अस्तित्व पटकथा भाग २६
अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,
क्रमशः पुढे चालू
चार धाम यात्रेला गेलेली सदाशिवराव व लक्ष्मीबाई जगन्नाथपुरीला पोहोचली. त्यांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. व मुक्काम केलेल्या ठिकाणी आलीत. तिथे आल्यावर.
लक्ष्मीबाई, “ कशी असतील हो आपली मुलं, काय करत असतील. “
सदाशिवराव, “ असतील मजेत, आता काय ती लहान आहेत. थोडीच. कशाला उगाच काळजी करतेस.”
लक्ष्मीबाई, “तसं नाही हो. तुम्हाला त्या दोघींचे स्वभाव माहीत आहेत ना? उमाला पटवून घेणार नाहीत हो म्हणून.”
सदाशिवराव, “ अलका आहे ना.”
लक्ष्मीबाई, “हो, पण ती आता किती दिवस, तिचंही लग्नाच बघायला हवं.”
सदाशिवराव, “ इथून गेल्यावर बघू, एखादं स्थळ, चला आता प्रसाद घेऊ व पुढील यात्रेस लागू.”
लक्ष्मीबाई, “हो चला, जय जगन्नाथ भगवान की.”
सदाशिवराव, “ जय,”
ती निघतात.
……. ……… …….
एका शहरात एका हॉटेल मध्ये एक पार्टी चालू आहे. तेथे तरुण व तरुणी जेवत आहेत. ती जयेश नावाच्या मुलास लांब नाईट पब मध्ये जाण्यासाठी कन्व्हेन्स करतात. तो आपली टू व्हीलर घेऊन निघतो. व आपल्या वडिलांच्या बिझनेस कंपनी ऑफिस मध्ये येतो. ऑफिस मध्ये हिरालाल पांचाल काम करत असतात. इतक्यात गाडी पार्क करुन जयेश आत आला.
जयेश, “ बाबा, चावी द्या.”
हिरालाल, “ नाही, मला हवी आहे. घरातील दुसरी घेऊन जा.”
जयेश, “ नको, मला हिच हवी आहे.”
तो इकडे तिकडे पाहतो. ऑफिस मधील टेबलावर त्याला किल्ली दिसते. तो ती चटकन घेतो. व निघतो. त्याचे वडील ओरडत असतात. पण त्यांकडे लक्ष न देता तो निघून पार्किंगमध्ये असलेली गाडी घेऊन जातो. हॉटेल बाहेर त्याचे मित्र उभे असतात.
साहिल, “काय हे, किती उशीर यार.”
जयेश, “ काय करणार यार गाडी बाबा ऑफिसला घेऊन गेले होते. “
सुकन्या, “तुझ्या बाबांना सांगितलं नाहीस ना.”
जयेश, “ छे, नाही, चला बसा लवकर वेळ झालाय.”
त्याचे मित्र बसतात. तो वेगाने गाडी चालवतो. दूर शहरातील एका डिस्को पबमध्ये आवारात गाडी पोहोचली. गाडी थांबली. त्यातून ते आधीच झिंगलेल्या वेड्यावाकड्या अवस्थेत त्या पब मध्ये जातात.
त्यातला एकजण, “ अरे यार, माझ्याकडे पैसे नाहीत.”
दुसरा, “चल यार, जयेश भरेल ना. तो असताना कशाला काळजी करतोस यार.”
ती आतमध्ये गेली. जयेश एन्ट्री फी भरतो. व ती दारू पित सिगारेट ओढत धुंद होऊन नाचू लागलीत.”
थोड्याच वेळात जयेशचा फोन खणखणू लागला. त्याने फोन उचलला. व लगेच आपल्या मित्रांना इशारा केला. ते लागलीच पबच्या मागील बाजूने बाहेर पडले. जयेशने लगेच आपली गाडी पार्किंग मधून काढली. व वेगाने तो निघाला. त्याची गाडी बाहेर पडताच वेगाने निघाला. त्याची गाडी निघताच. एक पोलिस व्हॅन वेगाने तिथे दाखल झाली. दुसरी गाडी जयेशच्या गाडीच्या मागे लागली. त्या गाडीस चकवा देऊन तो खूप दूर गेला. नगराबाहेर गेला. सकाळ होऊ लागली. एक साधूंचा जथ्था वाटेने चालला होता. त्याने जथ्थ्यामध्ये गाडी घुसवणार इतक्यात ब्रेक मारला. तरी देखील काही साधूंना ठोकर बसल्याने जखमी झाले. त्यातील एका साधूने चिडून एक दगड फेकून मारला. व त्यांना सर्वांनी बेदम चोप दिला. गाडीचा हॉर्न एकसारखा वाजू लागला.
……. ……. …….. ……
सूर्यगावातील एका घरात एक स्त्री आजारी आहे. ती खाटेवर झोपलेली होती. तिची मुलगी रानात आई आजारी असल्याने वांगी तोडण्यास गेली होती. तेव्हा गावातील एक गावगुंड राकेश तिथे आला. त्याने तिची छेड काढली. व तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती ओरडू लागली. त्याचवेळी मल्हारी आवाज ऐकून तिथे गेला. व त्यास खूप बदडले. व पिटाळून लावले. तो जाताना मल्हारीस तुला पाहून घेतो. सोडणार नाही. अशी धमकी देऊन गेला.
…….. ……. ……..
क्रमशः पुढे ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा