अस्तित्व पटकथा भाग २३
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
एके दिवशी एक साधू भ्रमंती करत सूर्यगावात आला. खूप चालल्याने तो थकला होता. गावाशेजारील डोंगरात एक गुहा होती. ते त्याला समजले होते. त्या रात्री त्याने तेथे विश्रांती घ्यायचे ठरवले होते. दिवस मावळायच्या आधीच तो अन्न भक्षण करीत असे. त्या दिवशी त्याने रात्र पाणी पिऊन सूर्यगाव जवळील गुहेत काढली. सकाळ झाली. त्यास खूप भूक लागलेली होती. तो चारिका करत गावात भिक्षा मागू लागला. परंतु त्यास कोणीही भिक्षा दिली नाही. कारण काही दिवसापूर्वी काही साधूच्या वेशात गावातून फिरुन काही चोर लोकांनी रेकी केली. व दुसऱ्या दिवशी गावातील काही घरात चोरी झाली. व ते पळून गेले होते. जिथे तिथे कट्यावर लोक बसून याच विषयावर चर्चा करत चांगल्याचा जमाना राहिला नाही. साधू संन्याशी असे वागू लागले तर कस व्हायचं. कुणावर विश्वास ठेवायचा. या विचाराने गावात त्यास कुणी भिक्षा दिली नाही.
ज्याच्या दारी जाई, जो तो हाकलून लावत असे. भुकेने तो व्याकुळ झाला होता. तसाच तो पाटील वाड्यावर गेला. मल्हारी शेतावर गुऱ्हाळ काम असल्याने गेला होता. मुले सुद्धा त्यासोबत गेली होती. शिवांना देखील जेवण द्यायला शेताकडे गेला होता. अलका, उमा व मुली सोमवार असल्याने शिवपूजा करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या.
घरात पार्वती व सरस्वती या दोघीच होत्या. दुपारची वेळ होती. उन्हाच्या झळा मारत होत्या. साधू भिक्षा मागण्यासाठी वाड्यावर आला. त्याने हाक मारली.
साधू, “ भिक्षा दे माई.”
त्याने दोन तीन वेळा हाका मारल्या. उन्हाने त्यास खूप तहान लागली होती. जवळील पाण्याच्या हौदावर तो पाणी पिण्यासाठी वाकला. इतक्यात पार्वतीने पाहिले.
पार्वती, “ ऐ काय करतोस इथे, चोरटा आहेस वाटतं.”
तिचे बोलणे ऐकून तो दचकला व मागे वळून पाहिले.
साधू, “ नाही ताई मी काही चोरत नाही. तहान लागलीय म्हणून पाणी पितोय.”
पार्वती, “ मला माहितेय तुम्हा गोसाव्यांचे नखरे, मागे देखील असेच गोसावी येऊन गेले. अन् गावात चोऱ्या झाल्या. पाणी हवं तर मागायच. “
साधू, “ माफ करा. थोडं पाणी घेतो. थोडा सिधा द्या. “
त्याचवेळी सरस्वती बाहेर आली.
सरस्वती, “ काय झालं ताई,”
पार्वती, “ अगं, कोण गोसावडा आलाय भिक्षा मागत. मघाशी त्या पाण्याच्या हौदाजवळ काय करत होता.”
सरस्वती, “गोसावी की चोर कोण जाणे. द्या हाकलून.”
पार्वती, “ ये चालता हो इथून.”
त्यांनी त्या गोसाव्याला हाकलले. त्याला केलेल्या धक्काधक्कीत त्याच्या हातातील कमंडलू सांडले. तो निराश होऊन वाटेला लागला. निर्जळी उपासाने शरीर अशक्त झाले होते. त्यात हे उपोषण घडले. व पाणी सुद्धा मिळाले नाही. त्याने कुठलेतरी नदी नाल्यातील पाणी प्यायचे व निघायचे ठरवले. पण थोडे अंतर गेल्यावर त्यास उन्हाने चक्कर मारू लागली. तो खाली पडला. त्या रागात त्याने या गावावर भयंकर अरिष्ट येईल असा शाप दिला.
याचवेळी उमा व मुली देवदर्शनाने परत येत होत्या.
उमा व तिच्यासोबत अलका, वासवी व अवंतिका देखील होती. मंदिरात जाऊन यायला आज खूप उशीर झाला होता. आज आद्य पूजा कोणीतरी केली होती. उमाने बिल्वपत्रे व श्वेत फुले वाहिली. व वांग्याचे भरीत दहीभात व तांदळाची भाकरी नेवेद्य आणला होता. तिने नेवैद्यातील एक घास काढून ठेवला. विभूती लावली. पूजा आटोपून त्या लगबगीने घरला निघाल्या. वाटेवर तो रस्त्याकडेला पडलेला साधू दिसला.
अवंतिका, “काकी ते बघ कोण पडलय.”
अलका, “ अंगावर भगवी वस्त्रे आहेत. कोणी साधू तर नसावा.”
उमा, “ चल बघू.”
त्या साधूजवळ आल्या उमाने ताट वासवीकडे दिले. त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्याच्या हातापायांना धरुन बाजूला एका सावलीत नेले. पाणी पाणी म्हणत तळमळणाऱ्या साधूच्या मुखात त्यांनी पाण्याची धार धरली. पाणी पिल्याने त्यास बरे वाटले. उमास तो भुकेला आहे हे जाणवले. तिने वासवीकडील प्रसादाचे ताट घेऊन त्यास तो नेवैद्य दिला. त्याने तो नैवेद्य खूप दिवस भुकेला असल्यासारखा खाल्ला. त्यास अतिशय बरे वाटले. त्याने उमास हात जोडले. उमाने तसे न करण्यास सांगून त्याचे पाय धरुन नमस्कार केला. मुलींनी ही नमस्कार केला. कल्याण नमस्तू असा आशिर्वाद त्याने दिला. त्या तो बरा आहे हे पाहिल्यावर तिथून निघाल्या.
जाताना त्याने विचारले. “ साक्षात देवरूप आहात. तुम्ही कुठे राहता?”
अलका, “आम्ही होय याच गावात राहतो. गावाबाहेर मोठा वाडा आहे ना, तेथेच आम्ही राहतो.”
त्या पुढे वळण पार करुन गेल्या. त्या साधूला रडू आले. “ रागाच्या भरात आपण हे काय करुन बसलो. श्राप दिला. परमेश्वरा वाचव रे बाबा.”
पण काही उपयोग नव्हता. तो साधू थोडा शांत बसला. व थोड्या वेळाने मार्गस्थ झाला.
…….. …… ………..
क्रमशः पुढे.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा