अस्तित्व पटकथा भाग २२
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ......
सोमवारी उमा महादेवास जात असे. उमाने अलकास विचारले. व गावाबाहेरील दाट राईत असलेल्या देवदर्शनास अलका, अवंतिका, वासवी व उमा गेल्या. देवदर्शन झाल्यावर त्यां परत निघाल्या. वाटेत एक चोर एका स्त्रीचे मंगळसूत्र चोरुन निघाला होता. उमाने हेरुन आपले पूजेचे ताट अलकाकडे दिले. व वाटेने जाणाऱ्या आजोबांच्या कडील काठी घेतली. व फेकून मारली ती लागून तो पडला लोकांनी त्यास चोपले. त्याकडील मंगळसूत्र त्या स्त्रिस दिले.
ती स्त्री, “गुणी ग माझी बाय, माझं आहेव लेणं वाचवलस तू. परमेश्वर तुझे कल्याण करु देत.”
उमाने एक स्मितहास्य केले. व ती निघाली. अलका व मुली आश्चर्य चकित झाल्या. पुढे गेल्यावर.
अलका, “काय वहिनी किती गुपिते लपल्यात तुझ्यात.”
उमा, “ यात कसलं आलंय गुपित.”
अवंतिका, “काकी आम्हाला पण शिकव ना.”
वासवी, “ मला पण.”
उमा, “शिकवेण की, चला आता घरी उशीर होईल.
…… …… …..
दुसऱ्या दिवशी वाड्यातील माळ्यावर वासवी काहीतरी शोधत होती. खाली उभा असणार अवंतिकास
“ हे घे, फेक खिडकीतून बाहेर.”
वासविने दिलेली काठी खिडकीतून बाहेर फेकली. अशा तीन काठ्या फेकल्या. त्या काठ्यांच्या आवाजाने येसाजी जो बागेतील पेरू काढत होता. त्याने ती काठी नारळी खाली येऊन पडलेली पाहिली. इतक्यात माळ्यावरून लपत छपत त्या दोघी खाली उतरल्या. व जिन्याने मागील दरवाजा जवळ उतरुन परसात पळाल्या. व त्या काठ्या त्या दोघींनी घेतल्या. व त्या दोघी निघाल्या. परसामागे थोडे अंतर गेल्यावर एक वावर होते. पावसाळ्याचे चार मास सोडले. तर रिकामेच असे. त्या ठिकाणी त्या गेल्या. तेथे अलका नी उमा वाट पाहत होत्या. या काठ्या घेऊन काय करणार ही जीज्ञासा जागृत होऊन येसाजी त्यामागे गेला. त्याने वावराशेजारील एका जाळीतून पाहिले. तेव्हा त्यास उमा काकी मुलींना लाठी काठी शिकवताना दिसली. ते बघून तो मागे पळत गेला. पलीकडील रानात खेळणात्या कार्तिक व तानाजीस त्याने सर्व सांगितले.
तानाजी, “ काय खरंच.”
येसाजी, “तर काय, कशी भिंगरीगत काठी फिरवत होती.”
कार्तिक, “चल पाहुया.”
ते तिघे तिकडे निघून गेले. त्यांनी देखील पाहिले. त्या तिघींना काकी लाठी काठी शिकवत होती. तिचे काठी फिरवणे पाहून ती चकित झाली. व मागे त्यांना न दिसता आपल्या खेळण्याच्या जागेवर आली.
तानाजी, “ दादा काकी जेवढी शांत वाटते. तेवढी ती शांत नाहीये. “
कार्तिक, “जेवण पण खूप छान बनवते. मला फार आवडतो. स्वयंपाक तिच्या हातचा.”
येसाजी, “काका आमचा भाग्यवान आहे म्हणेनास.”
तानाजी, “असली काकी दिवा घेऊन शोधूनही सापडणार नाही.”
येसाजी, “पण ती ताईला व आत्तीला काठी चालवायला का शिकवत आहे.”
येसाजी, “तुझं डोक फोडायला.”
तानाजी, “बापरे, आता काय करायचं.”
कार्तिक, “ अरे वेड्या, काकी त्यांना स्वतःच्या रक्षणाचे धडे देत आहे.”
तानाजी, “ अस होय. मग काय भारीच हाय की. आपण पण जाऊयात की शिकायला.”
कार्तिक, “ आधी थोडं दिवस पाहूया. नंतर मग शिकूया. नाहीतर काकी लाजून शिकवायचं थांबवायची.”
तानाजी, “ बरं.”
……… ……… …………
एके दिवशी रात्री लक्ष्मीबाईंना रात्री स्वप्न पडले. स्वप्नात जगन्नाथ पुरी, रामेश्वर, द्वारका, बद्रीनाथ दिसू लागले. . ती दचकून जागी झाली. तिने नवऱ्याला उठवले. व स्वप्नाबाबत सांगितले.
लक्ष्मीबाई “ या संसाराच्या व्यापात देवधर्म करायचे राहिलेत.”
सदाशिवराव, “ मग आता करूया.”
लक्ष्मीबाई, “ अस म्हणता, मग ठरवू जायचं.”
सदाशिवराव, “ पण जाण्यापूर्वी इथली व्यवस्था नीट लावायला हवी.”
लक्ष्मीबाई, “ हा, ते तर आहेच.”
सदाशिवराव, “ चल, झोप आता.”
ते झोपी गेले.
…….. …….. ……..
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाईंनी घरातीलसर्व व्यवहार नीट लावून देतात. आपले आवरुन सर्वांना बोलावून.
लक्ष्मीबाई, “ हे पहा, आम्ही दोघेजण तीर्थयात्रेस जाणार आहोत. आम्ही नसताना मी सांगितले तसे सर्वांनी राहायचं. उद्यापासून घरातील स्वयंपाकाचे काम उमा पाहील. तसेच शेतीचा व्यवहार मल्हारी पाहील. पेढीवरील व्यवहार जयसिंग व प्रताप पाहील. व त्यावर मल्हारी देखरेख ठेवेल. जर दुकानात गैर मेळ दिसला तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात राहावं. सरला बाहेरील दळप कांडप, धुणीभांडी करेल. शिवण्णा जनावरांची वैरण व शेताकडे लक्ष देईल. व राहिल्या पार्वती व सरस्वती या शेण व धारा पाहतील. व शेतावर जाणाऱ्या माणसांच्या भाकऱ्या करतील.”
कमरेच्या किल्ल्यांचा जुडगा काढत
लक्ष्मीबाई, “अलका, हे घे किल्ल्या तुझ्या ताब्यात. नीट लक्ष ठेव. काय?”
अलका, “ हा आई.”
लक्ष्मीबाई, “ समजलं काय?”
सर्वजण, “हो.”
ते आपले आवरून बाहेर पडतात. मल्हारी गाडी काढतो. व त्यांना सोडायला जातो.
…. ….. ……
मल्हारीने गाडी काढली. मागील डिक्कीत सर्व साहित्य ठेवले. मुले आजा आजीच्या मायेने जवळ आली.
लक्ष्मीबाई, “ हे बघा, भांडयाचं नाही. अन् काकीला मदत करत जावा. नाहीतर त्या तुमच्या आया तिला त्रास देतील. अन् काळजी घ्या. “
येसाजी, “ आजी , परत कधी येणार.”
आजी, “ येईन लवकरच. “
गाडी स्टार्ट होते. लक्ष्मीबाई व सदाशिवराव यांना सोडायला मल्हारी जातो.
….. ……. ….
सासू सासरे गेल्यावर पार्वती व सरस्वती एका खोलीत गेल्या.
पार्वती, “ गेली महाराणी. “
सरस्वती, “ पाहिलंस जेवणाच काम उमेला, अन् आम्ही काय शेण धारा काढायच्या.”
सरस्वती, “ही गेल्यावर वाटलं काहीतरी हातात सत्ता येईल.तर.”
पार्वती, “ सत्ता विसरा. वॉचमन आहे डोंबलावर आमच्या ही अलका कधी लगीन होऊन जातीय कुणास ठाऊक.”
सरस्वती, “तर काय अन् ही पोरं आम्ही काढली असून देखिल त्या काकाच्या मागणं.”
