शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २७

 अस्तित्व पटकथा भाग २७,


फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

इकडे अपघात झालेल्या गाडीवर दगड मारा होताच. जयेश व त्याचे मित्र गाडी तेथे टाकून पळाले. थोडे अंतर गेल्यावर सुरक्षित आहोत हे जाणल्यावर जयेशने आपल्या घरी फोन केला.

जयेश, “हॅलो , हॅलो.”

बाबा, “ बोल कोण जयेश, कुठे आहेस. असा घाबरल्यासारखा आवाज का येतोय तुला.”

 जयेश, “बाबा, गाडीचा अपघात झाला आहे. मी शहराबाहेर रिंग रोडला आहे.”

जयेशने घडलेली घटना सांगितली.

बाबा, “ हे बघ, थांब तिथे, आलो लगेच.”

थोड्या वेळात जयेशचे बाबा येतात. साधूंची पाहणी करुन त्यांना हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार करतात. ड्रायव्हरला इशारा करुन ती गाडी कुणाला कळायच्या आधी घेऊन जायला सांगतात. आणखी एका कर्मचाऱ्यास जयेशला शोधून घेऊन जायला सांगतात. कर्मचारी ती गाडी घेऊन निघतो. इतर साधूंच्या भोजनाची व्यवस्था करतात. कर्मचारी अरुणला फोन करुन 

बॉस, “ हॅलो अरुण.”

अरुण, “हा बोला सर.”

बॉस, “ अरुण गाडी थेट आपल्या गोडाऊन शेजारील सर्वेक्षण विभागात जाऊ दे.”

अरुण, “ जी सर, पण काच बदलायला हवी.”

बॉस, “ ते तिथेच करु, आपल्या ओळखीचे स्लाईडिंगवाले बोलावून, उगाच शंका नको.”

अरुण, “ जी सर.”

अरुण गाडी घेऊन थेट सर्वेक्षण विभागात जातो. ज्या ठिकाणी कंपनीचा मोठा सर्वेक्षण विभाग असतो.”

त्या ठिकाणी गाडी आतील बाजूस पार्क केली जाते. अरुणने तेथील विभाग कर्मचाऱ्यास तिची किल्ली दिली. तो त्यास म्हणाला, “ गाडी नंबर सिक्स.”

अरुण पार्किंग एरियात त्या दुसऱ्या सहा नंबरवाल्या गाडीची चावी घेऊन आला. व ती गाडी घेऊन निघून गेला.

…….. ……… ………

बॉसने पाठवलेली दुसरी गाडी वरुण घेऊन थोडं पुढे गेला. त्याने कॉल केला. रिंग वाजू लागली. जयेशने फोन उचलला. “ हा बोला.”

वरुण, “ जयेश बाबा कुठे आहेत. मी वरुण बोलतोय.”

जयेश, “ पुढे थोड्या अंतरावर रानात आंब्याखाली.”

वरुण, “मी आता वळणावर पुलाजवळ आहे. तुम्ही कोठे आहात?”

जयेश, “तिथून खाली पुढे जवळचं.”

 वरुण, “ मी लोकेशन पाठवतो. तिथे या.”

वरुण लोकेशन पाठवतो. जयेश आपल्या मित्रांना घेऊन त्या दिशेने जातो. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचले. वरुण गाडीचे दार उघडतो. ती गाडीत बसतात. दार लॉक होते. गाडी निघते. थोडे अंतर गेल्यावर वरुणला फोन येतो. वरुण गाडी चालवत फोन घेतो.

वरुण, “हॅलो सर, बोला.”

बॉस, “जयेश मिळाला का?”

 वरुण, “ हो.”

बॉस, “ त्यांना थेट फार्म हाऊसवर घेऊन जा.”

वरुण, “हा सर.”

ती चौघे भेदरलेल्या अवस्थेत होती. 

जयेश, “ काही घाबरण्यासारखं नाही ना. त्यातील एखादा साधू ..,”

वरुण, “ थोडे जखमी झालेत. बॉस पाहतील ते. तू निश्चित रहा.”

 जयेश, “ आपण कोठे चाललोय.”

वरुण, “ ते पोहोचल्यावर कळेलच.”

गाडी वेगाने फार्म हाऊस रोडला लागते.

…………… ……..

क्रमशः पुढे ........































































शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २६

अस्तित्व पटकथा भाग २६




अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

क्रमशः पुढे चालू 

 चार धाम यात्रेला गेलेली सदाशिवराव व लक्ष्मीबाई जगन्नाथपुरीला पोहोचली. त्यांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. व मुक्काम केलेल्या ठिकाणी आलीत. तिथे आल्यावर.

लक्ष्मीबाई, “ कशी असतील हो आपली मुलं, काय करत असतील. “

सदाशिवराव, “ असतील मजेत, आता काय ती लहान आहेत. थोडीच. कशाला उगाच काळजी करतेस.”

लक्ष्मीबाई, “तसं नाही हो. तुम्हाला त्या दोघींचे स्वभाव माहीत आहेत ना? उमाला पटवून घेणार नाहीत हो म्हणून.” 

सदाशिवराव, “ अलका आहे ना.”

लक्ष्मीबाई, “हो, पण ती आता किती दिवस, तिचंही लग्नाच बघायला हवं.”

सदाशिवराव, “ इथून गेल्यावर बघू, एखादं स्थळ, चला आता प्रसाद घेऊ व पुढील यात्रेस लागू.”

लक्ष्मीबाई, “हो चला, जय जगन्नाथ भगवान की.”

सदाशिवराव, “ जय,”

ती निघतात.

……. ……… …….

एका शहरात एका हॉटेल मध्ये एक पार्टी चालू आहे. तेथे तरुण व तरुणी जेवत आहेत. ती जयेश नावाच्या मुलास लांब नाईट पब मध्ये जाण्यासाठी कन्व्हेन्स करतात. तो आपली टू व्हीलर घेऊन निघतो. व आपल्या वडिलांच्या बिझनेस कंपनी ऑफिस मध्ये येतो. ऑफिस मध्ये हिरालाल पांचाल काम करत असतात. इतक्यात गाडी पार्क करुन जयेश आत आला.

जयेश, “ बाबा, चावी द्या.”

हिरालाल, “ नाही, मला हवी आहे. घरातील दुसरी घेऊन जा.”

जयेश, “ नको, मला हिच हवी आहे.”

तो इकडे तिकडे पाहतो. ऑफिस मधील टेबलावर त्याला किल्ली दिसते. तो ती चटकन घेतो. व निघतो. त्याचे वडील ओरडत असतात. पण त्यांकडे लक्ष न देता तो निघून पार्किंगमध्ये असलेली गाडी घेऊन जातो. हॉटेल बाहेर त्याचे मित्र उभे असतात. 

साहिल, “काय हे, किती उशीर यार.”

जयेश, “ काय करणार यार गाडी बाबा ऑफिसला घेऊन गेले होते. “

सुकन्या, “तुझ्या बाबांना सांगितलं नाहीस ना.”

जयेश, “ छे, नाही, चला बसा लवकर वेळ झालाय.”

त्याचे मित्र बसतात. तो वेगाने गाडी चालवतो. दूर शहरातील एका डिस्को पबमध्ये आवारात गाडी पोहोचली. गाडी थांबली. त्यातून ते आधीच झिंगलेल्या वेड्यावाकड्या अवस्थेत त्या पब मध्ये जातात.

 त्यातला एकजण, “ अरे यार, माझ्याकडे पैसे नाहीत.”

दुसरा, “चल यार, जयेश भरेल ना. तो असताना कशाला काळजी करतोस यार.”

 ती आतमध्ये गेली. जयेश एन्ट्री फी भरतो. व ती दारू पित सिगारेट ओढत धुंद होऊन नाचू लागलीत.”

