अस्तित्व पटकथा भाग २५
अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,
क्रमशः पुढे चालू.......
घरात आणलेली केळी मल्हारीने ठेवल्याचे अवंतिका व वासविला दिसले. उमा व मल्हारी रूममध्ये असताना वासावी व अवंतिका त्या घडातील दोन दोन केळी घेऊन परस बागेत गेल्या. विहिरीच्या ओट्या शेजारी बसून खात असताना येसाजीस समजले.
येसाजी, “वाव, केळी , आम्हाला पण हवी.”
वसावे, “ जरा कुठे खाऊ लागलो की लगेच आले हावरट पणा करायला.”
कार्तिक, “तोंड आवर वासवी मोठ बारकं काही आहे की नाही.”
वसाव , “ आहे की, आम्ही काय तुझ्यासारखे नाही. दुसऱ्याच्या हातात दिसेल ते मागायला.”
कार्तिक, “ बरं सांग, ही केळी कुठून आणली ते?”
अवंतिका, “ घरात आहेत, काका काकूंच्या पलंगाखाली.”
तानाजी, “ काय?”
वासवी, “खरंच, मी तिथूनच आणलीत.”
येसाजी, “ चला रे, जाऊन बघूया आत.”
ती पळत घरात जातात. ती गेल्यावर.
वासवी, “ कशाला सांगितलस पलंगाखाली घड आहे ते, आता संपवतील ते.”
अवंतिका,” हं.., याना सापडतात. केळी उशीर झाला लपवून ठेवलीत.”
वासवी, “ते पण खरं आहे. पण तू काका व काकूंकडे का लावुन दिलेस.”
अवंतिका, “अगं, काकांनी काही केळी त्यांच्या रूममध्ये नेली होती.”
वासवी, “चल आपण देखिल जाऊन बघू आपल्याला आणखी एखादं मिळालं तर.”
त्या देखील गेल्या. मुले मल्हारीच्या खोलीत वाकून पाहतात. तो व उमा यांना केळी खाताना पाहून.
येसाजी, “काका , शोभत का हे.”
मल्हारी, “ काय झालं.”
येसाजी, “ अस लहान मुलांपासून चोरुन लपवून केळी खाता.”
मल्हारी, “ शोभतं की.”
तानाजी, “ तुम्ही आम्हाला विसरला की काय?”
मल्हारी, “हो.”
कार्तिक, “ अस चोरुन केळी खाणे बरे नाही. आम्हाला पण केळी हवीत.”
उमा, “ही घ्या.”
मल्हारी, “ नाही द्यायची. तू खा.”
तानाजी, “ काकीचा गुलामच झालास की, तुझ्यासारख्या पहिलवानाला हे शोभत नाही.”
मल्हारी, “वा रे वा, सकाळी रगडून जेवला तुम्ही, व काकीला उपाशी ठेवला. तेव्हा कुठे होता?”
कार्तिक, “ काय काकी उपाशी आहे?”
मल्हारी, “ हो, म्हणूनच मी केळी आणलीत .“
जवळ जात.
तानाजी, “ काय ग, तू जेवली नाहीस.”
उमा, “ जेवले की आताच, खाल्ली की केळी. घ्या ही.”
येसाजी, “खरंच घेऊ?”
उमा, “ हो.”
तरी पण ती दचकतात. व त्यातील दोन दोन केळी घेऊन बाहेर खेळायला जातात.
…………. ………. ……….
थोड्या वेळाने मल्हारी रूममधून बाहेर आला. त्याला पाहून पार्वती व सरस्वतीचे तोंड पडलेले होते. त्याचवेळी अवंतिका व वासवी तिथे येते. मुलांचा दंगा ऐकून अलका जागी झाली. व खालील खोलीत आली.
अवंतिका व वासविला कळले होते की त्यांच्या आया काय कारनामे करतात. त्याचवेळी पार्वती त्यांना म्हणाली, “वासवी, पाहिलंस का कशी केळी चोरुन खाल्ली जाताहेत ते.”
वासवी, “ माहिती आहेत. की मला.”
पार्वती, “ आता तरी कळलं का? आपलं कोण आणि परक कोण ते.”
वासवी, “ हो कळलं, की”
पार्वती, “ काय कळलं .”
वासवी, “ कळलं की तू कशी जेवण लपवून ठेवतेस. काकीला कशी उपाशी ठेवतेस. एवढा पराक्रम तू करुन देखील तुझ्या मुलीला दोन केळी का असेना खायला दिलीत. तुझ्यात व त्यांच्यात खूप फरक आहे.”
सरस्वती, “गप्प ग, नालायक कुठली. मोठ्या माणसांना असं उलट बोलतात का?”
वासवी, “ कळत की? पण तुलाही कळयलं हवं काकीला उपाशी ठेवून आपण तुपाशी राहणं बरं नव्हे. “
पार्वती, “ देवळात नेलेला नेवैद्य खाल्ला ना तिने.”
अवंतिका, “कुणी सांगितलं तुला, की नैवेद्य तिने खाल्ला म्हणून, आम्ही तो रस्त्याकडेच्या भुकेलेल्या भिकाऱ्याला दिला.”
अलका, “बरं तो खाल्ला असेल वा नसेल. तुला वाहिनी नको तो उद्योग करायला सांगितला कुणी.”
त्या गप्प बसल्या.
……… …… ……….
पावसाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पावसाने त्रस्त झालेली भटकी कुत्री निवारा शोधत गावाबाहेरील जुन्या घाटमार्गातून जाणाऱ्या रस्त्याने निघाली होती. त्या वाटेत एक गुहा होती. त्या गुहेत प्राचीन काळापासून अनेक पांथस्थ विसावा घेत असत. पावसाळा व हिवाळा ऋतूत अनेक प्राणी निवाऱ्यासाठी तिथे थांबत. रात्रीच्या वेळी एका सशाची शिकार करुन काही कुत्री त्या गुहेत भांडत शिरलीत. त्यांच्या भांडणात गुहेतील काही दगड बाहेर गुहेच्या तोंडाशी येऊन पडले. थोड्या वेळाने त्यांचे भांडण त्या सशाच्या फडशा पाडल्याने संपले. तो ससा मटकावून थोड्या वेळाने ती कुत्री निघून गेली.
थोड्या दिवसांनी त्या वाटेवरून एक साधूंचा जथ्था नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निघाला होता. कोकण विभागातून जंगलपट्टा पार करुन ते घाटभागातील सूर्यगावी आली होती. व त्या गुहेत थांबली. तिथे भजन , कीर्तन, भोजन करुन त्यांनी विश्रांती घेतली. व दुसऱ्या दिवशी ते निघाले. जाताना त्यातील एका साधूने त्या गुहेतील कुत्र्यांच्या पायाने आलेल्या दगडातील एक दगड मोह निर्माण झाल्याने उचलून आपल्या झोळीत टाकला. व तो जथ्था निघाला. त्यातून मार्गस्थ झाला.
……… ………….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा