अस्तित्व पटकथा भाग १९,
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
लग्न झाल्यावर उमा व मल्हारी सूर्यगावात आले. गावात आल्यावर देवाचे दर्शन घेतले गेले.
पुजारी त्यांकडून पूजेचं साहित्य घेऊन पूजा करतो. ती दोघे देवाच्या नंतर पुजारी काकांना नमस्कार करुन आशीर्वाद घेतात. गावातील अनेक लहान मुले तिथे जमलेली होती. ती हसत होती.
नंतर ती घरी आली. वाड्यावर आल्यावर बाहेर अंगणात खेळणारी मुले पाहून.
येसाजी, “ आर, ते बघा गाडीतून कोण उतरतय.”
तानाजी, “ काका न लगीन केलं वाटतं.”
कार्तिक, “ थोरली आई असल्यावर काहीपण घडू शकतं.”
आजी लक्ष्मीबाई, ( तानाजीस) “ बाळ , आत जा व आईला आरतीचं ताट घेऊन यायला सांग.”
तानाजीने आत निरोप दिला तेव्हा त्याची आई
आई, “ कशाला हवे ताट?”
तानाजी, “ तुमच्या जाऊबाई आल्यात त्यांना ओवाळण्यासाठी.”
त्या दोघी आश्चर्य चकीत होऊन.
“ काय?”
त्या दोघी बाहेर येऊन पाहून.
पार्वती, “ अगं बाई, खरंच की यांनी लग्न केलं.”
सरस्वती, “अगं बाई, माझी हौसच अपूर्ण राहिली, वाटतं होत. दिराच्या लग्नात तरी एखादी पैठणी मिळेल. पण म्हातारीनं गोंधळ घातला.”
पार्वती, “ नाहीतर काय? पाहुणे नाहीत, जेवण नाही, मांडव नाही. काही नाही. लावलं लगीन.”
त्यांना दारापाशी घुटमळतं असल्याचे पाहून.
लक्ष्मीबाई, “ सापडतीया की नाही पंचारती, काय शोधायला पोलिस पाठवू.”
पार्वती, “आले घेऊन.”
“ चल ग.”
त्या दोघी आत जाऊन पंचारती व माप घेऊन आल्या. व औक्षण करताना
पार्वतीने नाक मुरडले. ते पाहून.
नणंद अलका, “ काय वहिनी नाक कुठे, तोंड कुठे, जरा नीट होऊ दे.”
पार्वती, “हूं….”
त्यांनी औक्षण करुन नवरा नवरीला आत घेतले.
……. ….. ……..
रात्रीची वेळ मल्हारी आपल्या खोलीत होता. उमा जेवणखोलीत होती. तिच्या जावा तिच्याकडे पाहून तोंड वाकडे करतात. ती कावरी बावरी झाली. इतक्यात त्या ठिकाणी अलका, वासवी व अवंतिका आल्या.
अलका, “ काय वाहिनी अशी काय बावरलीस.”
उमा, “ काही नाही. “
अलका, “ थांब, मी मदत करते.”
ती दूध घेऊन गरम करुन ग्लास मध्ये ओतून तिच्याकडे देते.
अलका, “ हा… चल…”
वासवी, “ अगं, अत्ती हे दूध कशासाठी?”
अलका, “ गप ग, सिनेमा पाहिला नाहीस का? नवरी नव्या नवऱ्याला अशी दूध घेऊन जाते मग…”
अवंतिका, “ ती नवऱ्याला दूध पाजते.”
वासव, “ दूध पिल्यावर काय करते?”
अवंतिका, “ लाईट बंद होते.”
वासवी, “ लाईट बंद केल्यावर.”
अलका, ( अवंतिकाच्या तोंडावर हात ठेवून) “ ते झोपी जातात. चल म्हातारे लई प्रश्न विचारू नकोस.”
अलका उमेच्या हाती दुधाचा ग्लास देते. व त्या तिघींजनी उमाला मल्हारीच्या खोलीपर्यंत सोडतात.
वासवी, “काकीला काकांच्या खोलीची वाट माहित नाही का”
खोलीचे दार उघडताच त्या पाहतात. तिथे मुले खेळत होती. व त्यांनी सर्व फुलांच्या माळा विस्कटलेल्या होत्या. अलका काठी घेऊन त्यांना पळवून लावते. व उमाला आत जायला सांगते. उमा आत जाताना अवंतिका व वासवी पण निघाल्या होत्या. त्यांना तीने मागे ओढले.
अलका, “तुमच काय काम आहे?”
वासवी, “काकाला दूध देते की नाही ते बघते की.”
अलका, “लई शहाणी आहेस चल. मागे.”
उमा आत गेल्यावर अलका दार बंद करुन त्या दोघींना ओढून
“चल गुपचुप तिकडे.”
त्या आपल्या झोपण्याच्या खोलीकडे गेल्या.
…. …….. ……