अस्तित्व पटकथा भाग१७,
अस्तित्व पटकथा, film story,marathi film story,marathi script,patkatha.,script,
क्रमशः पुढे चालू
इकडे कार्तिक शेतावर गेला. मल्हारी पाणी पाजत होता.
कार्तिक, ( ओरडत)
काका, काका.
मल्हारी पाणी पाजताना उभे राहून.
“काय रे काय काम आहे.”
कार्तिक, “तुला बघायल पाहुणे आलेत. चल घरला. काकीच्या घराकडील आहेत. कदाचित.”
मल्हारी, “ पुजारी काका बोलले नाहीत. बरं चल.”
मल्हारीने मोटर बंद केली. व आपल्या मोटारसायकली वरुन घरी निघाला. कार्तिकची सायकल बाजूला रानात ठेवली. व ते घरी निघाले.
….. ……. …….
दारात गाडी थांबली. बाहेर मुले बसली होती. अलका पण बाहेरून आली होती.
मल्हारी, “ चल लवकर.”
येसाजी, “ काही उपयोग नाही. आता.”
मल्हारी, “ का काय झालं?”
अलका, “ वाहिन्यांनी सर्व मोडलं.”
मल्हारी, “ काय, अस का केलं?”
अवंतिका, “ हा, हे घ्या.”
( फोटो व चिठ्ठी तिने दिली. मल्हारीने ते वाचले. इतक्यात तिथे गाडी आली. लक्ष्मीबाई व सदाशिवराव खाली उतरले. त्यांना पाहून….)
लक्ष्मीबाई, “आ, काय झाले. ही सगळी अशी का बसलेत?”
सदाशिवराव, “ झालं असेल काहीतरी, चल बघू.”
ते जवळ गेले.
लक्ष्मीबाई, “ काय झालं?”
वासवीने काकांच्या हातातील फोटो व पत्र दिले. लक्ष्मीबाई पाहू लागली.
अलका, “घरात दोन घरमोड्या असताना आणखी काय होणार. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कडव्या शब्दांनी केल्यावर काय होईल? मला वाटतं माझं सुद्धा असंच होईल. मला वाटतं दादाला व मला आयुष्यभर असंच बिन लग्नाचं रहावं लागणार की काय? कुणास ठाऊक.”
लक्ष्मीबाई,( फोटो पाहून) “ वा… मुलगी झाडावर चढते. म्हणजे बाग उतरण्याचा खर्च वाचला.”
येसाजी, “ अगं आजी, चिठ्ठी तरी बघ.”
लक्ष्मीबाई, ( चष्मा ठीक करत) “ काय मेल्याची भाषा, धड मराठी पण लिहिता येत नाही. काय तर म्हणे, मुलगी झाडावर चढते. उद्या ढगांवर चढेल. अशी आंबे चोर तुम्हाला आवडेल का?”
“ मेल्य ला धड लिहिता पण येत नाही. व मिळाली चिठ्ठी अन् लग्न मोडल. काय रे कुणी मोडल. मल्हारी तू”
कार्तिक, “ नाही, काका शेतावर होता. त्याला माहिती पण नव्हतं.”
कार्तिक, “ आई व काकी या दोघींना हे सगळं माहीत होतं. आलेल्या पाहुण्यांना त्यांनीच सगळं दाखवलं.”
लक्ष्मीबाई, “ पाहुणे कुठे गेले?”
अलका, “ गेले त्यांच्या गावी, तुझ्या सुनांची बोलणी खाऊन.”
लक्ष्मीबाई, “मल्हारी जा आवरून ये.”
तो आत गेला.
सदाशिवराव, “ आता काय करायचं?”
लक्ष्मीबाई, “ काय म्हणजे लग्न.”
सदाशिवराव, “ तुला मान्य आहे हे.”
लक्ष्मीबाई, “ ही लक्ष्मी विचार करुनच पाय टाकते, मी त्या मुलीची सर्व माहिती काढलीय. मगच मल्हारीला पाठवून दिले होते.”
इतकयात मल्हारी आला. अलकाने हळद कुंकू व साहित्य आणून दिले. ते घेऊन मल्हारी ,लक्ष्मीबाई व सदाशिवराव गाडीत बसले व निघाले.
….. ……. ……
गाडी आसगावात अंगणात थांबली. गणपतराव व शंकुंतला गाडीतून खाली उतरली.
पाय धुताना
आजी, ( ज्योत्याच्या खांबणीला उभा राहून) “ काय ठरलं.”
शकुंतला, ( पाण्याची चुळ भरत) “तुमच्या नातीने जे गावभर गुण उधळलेत ना, ते सगळीकडे झालेत. आंबे काढते, चिंचा काढते, मुलांना बदडते. ते सगळ गावभर झालंय.”
आजी, “ अगं, पण ते शाळेत असतानाचे उपद्व्याप पण माझी नात खट्याळ असली तरी गुणी आहे हो.”
शकुंतला, “ तेच खट्याळ गुण पहायला येणाऱ्यांना खटकताहेत. व परवाच्या स्थळाचं डोकं पण याच बयेनेच फोडलंय. “
इतक्यात उमा बाहेरून तिथे आली. तिला पहात,
शकुंतला, “ पाहिलत का, जरा कुठे बाहेर गेलं की ही मांजरीन लागली घर फिरायला. कुठं गेली होतीस?”
उमा, “काही नाही, जरा उकडत होतं . म्हणून बागेत गेले होते.”
शकुंतला, “झालं का उंदरासारख उंडरुन. चल घरात.”
तिच्या हाताला धरुन ओढत आत नेते. आवाज ऐकून शेजारी पाजारी वाकून पहात असतात.
गणपतराव, “उगाच दंगा नको. शेजारी पाजारी बघताहेत. ”
शकुंतला, “ बघू देत. चल कारटे घरात. जन्मल्या आईला गिळून बसलीस. अन आता माझा जीव खातिया. नालायक, बाईच्या जातीनं कसं वेळूसारखं असावं. वेळ आली की नम्र रहावं. हिच मात्र निराळच.”
तीने पाठीत दोन धपाटे दिले.
आजी, “ उगाच गावच ऐकून बोलू नकोस. माझी उमा गुणाची हाय. माप एकापेक्षा एक स्थळ येतील चालून.”
शकुंतला, “आलेलं स्थळ सरसच होतं. पण हिच्या कारणाममूळे मोडल. आता बस म्हणावं एखादा नकटा बिकटा घेऊन”
आजी, “ माझ्या नातीच लग्न मोडणाऱ्याला देव पांगळं करु देत. मोडून ठेवू देत त्याला. बगळं उचलून टोचून खाऊ देत त्याला. मेल्यानं चांगल्या कामात खोडा घातला. येसीचा महादेव रगतपिती भरवील त्याला.”
त्यांचे बोलणे जगन ऐकत होता. तो आपले तोंड काळे करुन तिथून गेला.
उमा आतील खोलीत रडत होती.
आजी, “ ह.. सोड रडणं अन् जा बाहेर, मळभ जाईल मनावरलं, लग्नाचं काय? आजच उद्या होईल. त्यात काय विचार करायचा.”
उमा तिथून बाहेर गेली.
….. ……. ………. …..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा