अस्तित्व पटकथा भाग २४
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ........
उमाने वाटेने जाताना अलका व मुलींना सांगितले घरी गेल्यावर यातील काही सांगू नका .
मुलीनी सुद्धा मान हलवून होकार दिला.
अलका, “ त्यांना काय एवढं सांगायचं. त्या काय मालकीण आहेत.”
वासवी, “ विचारलं तर खूप भूक लागली म्हणून आम्ही खाल्ला. असे सांगू त्यात काय?”
घरात आल्यावर वासवी नैवेद्याचे ताट घेऊन जेवण खोलीत गेली. ताट रिकामे पाहून
पार्वती, “ काय ग, नैवेद्य कुठे हाय? तू खाल्लास.”
वासवी, “ नाही.”
पार्वती, “ मग अवंतिका किंवा अलकाने.”
वासवी, “ नाही.”
पार्वती, “ मग कुणी खाल्ला.”
वसव, “ देवाने खाल्ला, तुला कशाला हवे. वाढ आम्हाला जेवायला.”
पार्वती, “ काकी वाढेल की तुझी.”
वसव, “ ती गोठ्यात वैरण टाकायला गेलीय. तुम्ही दोघी खूप काम करता ना .”
पार्वती, “ खूप बोलतेस , त्या अलका व उमाच्या नादाने बिघडत चाललीस.”
वासवी, “ तिच्याच संगतीत राहिले तर सुधारू आम्ही. तुमच्या संगतीत राहिलो तर बिघडू.”
पार्वती, “लई बोलतेस, देऊ का एक.”
वासवी वेडावण दाखवते. तेव्हा पार्वती तिचे गाल पीचते. व कान पिळंगळते. इतक्यात बाहेरून अलका व अवंतिका आत येतात. वासवीचा कान पिळंगळताना पाहून .
अलका, “अगं, वाहिनी हे काय करतेस, कान दुखेल ना तिचा.”
पार्वती, “ दुखला तर दुखु देत, जीभ लई चरा चरा बोलतेय तिची. “
ती पुढे होते व कान सोडवते.
अलका, “वासावे मोठ्यानं उलट बोलू नये.”
वासवी, “ स्वारी आत्या.”
अलका, “चल जेवायला.”
अवंतिका, “ पण काकी बाहेर थांबलेय.”
अलका, “ तिचं थोडं काम आहे. ती जेवेल नंतर. आपण चल जेऊन घेऊ.”
अलका, “वाहिनी वाढ जेवायला.”
पार्वती त्या तिघींना जेवायला वाढते. त्या जेवतात. व विसावा घेण्यासाठी वरील गच्चीवर जातात. त्या गेल्यावर पार्वतीने जेवण लपवून ठेवले. व भांडी घासायला ठेवली.
बाहेरील काम आटोपून उमा आत आली. ती स्वयंपाक खोलीत गेली. तिने भांडी पाहिली. ती रिकामी होती.
उमा, ( पार्वतीस) “ ताई, जेवण.”
पार्वती, “ संपल.”
उमा, “ मी तर जेवलेच नाही. संपेल कसं.”
पार्वती, “ मला वाटलं, देवळात प्रसादाचे ताट जेवली असशील. म्हणून मी उरलेल गाईला दिलं.”
उमा काय समजायचे ते समजली. तिनं थोडं गुळ पाणी घेतलं. व बाहेर आली. पुन्हा चूल पेटवून काहीतरी बनवायचे म्हंटल्यास वेळ होणार. तेव्हा ती बाहेर बागेत आली. व झाडांना मोहर आलेला होता. ओळखीच्या झाडांची पाने तिने तोडली. ती पाण्याच्या हौदावर धुतली. व आंब्याच्या गारव्यास बसून तिने खाल्ली. तिला थोडे बरे वाटले. ती आपल्या खोलीत वामकुक्षी घेण्यासाठी गेली.
……. …. ……..
थोड्या वेळाने शेतातून मल्हारी घरी आला. तो आपले हातपाय धुवून आत निघाला. तेव्हा त्याच्या कानावर सरस्वती व पार्वतीचे बोलणे पडले.
पार्वती, “ पाहिलंस कशी ठेवली उपाशी, लई शहाणपणा करत होती.”
सरस्वती, “ बरं झालं, खोड मोडलीस, घरच्यांनी खूप डोक्यावर बसवून ठेवलीय. कानामागून आली अन् तिखट झाली.”
पार्वती, “ तर काय? सासूबाई पण उमा अगं उमा अस करत मागे मागे फिरत होत्या. आता बस म्हणावं.”
सरस्वती, “अशी जर धाकात ठेवली तर बरं. नाहीतर….”
पार्वती, “ सासूबाई तीर्थयात्रेहून यायच्या आधी हिला कशी उंदीर करते बघ.”
सरस्वती, “ आपण म्याँव केलं की तिनं असं भिऊनच राहिलं पाहिजे. कस म्याँव”
त्या हसू लागल्या.
त्याचे बोलणे ऐकून मल्हारीस उमा उपाशी आहे हे लक्षात येतं. तो मनात, ‘ म्हणजे आज उमा जेवली नाही तर, या दोघी राक्षसिणी असल्यावर आणखी काय होणार. आपण कायतरी केलं पाहिजे.’
मल्हारी आल्या पाऊली माघारी फिरुन मागे जातो. दुपार झालेली होती. तो परस बागेत गेला. त्याने झाडांचे निरीक्षण केले. झाडांना मोहर आलेला होता. कुठेही फळ दिसत नव्हते. तेव्हा तो पुन्हा रानात गेला. व तिथे एक पिकत घातलेला केळीचा लोंगर त्याने खड्यातून काढला. व घरी घेऊन आला. सरळ तो आपल्या खोलीत आला. उमा पलंगावर झोपली होती. तो घड शेजारी ठेवून व एक केळ सोलून खात तो.
मल्हारी, “ किती मधुर केळी आहेत.”
उमा दचकून उठली. तिने पाहिले. तिला खूप भूक लागली होती. पण हावरटपणा करणे बरे नाही. म्हणून भावना आवरल्या. तसं तिला चिडवण्यासाठी.
मल्हारी, “खाणार काय?”
उमा, “ दिल्या तर खाईन.”
मल्हारी, “ हे घे.”
मल्हारीने हे घे म्हणताच तिने पटकन हातातून केळी काढून घेतली. व ती आधासासारखी बकाबक खाऊ लागली. तेव्हा मल्हारी.
मल्हारी, “अगं हळू खा. जेवली नाहीस ना.”
उमा, “तुम्हाला कस ठावं.”
मल्हारी, “ अंतरज्ञानी आहे मी.”
उमा, “ ब्रह्मदेवच ना तुम्ही.”
मल्हारी, “ ब्रह्मदेव नाही, मल्हारी आहे. तो ही उमेचा.”
उमा, “ गप्पा बस, काहीतरीच बोलता.”
मल्हारी, “काहीतरीच काय, खरंच सांगतो.”
तो हसू लागतो.
………. …….. ……….