थोड्याच वेळात जयेशचा फोन खणखणू लागला. त्याने फोन उचलला. व लगेच आपल्या मित्रांना इशारा केला. ते लागलीच पबच्या मागील बाजूने बाहेर पडले. जयेशने लगेच आपली गाडी पार्किंग मधून काढली. व वेगाने तो निघाला. त्याची गाडी बाहेर पडताच वेगाने निघाला. त्याची गाडी निघताच. एक पोलिस व्हॅन वेगाने तिथे दाखल झाली. दुसरी गाडी जयेशच्या गाडीच्या मागे लागली. त्या गाडीस चकवा देऊन तो खूप दूर गेला. नगराबाहेर गेला. सकाळ होऊ लागली. एक साधूंचा जथ्था वाटेने चालला होता. त्याने जथ्थ्यामध्ये गाडी घुसवणार इतक्यात ब्रेक मारला. तरी देखील काही साधूंना ठोकर बसल्याने जखमी झाले. त्यातील एका साधूने चिडून एक दगड फेकून मारला. व त्यांना सर्वांनी बेदम चोप दिला. गाडीचा हॉर्न एकसारखा वाजू लागला.

……. ……. …….. …… 

सूर्यगावातील एका घरात एक स्त्री आजारी आहे. ती खाटेवर झोपलेली होती. तिची मुलगी रानात आई आजारी असल्याने वांगी तोडण्यास गेली होती. तेव्हा गावातील एक गावगुंड राकेश तिथे आला. त्याने तिची छेड काढली. व तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती ओरडू लागली. त्याचवेळी मल्हारी आवाज ऐकून तिथे गेला. व त्यास खूप बदडले. व पिटाळून लावले. तो जाताना मल्हारीस तुला पाहून घेतो. सोडणार नाही. अशी धमकी देऊन गेला. 

…….. ……. ……..

क्रमशः पुढे ........

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २५

 अस्तित्व पटकथा भाग २५


अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,


क्रमशः पुढे चालू.......

घरात आणलेली केळी मल्हारीने ठेवल्याचे अवंतिका व वासविला दिसले. उमा व मल्हारी रूममध्ये असताना वासावी व अवंतिका त्या घडातील दोन दोन केळी घेऊन परस बागेत गेल्या. विहिरीच्या ओट्या शेजारी बसून खात असताना येसाजीस समजले. 

येसाजी, “वाव, केळी , आम्हाला पण हवी.”

वसावे, “ जरा कुठे खाऊ लागलो की लगेच आले हावरट पणा करायला.”

कार्तिक, “तोंड आवर वासवी मोठ बारकं काही आहे की नाही.”

वसाव , “ आहे की, आम्ही काय तुझ्यासारखे नाही. दुसऱ्याच्या हातात दिसेल ते मागायला.”

कार्तिक, “ बरं सांग, ही केळी कुठून आणली ते?”

अवंतिका, “ घरात आहेत, काका काकूंच्या पलंगाखाली.”

तानाजी, “ काय?”

वासवी, “खरंच, मी तिथूनच आणलीत.”

येसाजी, “ चला रे, जाऊन बघूया आत.”

ती पळत घरात जातात. ती गेल्यावर.

वासवी, “ कशाला सांगितलस पलंगाखाली घड आहे ते, आता संपवतील ते.”

 अवंतिका,” हं.., याना सापडतात. केळी उशीर झाला लपवून ठेवलीत.”

 वासवी, “ते पण खरं आहे. पण तू काका व काकूंकडे का लावुन दिलेस.”

 अवंतिका, “अगं, काकांनी काही केळी त्यांच्या रूममध्ये नेली होती.”

 वासवी, “चल आपण देखिल जाऊन बघू आपल्याला आणखी एखादं मिळालं तर.”

त्या देखील गेल्या. मुले मल्हारीच्या खोलीत वाकून पाहतात. तो व उमा यांना केळी खाताना पाहून.

येसाजी, “काका , शोभत का हे.”

मल्हारी, “ काय झालं.”

येसाजी, “ अस लहान मुलांपासून चोरुन लपवून केळी खाता.”

मल्हारी, “ शोभतं की.”

तानाजी, “ तुम्ही आम्हाला विसरला की काय?”

मल्हारी, “हो.”

 कार्तिक, “ अस चोरुन केळी खाणे बरे नाही. आम्हाला पण केळी हवीत.”

 उमा, “ही घ्या.”

मल्हारी, “ नाही द्यायची. तू खा.”

 तानाजी, “ काकीचा गुलामच झालास की, तुझ्यासारख्या पहिलवानाला हे शोभत नाही.”

मल्हारी, “वा रे वा, सकाळी रगडून जेवला तुम्ही, व काकीला उपाशी ठेवला. तेव्हा कुठे होता?”

कार्तिक, “ काय काकी उपाशी आहे?”

मल्हारी, “ हो, म्हणूनच मी केळी आणलीत .“

जवळ जात.

तानाजी, “ काय ग, तू जेवली नाहीस.”

 उमा, “ जेवले की आताच, खाल्ली की केळी. घ्या ही.”

येसाजी, “खरंच घेऊ?”

उमा, “ हो.”

तरी पण ती दचकतात. व त्यातील दोन दोन केळी घेऊन बाहेर खेळायला जातात.

…………. ………. ……….

थोड्या वेळाने मल्हारी रूममधून बाहेर आला. त्याला पाहून पार्वती व सरस्वतीचे तोंड पडलेले होते. त्याचवेळी अवंतिका व वासवी तिथे येते. मुलांचा दंगा ऐकून अलका जागी झाली. व खालील खोलीत आली.

अवंतिका व वासविला कळले होते की त्यांच्या आया काय कारनामे करतात. त्याचवेळी पार्वती त्यांना म्हणाली, “वासवी, पाहिलंस का कशी केळी चोरुन खाल्ली जाताहेत ते.”

वासवी, “ माहिती आहेत. की मला.”

पार्वती, “ आता तरी कळलं का? आपलं कोण आणि परक कोण ते.”

वासवी, “ हो कळलं, की” 

पार्वती, “ काय कळलं .”

वासवी, “ कळलं की तू कशी जेवण लपवून ठेवतेस. काकीला कशी उपाशी ठेवतेस. एवढा पराक्रम तू करुन देखील तुझ्या मुलीला दोन केळी का असेना खायला दिलीत. तुझ्यात व त्यांच्यात खूप फरक आहे.”

सरस्वती, “गप्प ग, नालायक कुठली. मोठ्या माणसांना असं उलट बोलतात का?”

वासवी, “ कळत की? पण तुलाही कळयलं हवं काकीला उपाशी ठेवून आपण तुपाशी राहणं बरं नव्हे. “

पार्वती, “ देवळात नेलेला नेवैद्य खाल्ला ना तिने.”

अवंतिका, “कुणी सांगितलं तुला, की नैवेद्य तिने खाल्ला म्हणून, आम्ही तो रस्त्याकडेच्या भुकेलेल्या भिकाऱ्याला दिला.”

 अलका, “बरं तो खाल्ला असेल वा नसेल. तुला वाहिनी नको तो उद्योग करायला सांगितला कुणी.”

त्या गप्प बसल्या.

……… …… ……….

पावसाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पावसाने त्रस्त झालेली भटकी कुत्री निवारा शोधत गावाबाहेरील जुन्या घाटमार्गातून जाणाऱ्या रस्त्याने निघाली होती. त्या वाटेत एक गुहा होती. त्या गुहेत प्राचीन काळापासून अनेक पांथस्थ विसावा घेत असत. पावसाळा व हिवाळा ऋतूत अनेक प्राणी निवाऱ्यासाठी तिथे थांबत. रात्रीच्या वेळी एका सशाची शिकार करुन काही कुत्री त्या गुहेत भांडत शिरलीत. त्यांच्या भांडणात गुहेतील काही दगड बाहेर गुहेच्या तोंडाशी येऊन पडले. थोड्या वेळाने त्यांचे भांडण त्या सशाच्या फडशा पाडल्याने संपले. तो ससा मटकावून थोड्या वेळाने ती कुत्री निघून गेली.

थोड्या दिवसांनी त्या वाटेवरून एक साधूंचा जथ्था नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निघाला होता. कोकण विभागातून जंगलपट्टा पार करुन ते घाटभागातील सूर्यगावी आली होती. व त्या गुहेत थांबली. तिथे भजन , कीर्तन, भोजन करुन त्यांनी विश्रांती घेतली. व दुसऱ्या दिवशी ते निघाले. जाताना त्यातील एका साधूने त्या गुहेतील कुत्र्यांच्या पायाने आलेल्या दगडातील एक दगड मोह निर्माण झाल्याने उचलून आपल्या झोळीत टाकला. व तो जथ्था निघाला. त्यातून मार्गस्थ झाला.

……… ………….