजे झालं. नाहीतर जेवणाचं विसरा.”
सरस्वती, “एवढं काही बोलायची गरज नाही ताईसाब. “
अलका, “आपलं काम जबाबदारीनं करावं माणसानं.”
त्या दोघी गडबडीत शेण काढायला गेल्या. पार्वती शेणावरून घसरून पडली.
पार्वती, “आई गं, पडले गं.”
सरस्वती, “ ताई लागलं तर नाही ना.”
पार्वती, “बोलत काय बसलीस, उचल की.”
ती तिला उचलून घेऊन आत जाते.
…. ……… ……


क्रमशः पुढे......





गुरुवार, २५ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २०

 अस्तित्व पटकथा भाग २०

अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,



क्रमशः पुढे चालू ......

रुममध्ये आल्यावर उमाने दुधाचा ग्लास जवळील टेबलवर ठेवला. व ती विस्कटलेले अंथरुण लावू लागली.

मल्हारी, “ माफ करा. मुले खट्याळ आहेत. दंगामस्ती करतात..”

उमा, “ मुले ही मुलेच, त्यांनी दंगामस्ती करायची नाही तर कुणी करायची.”

मल्हारी, “ तुमच काम वाढवलं मात्र.”

उमा, “ असू देत. करते मी नीट.”

उमाने अंथरुण नीट लावले. व ती मल्हारीस दूध देऊ लागली.मल्हारी दूध घेतो. त्यांची नजरानजर झाली. तो उमाचे सौंदर्य न्याहाळू लागला.

उमा, “ घेताय ना दूध.”

मल्हारी, “ हा … बर तुम्ही.”

उमा, “ नाही..”

मल्हारी, “ मग हे घ्या अर्ध, तुम्ही प्या.”

उमाने मान हलवली. व तिने थोडं दूध प्याली.

मल्हारी राहिलेला ग्लास घेऊ लागला.

उमा, “ थांबा दुसरं आणते. हे उष्ट झालंय माझ्याकडून.”

मल्हारी, “ आज उष्ट बिष्ट सगळं चालतंय.”

तो राहिलेलं दूध पितो. लाईट बंद होते.

……. ….. ……

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उमा घरातील सर्व कामे करू लागली. तिचे काम पाहून सासू सासरे खुश होतात. सासूबाई उमाला बोलावून

लक्ष्मीबाई, “ उमा ये उमा, इकडे ये.”

उमा समोर आली.

सासूबाई , “ थांब इथे, आलेच.”

लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन दागिन्यांचा डबा आणतात. त्यातील एक दागिने उमाला देतात.

उमा, “ कुणाला? मला. “

अलका, “ घे की वहिनी, मस्त आहे की नाही.”

उमा हसली. व आत मध्ये गेली. ते पाहून जेवण खोलीत असलेल्या तिच्या जावा दागिने देताना पाहून.

पार्वती, “ पाहिलंस कशी काल आली नाही तोपर्यंत सासूबाईंनी लगेच दागिने तिला दिले.”

सरस्वती, “चल आपण पण जाऊ. आपल्याला पण मिळेल की.”

पार्वती, “ चल चल बघू.”

त्या लगबगीने बाहेर जाऊन उगाच.

सरस्वती, “ सासूबाई हे घ्या गुळपाणी.”

लक्ष्मीबाई, “ मी काय बाहेरून पाहुणी आलेय का गुळपाणी द्यायला.”

 लगेच पार्वती दूध घेऊन आली.

पार्वती, “ हे घ्या दूध.”

 लक्ष्मी, “ आज एकीवर एकीचं प्रेम उतू चाललेय.”

पार्वती, “तसं नाही, तुम्ही घरचा सगळा व्यवहार बघताय. त्यामुळे थकताय. तुमची कोण काळजी घेणार. म्हणून म्हंटलं आपणच घ्यायला पाहिजे. नाही का?”

लक्ष्मीबाई, “ अस म्हणताय. मग ठेवा. अन् जावा कामाला.”

सरस्वती, “ कस आहे. सासूबाई, माझा पण गळा मोकळा असतो. मला पण एखादी टीक किंवा माळ शोभेल की.”

पार्वती, “अन् माझे हात पण बघा ना, कसे रिकामे वाटतात. फक्त पाठल्याच आहेत. त्यात बिलवर कसे शोभून दिसतील ना, नाहीतर इकडे तिकडे सर्व नावे ठेवतात.”

लक्ष्मीबाई, “काय म्हणतात.”

पार्वती, “अस.. म्हणतात. की सासू जरी लक्ष्मी असली. तरी सुना लंकेच्या पार्वतीसारख्या आहेत. बघा ना, असं बोलणं त्यांना शोभत का? मी पण त्यांना ठणकावून सांगितलं की माझी सासू मला दागिन्यांनी मडवून टाकेल म्हणून.”

लक्ष्मीबाई, “ हो का बरं.”

सदाशिवराव, “ देऊन टाक एखादा दागिना त्यांना.”

लक्ष्मीबाई, “ तुम्ही गप्प बसा, या दोघी घरात आल्या तेव्हा काय घेऊन आल्या होत्या. हे जे आहे की नाही. ते आम्हीच दिलेलं आहे. मल्हारीच्या बायकोला ठेवलेले दागिने आता तिचे तिला दिले. अन् हे जे काही शिल्लक आहेत ना. ते माझ्या अलकाचे आहेत.”

 अलका, “ काय आई.”

लक्ष्मीबाई, “ हे घे, राहिलेले दागिने तुझे.”

पार्वती व सरस्वती दोघी नाराज होऊन उभ्या होत्या.

लक्ष्मीबाई, “ तुम्हा दोघींना दागिनेच हवेत ना. मग घ्या तुमच्या नवऱ्यांकडून. कुठल्या कामात लक्ष नाही. की शेतावर ध्यान. सगळं त्या मल्हारीन पहायचं. अन् या दोघी घरात नुसत्या काड्या लावायच्या कामाच्या. राबा आणि घाला दागिने म्हणावं.”

“ उभ्या काय राहिलाय. जावा कामाला, जेवण आटपा जावा, शेतात भाकरी द्यायच्या हाईत. काय त्यासाठी पण बाई लावू.”

त्या आत गेल्या. अलका दागिन्यांचा डब्बा घेऊन आईच्या खोलीत गेली.

…… ……… ………

त्या गेल्यावर.

सदाशिवराव, “ द्यायची होतीस एखादा दागिना वाईट वाटलं असेल त्यांना.”

लक्ष्मीबाई, “काय वाटेल. वाटलं तर वाटू देत. अगोचरा सारख्या आहेत दोघी. माझ्या पोराचं लग्न मोडत होत्या. घोरपडी. अन् यांना मी देतोय दागिने. चला , घ्या ते दूध तुमच्या सुनांनी आणलेल. मला नको. नातवंडांची काळजी नसती तर या दोघींना चांगलाच इंगा दाखवला असता.”

लक्ष्मीबाई आत गेल्या.

….. …… …..


क्रमशः पुढे .....




रविवार, २१ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १९

 

अस्तित्व पटकथा भाग १९, 

अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


लग्न झाल्यावर उमा व मल्हारी सूर्यगावात आले. गावात आल्यावर देवाचे दर्शन घेतले गेले.

पुजारी त्यांकडून पूजेचं साहित्य घेऊन पूजा करतो. ती दोघे देवाच्या नंतर पुजारी काकांना नमस्कार करुन आशीर्वाद घेतात. गावातील अनेक लहान मुले तिथे जमलेली होती. ती हसत होती.

नंतर ती घरी आली. वाड्यावर आल्यावर बाहेर अंगणात खेळणारी मुले पाहून.

येसाजी, “ आर, ते बघा गाडीतून कोण उतरतय.”

तानाजी, “ काका न लगीन केलं वाटतं.”

कार्तिक, “ थोरली आई असल्यावर काहीपण घडू शकतं.”

आजी लक्ष्मीबाई, ( तानाजीस) “ बाळ , आत जा व आईला आरतीचं ताट घेऊन यायला सांग.”

तानाजीने आत निरोप दिला तेव्हा त्याची आई

आई, “ कशाला हवे ताट?”

तानाजी, “ तुमच्या जाऊबाई आल्यात त्यांना ओवाळण्यासाठी.”

त्या दोघी आश्चर्य चकीत होऊन.

“ काय?”

त्या दोघी बाहेर येऊन पाहून.

पार्वती, “ अगं बाई, खरंच की यांनी लग्न केलं.”

सरस्वती, “अगं बाई, माझी हौसच अपूर्ण राहिली, वाटतं होत. दिराच्या लग्नात तरी एखादी पैठणी मिळेल. पण म्हातारीनं गोंधळ घातला.”

पार्वती, “ नाहीतर काय? पाहुणे नाहीत, जेवण नाही, मांडव नाही. काही नाही. लावलं लगीन.”

 त्यांना दारापाशी घुटमळतं असल्याचे पाहून.

लक्ष्मीबाई, “ सापडतीया की नाही पंचारती, काय शोधायला पोलिस पाठवू.”

पार्वती, “आले घेऊन.”

“ चल ग.”

त्या दोघी आत जाऊन पंचारती व माप घेऊन आल्या. व औक्षण करताना

पार्वतीने नाक मुरडले. ते पाहून.

नणंद अलका, “ काय वहिनी नाक कुठे, तोंड कुठे, जरा नीट होऊ दे.”

पार्वती, “हूं….”

त्यांनी औक्षण करुन नवरा नवरीला आत घेतले.

……. ….. ……..

रात्रीची वेळ मल्हारी आपल्या खोलीत होता. उमा जेवणखोलीत होती. तिच्या जावा तिच्याकडे पाहून तोंड वाकडे करतात. ती कावरी बावरी झाली. इतक्यात त्या ठिकाणी अलका, वासवी व अवंतिका आल्या.

अलका, “ काय वाहिनी अशी काय बावरलीस.”

उमा, “ काही नाही. “

अलका, “ थांब, मी मदत करते.”

ती दूध घेऊन गरम करुन ग्लास मध्ये ओतून तिच्याकडे देते.

अलका, “ हा… चल…”

वासवी, “ अगं, अत्ती हे दूध कशासाठी?”

अलका, “ गप ग, सिनेमा पाहिला नाहीस का? नवरी नव्या नवऱ्याला अशी दूध घेऊन जाते मग…”

अवंतिका, “ ती नवऱ्याला दूध पाजते.”

वासव, “ दूध पिल्यावर काय करते?”

अवंतिका, “ लाईट बंद होते.”

वासवी, “ लाईट बंद केल्यावर.”

अलका, ( अवंतिकाच्या तोंडावर हात ठेवून) “ ते झोपी जातात. चल म्हातारे लई प्रश्न विचारू नकोस.”

अलका उमेच्या हाती दुधाचा ग्लास देते. व त्या तिघींजनी उमाला मल्हारीच्या खोलीपर्यंत सोडतात.

वासवी, “काकीला काकांच्या खोलीची वाट माहित नाही का”

खोलीचे दार उघडताच त्या पाहतात. तिथे मुले खेळत होती. व त्यांनी सर्व फुलांच्या माळा विस्कटलेल्या होत्या. अलका काठी घेऊन त्यांना पळवून लावते. व उमाला आत जायला सांगते. उमा आत जाताना अवंतिका व वासवी पण निघाल्या होत्या. त्यांना तीने मागे ओढले.

अलका, “तुमच काय काम आहे?”

वासवी, “काकाला दूध देते की नाही ते बघते की.”

अलका, “लई शहाणी आहेस चल. मागे.”

उमा आत गेल्यावर अलका दार बंद करुन त्या दोघींना ओढून

“चल गुपचुप तिकडे.”

त्या आपल्या झोपण्याच्या खोलीकडे गेल्या.

…. …….. ……



शुक्रवार, १९ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १८

 

अस्तित्व पटकथा भाग १८



अस्तित्व पटकथा भाग १८, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ......


उमा बाहेर आल्यावर तिथून पुढे गावातील लोकांच्या प्रश्नाचा ससेमिरा मागे लागेल. म्हणून मुलांबरोबर रानात गेली. तिथे मुले बॉलने खेळत होती. तिथेच शेजारून रस्ता गेलेला होता. खेळताना छोट्या महिपतीने बॉल मारला. तो थेट रानातील विहिरीत गेला. तेव्हा.

महादू, “ खाल्लस शेण, तुला हजारदा सांगितलंय जरा बॉल दमान मारत जा. आता गेला ना विहिरीत. आता काय तुझा आज्जा येणार आहे का काढायला?”

महिपती, “लई बोलू नकोस मी काढतो.”

श्रीपती, “ तोंड बघा बॉल काढणार्याचं. पोहता येतं का?”

महिपती, “काढतो मी.”

तो धावत गेला. काठीने बॉल काढू लागला. त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला.

मुले, “वाचवा, वाचवा, महिपती पडला.”

इतक्यात तिकडे रानात आलेली उमा जी झाडाखाली शांत बसली होती. ती आवाज ऐकून धावत गेली. विहिरीत उडी टाकली. त्याचवेळी मल्हारी व त्याचे आई वडील गाडीतून निघाले होते. मुलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाईनी गाडी थांबवण्यास सांगितली.

लक्ष्मीबाई, “ड्रायव्हर गाडी थांबवा. मल्हारी, धाव विहिरीकडे कोण पडलय बघ?”

मल्हारीने वेगाने दार उघडून धावत जाऊन विहिरीत उडी मारली. उमा महिपतीला शोधत होती. मल्हारीने बुडी मारुन महिपतीला पाण्याच्या बाहेर काढले. त्याचे पोट दाबून पाणी काढले. महिपती शुद्धीवर आला. त्यावेळी मल्हारीचे भिजलेल्या उमाकडे व उमाचे त्याच्याकडे लक्ष गेले. नजरा नजर झाली. उमा बाहेर विहिरीच्या पायरीवरून जाऊ लागली. मल्हारीने तिचा हात धरला. उमा हात सोडवून..

उमा, “आता काय काम आहे इथे. की दुसरं स्थळ पहायला निघालाय.”

मल्हारी, “ दुसर नाही, पहिलंच जुळवायला आलोय. “

उमा, “ घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करुन तोंडघशी पाडण्यापेक्षा आधीच नकार द्यायचा. उगाच कशाला घरी बोलवायचे.”

मल्हारी, “ अपमान कोणी केला. मी तर नाही.”

 इतक्यात लक्ष्मीबाई व सदाशिवराव तिथे आले. मल्हारी व उमाचे बोलणे ऐकून लक्ष्मीबाई, “कोण ग तू, व विहिरीत का उडी घेतलीस.”

मल्हारी, “काय करेल बिचारी, घरी आलेल्या स्थळांन नकार दिल्यावर.”

उमाने तिरकस नजरेने पाहिले. ….

लक्ष्मीबाई, “ म्हणजे?”

मल्हारी, “ हीच ती, तुझ्या मुलाच्या कपाळावर विटीचा प्रसाद देणारी, तुझी होणारी….”

लक्ष्मीबाई, “उमा का?”

तिच्याकडे पाहून

“ अगं, भिजलीस की, थांब हा.”

“अहो, आणा ती पिशवी इकडे.”

सदाशिवरावांनी पिशवी दिली.

लक्ष्मीबाई, “ हा, घे, ही साडी अन् नेसून ये.”

उमा बाजूला झाडीत जाऊन साडी गुंडाळून आली.

लक्ष्मीबाई, “आता चल बस गाडीत अन् तुझ्या वाड्याची वाट दाखव.”

मल्हारी, “ हे आपलं बरं हाय, इथे मी भिजल्याचे काही नाही. व सुनेचं कौतुक चाललय.”

लक्ष्मीबाई, “ ये, गप्प, चल ग बस.”

उमा गाडीत बसली. गाडी निघाली. थोड्याच वेळात उमाच्या अंगणात पोहोचली. सर्वजण उतरले. गणपतराव झोपाळ्यावरून पाहतात. उमा व मल्हारीस ओल्या अंगाने पाहून.

गणपतराव, “ अगं, ऐकलस का? बाहेर ये जरा.”

आतून शकुंतला बाहेर आली. उमाला भिजलेली पाहून.

शकुंतला, “ हे, ग काय भिजलीस कशाने?”

लक्ष्मीबाई, “ काही नाही विहिरीत एक पोरगं पडलं होतं. त्याला वाचवताना दोघे भिजलीत. त्यांना कपडे द्या बदलायला.

शकुंतला, “चल आत.”

ती दोघे आत गेला. उमाने आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. शकुंतलाने आपल्या नवऱ्याचे धोतर व सदरा जे ठेवणीतले होते. ते मल्हारीस दिले. त्याने कपडे बदलले.

तोपर्यंत बाहेर गणपतराव व आजी, सदाशिवराव व लक्ष्मीबाईशी गप्पा करत बसले होते.

गणपतराव, “आपण…”

सदाशिवराव, “ आम्ही मल्हारीचे आई बाबा आहोत. व लग्नाची बोलणी करायला आलो आहोत.”

इतक्यात शकुंतला आतून चहा घेऊन आली. ते सर्व चहा घेत.

शकुंतला, “ पण आपल्या घरातील इतर मंडळींना …..”

लक्ष्मीबाई, “त्याचं सोडा हो, लग्न कुणाला करायचं आहे. मल्हारीला , त्याला मुलगी पसंत आहे व आता आम्ही पहिली, आमचा पण होकार आहे. तुमचं मत सांगा.”

शकुंतला, “ पण ते फोटो, चिठ्ठी.”

लक्ष्मीबाई, “ हे बघा, मला पूर्वीच कल्पना होती. माझी मैत्रीण आहे या गावात. शिवण्णा कुंभाराची बायको. तिच्याकडून सगळं माहीत आहे, अहो, आपल्या मुली झाडावर चढतात, शाळा शिकतात, घर सांभाळतात, काय बिघडलं त्यात. धडपडतातच ना. मला तर बाई मऊ मांजरीण नाही आवडतं. माझ्या मल्हारीला उमा शोभून दिसेल. तुमचं मत सांगा.”

शकुंतलाने नवऱ्याकडे पाहून डोळ्याने इशारा केला.

गणपतराव, “ आमचा होकार आहे. आता द्याय घ्यायचं बोला.”

लक्ष्मीबाई, “ हे बघा आमच्याकडे देवाने भरपूर दिले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने काय घालाल ते घाला. नारळ मुलगी दिली तरी चालेल.”

आजी, “ मग बघता काय फोडा सुपारी.”

लक्ष्मीबाई, “ नुसती सुपारी नाही, लग्नच लावायचं बोला.”

उमाच लग्न ठरलं व तिचं व मल्हारीच लग्न लावलं गेलं.

……… ………. ……….

 क्रमशः पुढे .......












मंगळवार, १६ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १७

 

अस्तित्व पटकथा भाग१७,



अस्तित्व पटकथा, film story,marathi film story,marathi script,patkatha.,script,



 क्रमशः पुढे चालू 

इकडे कार्तिक शेतावर गेला. मल्हारी पाणी पाजत होता.

कार्तिक, ( ओरडत)

काका, काका.

मल्हारी पाणी पाजताना उभे राहून.

“काय रे काय काम आहे.”

कार्तिक, “तुला बघायल पाहुणे आलेत. चल घरला. काकीच्या घराकडील आहेत. कदाचित.”

मल्हारी, “ पुजारी काका बोलले नाहीत. बरं चल.”

मल्हारीने मोटर बंद केली. व आपल्या मोटारसायकली वरुन घरी निघाला. कार्तिकची सायकल बाजूला रानात ठेवली. व ते घरी निघाले.

….. ……. …….

दारात गाडी थांबली. बाहेर मुले बसली होती. अलका पण बाहेरून आली होती.

मल्हारी, “ चल लवकर.”

 येसाजी, “ काही उपयोग नाही. आता.”

मल्हारी, “ का काय झालं?”

अलका, “ वाहिन्यांनी सर्व मोडलं.”

मल्हारी, “ काय, अस का केलं?”

अवंतिका, “ हा, हे घ्या.”

( फोटो व चिठ्ठी तिने दिली. मल्हारीने ते वाचले. इतक्यात तिथे गाडी आली. लक्ष्मीबाई व सदाशिवराव खाली उतरले. त्यांना पाहून….)

 लक्ष्मीबाई, “आ, काय झाले. ही सगळी अशी का बसलेत?”

सदाशिवराव, “ झालं असेल काहीतरी, चल बघू.”

ते जवळ गेले.

लक्ष्मीबाई, “ काय झालं?”

वासवीने काकांच्या हातातील फोटो व पत्र दिले. लक्ष्मीबाई पाहू लागली.

अलका, “घरात दोन घरमोड्या असताना आणखी काय होणार. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कडव्या शब्दांनी केल्यावर काय होईल? मला वाटतं माझं सुद्धा असंच होईल. मला वाटतं दादाला व मला आयुष्यभर असंच बिन लग्नाचं रहावं लागणार की काय? कुणास ठाऊक.”

लक्ष्मीबाई,( फोटो पाहून) “ वा… मुलगी झाडावर चढते. म्हणजे बाग उतरण्याचा खर्च वाचला.”

येसाजी, “ अगं आजी, चिठ्ठी तरी बघ.”

लक्ष्मीबाई, ( चष्मा ठीक करत) “ काय मेल्याची भाषा, धड मराठी पण लिहिता येत नाही. काय तर म्हणे, मुलगी झाडावर चढते. उद्या ढगांवर चढेल. अशी आंबे चोर तुम्हाला आवडेल का?”

“ मेल्य ला धड लिहिता पण येत नाही. व मिळाली चिठ्ठी अन् लग्न मोडल. काय रे कुणी मोडल. मल्हारी तू”

कार्तिक, “ नाही, काका शेतावर होता. त्याला माहिती पण नव्हतं.”

कार्तिक, “ आई व काकी या दोघींना हे सगळं माहीत होतं. आलेल्या पाहुण्यांना त्यांनीच सगळं दाखवलं.”

लक्ष्मीबाई, “ पाहुणे कुठे गेले?”

 अलका, “ गेले त्यांच्या गावी, तुझ्या सुनांची बोलणी खाऊन.”

लक्ष्मीबाई, “मल्हारी जा आवरून ये.”

तो आत गेला.

सदाशिवराव, “ आता काय करायचं?”

लक्ष्मीबाई, “ काय म्हणजे लग्न.”

सदाशिवराव, “ तुला मान्य आहे हे.”

लक्ष्मीबाई, “ ही लक्ष्मी विचार करुनच पाय टाकते, मी त्या मुलीची सर्व माहिती काढलीय. मगच मल्हारीला पाठवून दिले होते.”

इतकयात मल्हारी आला. अलकाने हळद कुंकू व साहित्य आणून दिले. ते घेऊन मल्हारी ,लक्ष्मीबाई व सदाशिवराव गाडीत बसले व निघाले.

….. ……. ……

 गाडी आसगावात अंगणात थांबली. गणपतराव व शंकुंतला गाडीतून खाली उतरली.

पाय धुताना

आजी, ( ज्योत्याच्या खांबणीला उभा राहून) “ काय ठरलं.”

शकुंतला, ( पाण्याची चुळ भरत) “तुमच्या नातीने जे गावभर गुण उधळलेत ना, ते सगळीकडे झालेत. आंबे काढते, चिंचा काढते, मुलांना बदडते. ते सगळ गावभर झालंय.”

आजी, “ अगं, पण ते शाळेत असतानाचे उपद्व्याप पण माझी नात खट्याळ असली तरी गुणी आहे हो.”

शकुंतला, “ तेच खट्याळ गुण पहायला येणाऱ्यांना खटकताहेत. व परवाच्या स्थळाचं डोकं पण याच बयेनेच फोडलंय. “

इतक्यात उमा बाहेरून तिथे आली. तिला पहात,

शकुंतला, “ पाहिलत का, जरा कुठे बाहेर गेलं की ही मांजरीन लागली घर फिरायला. कुठं गेली होतीस?”

उमा, “काही नाही, जरा उकडत होतं . म्हणून बागेत गेले होते.”

शकुंतला, “झालं का उंदरासारख उंडरुन. चल घरात.”

तिच्या हाताला धरुन ओढत आत नेते. आवाज ऐकून शेजारी पाजारी वाकून पहात असतात.

गणपतराव, “उगाच दंगा नको. शेजारी पाजारी बघताहेत. ”

 शकुंतला, “ बघू देत. चल कारटे घरात. जन्मल्या आईला गिळून बसलीस. अन आता माझा जीव खातिया. नालायक, बाईच्या जातीनं कसं वेळूसारखं असावं. वेळ आली की नम्र रहावं. हिच मात्र निराळच.”

तीने पाठीत दोन धपाटे दिले.

आजी, “ उगाच गावच ऐकून बोलू नकोस. माझी उमा गुणाची हाय. माप एकापेक्षा एक स्थळ येतील चालून.”

शकुंतला, “आलेलं स्थळ सरसच होतं. पण हिच्या कारणाममूळे मोडल. आता बस म्हणावं एखादा नकटा बिकटा घेऊन”

आजी, “ माझ्या नातीच लग्न मोडणाऱ्याला देव पांगळं करु देत. मोडून ठेवू देत त्याला. बगळं उचलून टोचून खाऊ देत त्याला. मेल्यानं चांगल्या कामात खोडा घातला. येसीचा महादेव रगतपिती भरवील त्याला.”

त्यांचे बोलणे जगन ऐकत होता. तो आपले तोंड काळे करुन तिथून गेला.

उमा आतील खोलीत रडत होती.

आजी, “ ह.. सोड रडणं अन् जा बाहेर, मळभ जाईल मनावरलं, लग्नाचं काय? आजच उद्या होईल. त्यात काय विचार करायचा.”

उमा तिथून बाहेर गेली.

….. ……. ………. …..

क्रमशः पुढे 

रविवार, ७ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १६

 

अस्तित्व पटकथा भाग १६

अस्तित्व पटकथा भाग १६, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

गणपतरावांकडे श्यामभट्ट आले. व त्यांची पसंती विचारायला.

श्यामभट्ट, ( अंगणात येत.)” पाटील आहित का?”

गणपतराव, “कोण? भटजी बुवा. या की.”

श्यामभट्ट पायरी चढून वर आले. बाकड्यावर बसले.

गणपतराव, “ अहो, ऐकलंत का? चहा टाका, भटजी बुवा आलेत.”

शकुंतलाने चहा गड्याकडून पाठवला व ती ही आली.

चहा घेत.

भटजी, “ बरं, काय ठरलं. तुमचं मागल्या स्थळाबद्दल.”

गणपतराव, “ उमा, काय सांगायचं स्थळाला.”

उमा, “ तुम्हीच ठरवा, मी काय सांगणार.”

शकुंतला, “ सांगा होकार. पण…..”

गणपतराव, “ पण काय आणखीन.”

शकुंतला, “ मी म्हणते, नवऱ्याच घर एकदा पाहिलं असतं तर…..”

गणपतराव, “जाऊ की.” ( पुजाऱ्यांकडे पहात.) “ काय म्हणता?”

 श्यामभट्ट, “ तर काय? जायलाच हवं. उमाला द्यायची म्हंटल्यावर, बरं मी तसं कळवतो.”

……. ………..

श्याम भट्टानी निरोप मधुकर पुजारी यांना दिला. की ते नवऱ्याचे घर पहायला येणार आहेत. म्हणून. दिवस ठरवून पुजारी बुवा वाड्यावर गेले. वाड्यावर सुनबाई पार्वतीकडे निरोप सांगितला. तिने घरातील बाहेर गेलेत. सांगेन असे सांगून तिने निरोप दिलाच नाही. शकुंतला, गणपतराव व श्याम भट्ट ठरल्यानुसार सूर्यगावला आले. त्यावेळी मल्हारी शेतावर तर लक्ष्मीबाई व सदाशिवराव शेजारील गावात देव दर्शनास गेले होते. अंगणात गाडी पोहोचली. वाळवण दारात घातलेलं होतं. बाहेर गोठ्यात जनावरांना शिवण्णा वैरण घालत होता.

शकुंतला, “ बाहेर कोणच दिसतं नाही. हेच घर ना, नाहीतर चुकीच्या घरात घुसायचो.”

श्याम भट्ट, “अहो, वाहिनी हेच ते घर. मधुकर पुजाऱ्यांच सांगण चुकायच नाही.”

गणपतराव, “अहो, पण पुजारी बुवा कुठे आहेत?”

श्याम भट्ट, “अहो, शेजारील गावी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तिथे अडकलेत ते. येतीलच थोड्या वेळात”

 इतक्यात शिवण्णा समोर येत.

शिवण्णा, “ कोण पाहिजे?”

श्याम भट्ट, “ मल्हारी सदाशिव पाटलांचं घर हेच ना.”

शिवण्णा, “हो, काय हवय.”

श्याम भट्ट, “ आसगावाहून पाहुणे आलेत. म्हणून सांगा . घर पहायला.”

शिवण्णा, “या की, पण मालक व मालकीण बाहेर गेलेत. व मल्हारराव शेतावर. “

कार्तिक व येसाजी तिथे जवळच खेळत होते. ते

कार्तिक, “शिवाकाका कोण आलंय?”

 शिवण्णा, “ आपल्या धाकल्या धन्यासाठी आलेत ते. घर पहायला.”

कार्तिक, “काय, काकांना पहायला.”

शिवण्णा, “हो.”

 कार्तिक, “येसाजी घरात सांग जा. मी काकांना बोलावून आणतो.”

कार्तिक सायकल घेऊन शेताकडे गेला. येसाजी घरात गेला. व त्याने आपल्या आईकडे निरोप दिला.

पार्वती, “अगं बाई, अहो जाऊबाई ऐकलत का, पाहुणे आलेत.”

सरस्वती, “हो, ऐकलं,” “ बर बाळ जा व तुज्या बाबांना व काकांना बोलावून अन् जा.”

शिवण्णा त्यांना आत घेऊन आला.येसाजीने बाबांना व काकांना बोलावले. व सरू नोकरांनीने पाहुण्यांना पाणी नेऊन दिले.

येसाजीचे बाबा फोन करत होते.

सरस्वती, “ कशाला फोन करताय. तुम्ही फक्त बाहेर बसा. आम्ही बघतो काय करायचं ते.”

जयसिंगराव, “ तुम्ही काय करणार आहात?”

सरस्वती, “ तुम्ही व प्रताप भाऊजी जाऊन बाहेर बसा. आम्ही आलोच फराळ घेऊन.”

जयसिंगराव व प्रताप बाहेर येऊन बसले. पाहुण्यांची चौकशी करू लागले. शिवण्णाने पाहुण्यांना पाणी दिले.

जयसिंगराव, “ घर शोधताना काही त्रास तर नाही ना झाला.”

श्याम भट्ट, “ नाही, मधुकर गुरुजींनी बरोबर पत्ता सांगितला होता.”

जयसिंगराव, “ बरं का हे आमचे बंधू प्रतापराव.”

गणपतराव, “ हा, हे काय करतात?”

इतक्यात पार्वती व सरस्वती काही फळे व सरबत घेऊन आल्या. ते ठेवत.

पार्वती, “ हे आमचे मिस्टर, कृषी क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. सर्व शेती तेच पाहतात.”

सरस्वती, “ या वर्षी तर खूप धान्य पिकवलेय, ऊस, मक्का, तांदूळ, गहू, आमच्या बागा पण आहेत.”

गणपतराव, “ ते आहेच हो, पण तुमचे सासू सासरे कुठे दिसत नाहीत.”

पार्वती, “ते होय , अगं बाई , सांगायचंच राहीलं. ते होय शेजारील गावी देव दर्शनाला गेलेत. अन मल्हार भाऊजी शेतावर. तुम्ही येणार हे माहीत नव्हतं. नाहीतर थांबवलं असतं.”

 प्रतापराव, “बोलवायला गेलाय मुलगा , येईलच इतक्यात. बर तुमची मुलगी."

गणपतराव, “आमची उमा होय, फार गुणी आहे. सर्व घरकाम करते. व …….”

सरस्वती , “ ते माहिताय आम्हाला, घ्या की सरबत. तुमच्या मुलीची ख्याती सर्व गावभर आहे.”

शकुंतला, “ म्हणजे, मी नाही समजलो.”

पार्वती, “ म्हणजे काय, हो, घ्या की, तिला छान झाडावरील कैर्या काढता येतात, पाणी ओढते आडाचे, आंबे व्हळीत पिकत घालते. प्रसंगी मुलाना चेचते पण. सगळ माहित आहे आम्हाला.”

सगळे आवाक होऊन पाहू लागले.

सरस्वती, “ अहो चेष्टा केली, घ्या की.”

शकुंतलाने गणपतरावांच्या चेहऱ्याकडे पहिले.

पार्वती, “ आम्ही फोटो पण पाहिलाय.”

सरस्वती, “ हा थांबा ह.. मी दाखवते.”

तेव्हा तिचे मुलांसोबत खेळत्याले व झाडावरील आंबे काढत्याले फोटो सरस्वतीने दाखवले.”

ते पाहून ती तिघे उठलीत. व नमस्कार करुन निघालीत.

पार्वती, “ अहो, अहो, अस काय? चहा तरी घ्या.”

 जयसिंगराव, “ हे, अस बोलतात.”

 ती गाडीमध्ये जाऊन बसलीत.

गणपतराव, “ ड्रायव्हर गाडी चालवा.”

ड्रायव्हर, “ जी.”

गाडी निघून जाताना.

येसाजी, ( धावत गाडी जवळ येत. व त्यांना उद्देशून)

“ अस, जाऊ नका, आमचे काका लई छान आहे. सुखात ठेवतील काकीला.”

शकुंतला हसली व

“ ठेवेल हा पण …..”

 गाडी निघाली.

इकडे या दोघी एकमेकांना आपले अंगठे दाखवून वेल डन म्हणून हसू लागल्या.

……. …… …….

क्रमशः पुढे.....

शनिवार, ३० मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १५

 अस्तित्व पटकथा भाग १५


अस्तित्व पटकथा भाग १५ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,



क्रमशः पुढे चालू....

उमा बागेतील झाडाखाली बसली होती. शांतपणे विचार करत. तेथील शांततेने तिच्या अंतरंगात वेगळीच हालचाल जाणवत होती. तशी ती झाडाला टेकून बसली. तर वेगळीच शक्ती तिच्यामध्ये जागृत होत होती. व तिचा अल्लड स्वभाव शांत होत चाललेला होता. ती एकाग्र होत होती. इतक्यात पाठीमागून लपत छापत आलेला महादू तिला ‘भाव’ केला.

महादू, “घाबरली रे घाबरली.”

उमा, “ तुला वाटते का मी घाबरले असं.”

महादू, “ नाही.”

उमा, “ मग असं का म्हणालास?”

महादू, “ बर बाई, मी हरलो. एक सांग. तुला दाजीबा पसंत आहेत नव्ह.”

झाडावरून लोंबकलणारा व कैऱ्या तोडणारा अथर्व खाली येत म्हणाला, “ पसंत नसायला काय झालं. मस्त आहे. राजबिंडा, बुलेट चालवताना एखाद्या हिरो सारखा दिसतो.”

उमा, “तुला बरे माहिती, तू केव्हा पाहिलास.”

अथर्व, “ तू विटी मारलीस ना, तेव्हा पाहिलं. काय ती बुलेट, काय तो गॉगल, एकदम झ्याक दिसत होता.”

 शिरपा, “ पण उमाक्का तुला कशी पसंत केली तेनं.”

उमा, “म्हणजे? मी काय वाईट दिसते.”

शिरपा, “ एवढी विटी मारुन देखिल गडी शांतच कसा हा मला प्रश्न पडलाय बघ.”

महादू, “पसंत नसायाला काय झालं. आमची उमाक्का आहेच एका राजकुमारी सारखी. एखाद्या राजाला देखिल गुलाम बनविल.”

अथर्व, “काय ग, तू दाजीबाला गुलाम करणार?”

महादू, “गप्प लेका, तस म्हणायचं असतं. अस का कोण नवऱ्याला गुलाम करत होय.”

उमाच्या चेहऱ्यापुढे चहा देतानाचा मल्हारचा पाहिलेला चेहरा दिसू लागला.

….. ….. …..

उमाच्या लग्नाची बातमी गावात सर्वत्र पसरली. जगन पारावर बसलेला होता. तेथे गावातील दोन माणसे गप्पा मारत होती.

गोपाळ, “ काय सावजी पेरणीची तयारी कुठंपातूर आली.”

सावजी, “ आलीय आवरत, काल धाणनी, औत झालंय. आलय तयार होतं.”

धनाजी, “ गोपाळकाकानी नंबर मारलाय म्हणायचा.”

गोपाळ, “ केलंय तयार पण गावाबरोबरच टोकणनी करायची ठरलंय.”

इतक्यात तेथून श्याम भट्ट जाताना पाहून.

गोपाळराव, “ काय बुवा कसली गडबड चाललीय.”

श्याम भट्ट, “ पाटलाच्या उमाला स्थळ आलंय नव्हं. त्याच सारख वारख करायच चाललय.”

धनाजी, “ पाटलाची उमा लग्नाजोगी झाली.”

सावजी, “ मग काय, तिच्या बरोबरीच्या सर्व उजवल्या. हीच तेवढी राहिलीय.”

धनाजी, “ कुठलं स्थळ आलंय?”

श्याम भट्ट, “ सूर्यगावच्या सदाशिव पाटलांचा मुलगा मल्हारी. त्याच आलंय. पसंती झालीय. थोडीफार बोलणी करायची अन् उरकून टाकायचं.”

सावजी, “बर हाय की.”

श्याम भट्ट, “ येतो मग.”

गोपाळराव, “ हा चालेल.”

पारावर बसलेला जगन त्याचं बोलणं ऐकतो. तो आपल्या मनात….

जगन, ( मनात) “ उमीच लगीन काय? बघतोच कशी लग्न करते ते.”

तो तिथून उठला. व शंभू माळ्याच्या घरी गेला. शंभू माळी ओसरीतल्या पाळण्यावर बसलेला होता.

जगन, “ राम, राम, माळी काका.”

शंभू माळी, “ कोण जगन, ये… ये… बस. काय काम काढलस.”

जगन, “ काय काका, नाही म्हटलं तर तुमच्या कानावर बातमी आलीच असेल की.”

शंभू माळी, “ बातमी, ती आणि कोणती?”

जगन, “ अहो, ती नाही का गणपत पाटलाची पोरगी उमी. तिचं लगीन ठरतंय म्हणे.”

शंभू माळी, “ काय? उमीचं लगीन, ते अन् कुणाशी?”

जगन, “ आव ते सुर्यगावचं आहे ना पोरग. कोण ते हा मल्हारी की फिल्लारी हाय., हा त्याच्याशी ठरतंय._

शंभू माळी, “मग ठरू दे की, त्यात काय एवढं, वयात आलेल्या पोरी उजवून इकडून तिकडं अन् तिकडून इकडं जायच्याच.”

जगन, “अहो काका, तिनं एवढं तुमच्या बागेचं नुकसान केलं, अन् तुम्ही तिला अशी सोडणार.”

 शंभू माळी, “ मग काय करायचं म्हणतोस.”

 जगन, “ हा कान करा इकडं.”

जगन शंभू माळ्याच्या कानात कुजबुजत.

शंभू माळी, “अस म्हणतोस.”

 जगन, “ पण त्यासाठी खर्चापाणी लागलं, मग देताय ना, पाचशे रुपये.”

 शंभू माळी, “ बर… देऊया की, माझ्या आंब्याच्या झाडाच्या एका एका आंब्याचा बदला घ्यायचाय मला. हा थांब.”

शंभू माळी उठला. त्याने आपले फडताळ उघडून त्यातील डब्यातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून जगनला दिल्या. जगन पैसे घेऊन निघून गेला.

जगन जातच शंभू माळ्याची बायको आतून बाहेर आली.

शंभू माळी बायको, “काय हो, तो जगन्या कशाला आला होता?”

शंभू माळी, “ आलता काम होतं एक.”

बायको, “ मला माहिताय कसलं काम ते. उगाच चढता वेल कापू नका. नाहीतर आपला कुजल. हा सांगते. उगाच नसत्या उठाठेवी कशाला हव्यात. जर त्या पाटलाला अन् पाटलीनीला कळलं तर तो पाटील टांगेल आसगावच्या वेशीच्या बावीवर, अन् पाटलीन देईल मिरचीची धुरी मग समजल.”

शंभू माळी, “कळेल तेव्हा कळेल, तू तेवढी गप्प रहा म्हणजे झालं. बघतोच मी, माझं आंबे उतरते काय. चढ म्हणावं झाडावर, अन् खा आंबे.”

……………. ……… ………..

जगन आंतरदेशीय पत्र घेऊन त्यामध्ये उमेविरूद काही बाई लिहून घेऊन सूर्यगावला सायकल घेऊन गेला. वाड्याच्या बाहेर अंगणात शिवण्णा नोकर लाकडे फोडत होता. जगन पोस्टमन होऊन तिथे गेला.

जगन, “ पोस्टमन, पत्र घ्या.”

शिवण्णाने लाकडे फोडायची थांबवून पत्र घेतले. व आत नेऊन थोरल्या सुनेच्या हातात दिले.

शिवण्णा, “बाईसाब हे घ्या पत्र आलंय कुणाच?”

पार्वतीने पत्र घेतले. व ती जेवण खोलीत आली. सरस्वती तिथे भाजी नीट करत होती.

सरस्वती, “कुणाच ग पत्र.”

पार्वती, “ अगं, बाई यावर तर पत्ता दिसत नाही. फक्त मल्हारीस अस लिहिलंय.”

सरस्वती, “ आण बघू, काय लिहिलंय बघू.”

“ अग खरंच की असं नाव लिहिलंय म्हंटल्यावर काहीतरी भानगडच असणार.”

पार्वती, “ कसली भानगड?”

सरस्वती, “ थांब , फोडून बघते.”

सरस्वती पत्र फोडून वाचले. व आवाक होऊन.

पार्वती, “काय हाय ग पत्रात.”

 तिने तिच्या हातातील पत्र घेऊन वाचले.

पार्वती, “ चल, मस्त संधी आलेय. जाऊन सांगूया.”

सरस्वती, “थांब, आता नको, बरोबर मोक्यावर घाव घालायचा.”

पार्वती, “ म्हणजे?”

सरस्वती, “ म्हणजे वाघाचे पंजे, कान कर इकडे.”

तीने तिच्या कानात काहीतरी सांगितले.

……… ……….. …………