इतक्यात तिथे कार्तिक येतो. त्याची बॅट घ्यायला.
कार्तिक, “मी ऐकलंय सगळं आजीला सांगेन आल्यावर.”
पार्वती, “मोठा शहाणा आलाय, आजीला सांगणार चोमडा.”
कार्तिक, “तुम्ही वागा ना नीट, मग मिळेल की सत्ता हातात. पण त्याला सुद्धा भाग्य लागतं.”
पार्वती, “ थांब तुला दाखवतेच इंगा. आजीचा चोमडा.”
ती तांब्यावरील पेला फेकून मारते तो पेल्याचा मार चुकवतो व पळून जातो.
…… …….. ……. …….
दुसऱ्या दिवशी सकाळी पाचचा गजर होतो. जयसिंगराव व सरस्वती झोपलेल असतात. गजर होताच.
जयसिंगराव, “अगं, उठ त्या धारेच बघ जा.”
सरस्वती, “ अजून वेळ आहे गप्प झोपा.”
जयसिंगराव, “अगं, शेण काढून धारा काढायला वेळ होतो. डेरी जाईल.”
सरस्वती, “पार्वती ताई उठतील.”
जयसिंगराव, “हे बघ, धारा निघाल्या नाहीत तर जड जाईल बघ.”
सरस्वती, “काय धारा धारा लावलय. झोपा गप.”
इकडे पार्वतीचा नवरा देखील तिला उठवत असतो. ती देखील सरस्वती धार काढेल झोपा म्हणते. व झोपी जाते.
कोणीही न उठल्याने धारेची वेळ झाल्यावर गाय हंबरू लागते. तिचे ओरडणे ऐकून उमा उठली. ती गोठ्यात गेली. शेण मागे सारुन धार काढायला बसली. त्याचवेळी अलका देखिल उठली. तिने उमाला धार काढायला गेल्याचे पाहिले. ती जवळ जाऊन म्हणाली.
“तू का धार काढतेस. त्या महाराणींना काढू देत की.”
उमा, “ अगं, आपलं घर, त्यात कशाला वाटणी घालायची. व ताईन जर वेळेत धार नाही काढली. तर मुक्या प्राण्यांचे हाल. त्यापेक्षा आपणच काढलेली बरी.”
ती धार काढून जेवण खोलीत गेली. अलका झाडू घेऊन लोटू लागली. वासवी व अवंतिका देखील मदत करु लागल्या. त्यांनी सर्व स्वच्छता करुन अंगणात रांगोळी घातली. तोपर्यंत उमाने अंघोळ आटोपली. व ती स्वयंपाक करायला लागली. तोपर्यंत साडेसात वाजले होते. पार्वती व सरस्वती अजून झोपल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात होते. उमाने चहा बनवून सर्वांना पाठवून दिला. मुलांना दूध दिले. मल्हारी देखील उठला होता. त्यास तिने दूध दिले. व उमा जेवण करु लागली. थोड्या वेळाने पार्वती व सरस्वती उठल्या. व तोंड धुवायला न्हाणी घरात गेल्या. त्यांना पाहून
अलका, “ काय वहिनी धार काढलीस, दूध हवं होतं चहासाठी.”
त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. सरस्वती चरवी घेऊन…
सरस्वती, “ अगं बाई, विसरलेच की,”
ती धार काढायला गडबडीने जाताना पाहून.
अलका, “ काढल्या धारा. आता शेण तेवढं काढा म्हणजे झालं. नाहीतर जेवणाचं विसरा.”
सरस्वती, “एवढं काही बोलायची गरज नाही ताईसाब. “
अलका, “आपलं काम जबाबदारीनं करावं माणसानं.”
त्या दोघी गडबडीत शेण काढायला गेल्या. पार्वती शेणावरून घसरून पडली.
पार्वती, “आई गं, पडले गं.”
सरस्वती, “ ताई लागलं तर नाही ना.”
पार्वती, “बोलत काय बसलीस, उचल की.”
ती तिला उचलून घेऊन आत जाते.
…. ……… ……
क्रमशः पुढे......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा