रविवार, ७ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १६

 

अस्तित्व पटकथा भाग १६

अस्तित्व पटकथा भाग १६, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

गणपतरावांकडे श्यामभट्ट आले. व त्यांची पसंती विचारायला.

श्यामभट्ट, ( अंगणात येत.)” पाटील आहित का?”

गणपतराव, “कोण? भटजी बुवा. या की.”

श्यामभट्ट पायरी चढून वर आले. बाकड्यावर बसले.

गणपतराव, “ अहो, ऐकलंत का? चहा टाका, भटजी बुवा आलेत.”

शकुंतलाने चहा गड्याकडून पाठवला व ती ही आली.

चहा घेत.

भटजी, “ बरं, काय ठरलं. तुमचं मागल्या स्थळाबद्दल.”

गणपतराव, “ उमा, काय सांगायचं स्थळाला.”

उमा, “ तुम्हीच ठरवा, मी काय सांगणार.”

शकुंतला, “ सांगा होकार. पण…..”

गणपतराव, “ पण काय आणखीन.”

शकुंतला, “ मी म्हणते, नवऱ्याच घर एकदा पाहिलं असतं तर…..”

गणपतराव, “जाऊ की.” ( पुजाऱ्यांकडे पहात.) “ काय म्हणता?”

 श्यामभट्ट, “ तर काय? जायलाच हवं. उमाला द्यायची म्हंटल्यावर, बरं मी तसं कळवतो.”

……. ………..

श्याम भट्टानी निरोप मधुकर पुजारी यांना दिला. की ते नवऱ्याचे घर पहायला येणार आहेत. म्हणून. दिवस ठरवून पुजारी बुवा वाड्यावर गेले. वाड्यावर सुनबाई पार्वतीकडे निरोप सांगितला. तिने घरातील बाहेर गेलेत. सांगेन असे सांगून तिने निरोप दिलाच नाही. शकुंतला, गणपतराव व श्याम भट्ट ठरल्यानुसार सूर्यगावला आले. त्यावेळी मल्हारी शेतावर तर लक्ष्मीबाई व सदाशिवराव शेजारील गावात देव दर्शनास गेले होते. अंगणात गाडी पोहोचली. वाळवण दारात घातलेलं होतं. बाहेर गोठ्यात जनावरांना शिवण्णा वैरण घालत होता.

शकुंतला, “ बाहेर कोणच दिसतं नाही. हेच घर ना, नाहीतर चुकीच्या घरात घुसायचो.”

श्याम भट्ट, “अहो, वाहिनी हेच ते घर. मधुकर पुजाऱ्यांच सांगण चुकायच नाही.”

गणपतराव, “अहो, पण पुजारी बुवा कुठे आहेत?”

श्याम भट्ट, “अहो, शेजारील गावी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तिथे अडकलेत ते. येतीलच थोड्या वेळात”

 इतक्यात शिवण्णा समोर येत.

शिवण्णा, “ कोण पाहिजे?”

श्याम भट्ट, “ मल्हारी सदाशिव पाटलांचं घर हेच ना.”

शिवण्णा, “हो, काय हवय.”

श्याम भट्ट, “ आसगावाहून पाहुणे आलेत. म्हणून सांगा . घर पहायला.”

शिवण्णा, “या की, पण मालक व मालकीण बाहेर गेलेत. व मल्हारराव शेतावर. “

कार्तिक व येसाजी तिथे जवळच खेळत होते. ते

कार्तिक, “शिवाकाका कोण आलंय?”

 शिवण्णा, “ आपल्या धाकल्या धन्यासाठी आलेत ते. घर पहायला.”

कार्तिक, “काय, काकांना पहायला.”

शिवण्णा, “हो.”

 कार्तिक, “येसाजी घरात सांग जा. मी काकांना बोलावून आणतो.”

कार्तिक सायकल घेऊन शेताकडे गेला. येसाजी घरात गेला. व त्याने आपल्या आईकडे निरोप दिला.

पार्वती, “अगं बाई, अहो जाऊबाई ऐकलत का, पाहुणे आलेत.”

सरस्वती, “हो, ऐकलं,” “ बर बाळ जा व तुज्या बाबांना व काकांना बोलावून अन् जा.”

शिवण्णा त्यांना आत घेऊन आला.येसाजीने बाबांना व काकांना बोलावले. व सरू नोकरांनीने पाहुण्यांना पाणी नेऊन दिले.

येसाजीचे बाबा फोन करत होते.

सरस्वती, “ कशाला फोन करताय. तुम्ही फक्त बाहेर बसा. आम्ही बघतो काय करायचं ते.”

जयसिंगराव, “ तुम्ही काय करणार आहात?”

सरस्वती, “ तुम्ही व प्रताप भाऊजी जाऊन बाहेर बसा. आम्ही आलोच फराळ घेऊन.”

जयसिंगराव व प्रताप बाहेर येऊन बसले. पाहुण्यांची चौकशी करू लागले. शिवण्णाने पाहुण्यांना पाणी दिले.

जयसिंगराव, “ घर शोधताना काही त्रास तर नाही ना झाला.”

श्याम भट्ट, “ नाही, मधुकर गुरुजींनी बरोबर पत्ता सांगितला होता.”

जयसिंगराव, “ बरं का हे आमचे बंधू प्रतापराव.”

गणपतराव, “ हा, हे काय करतात?”

इतक्यात पार्वती व सरस्वती काही फळे व सरबत घेऊन आल्या. ते ठेवत.

पार्वती, “ हे आमचे मिस्टर, कृषी क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. सर्व शेती तेच पाहतात.”

सरस्वती, “ या वर्षी तर खूप धान्य पिकवलेय, ऊस, मक्का, तांदूळ, गहू, आमच्या बागा पण आहेत.”

गणपतराव, “ ते आहेच हो, पण तुमचे सासू सासरे कुठे दिसत नाहीत.”

पार्वती, “ते होय , अगं बाई , सांगायचंच राहीलं. ते होय शेजारील गावी देव दर्शनाला गेलेत. अन मल्हार भाऊजी शेतावर. तुम्ही येणार हे माहीत नव्हतं. नाहीतर थांबवलं असतं.”

 प्रतापराव, “बोलवायला गेलाय मुलगा , येईलच इतक्यात. बर तुमची मुलगी."

गणपतराव, “आमची उमा होय, फार गुणी आहे. सर्व घरकाम करते. व …….”

सरस्वती , “ ते माहिताय आम्हाला, घ्या की सरबत. तुमच्या मुलीची ख्याती सर्व गावभर आहे.”

शकुंतला, “ म्हणजे, मी नाही समजलो.”

पार्वती, “ म्हणजे काय, हो, घ्या की, तिला छान झाडावरील कैर्या काढता येतात, पाणी ओढते आडाचे, आंबे व्हळीत पिकत घालते. प्रसंगी मुलाना चेचते पण. सगळ माहित आहे आम्हाला.”

सगळे आवाक होऊन पाहू लागले.

सरस्वती, “ अहो चेष्टा केली, घ्या की.”

शकुंतलाने गणपतरावांच्या चेहऱ्याकडे पहिले.

पार्वती, “ आम्ही फोटो पण पाहिलाय.”

सरस्वती, “ हा थांबा ह.. मी दाखवते.”

तेव्हा तिचे मुलांसोबत खेळत्याले व झाडावरील आंबे काढत्याले फोटो सरस्वतीने दाखवले.”

ते पाहून ती तिघे उठलीत. व नमस्कार करुन निघालीत.

पार्वती, “ अहो, अहो, अस काय? चहा तरी घ्या.”

 जयसिंगराव, “ हे, अस बोलतात.”

 ती गाडीमध्ये जाऊन बसलीत.

गणपतराव, “ ड्रायव्हर गाडी चालवा.”

ड्रायव्हर, “ जी.”

गाडी निघून जाताना.

येसाजी, ( धावत गाडी जवळ येत. व त्यांना उद्देशून)

“ अस, जाऊ नका, आमचे काका लई छान आहे. सुखात ठेवतील काकीला.”

शकुंतला हसली व

“ ठेवेल हा पण …..”

 गाडी निघाली.

इकडे या दोघी एकमेकांना आपले अंगठे दाखवून वेल डन म्हणून हसू लागल्या.

……. …… …….

क्रमशः पुढे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा