गुरुवार, २५ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २०

 अस्तित्व पटकथा भाग २१

अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,



क्रमशः पुढे चालू ......

रुममध्ये आल्यावर उमाने दुधाचा ग्लास जवळील टेबलवर ठेवला. व ती विस्कटलेले अंथरुण लावू लागली.

मल्हारी, “ माफ करा. मुले खट्याळ आहेत. दंगामस्ती करतात..”

उमा, “ मुले ही मुलेच, त्यांनी दंगामस्ती करायची नाही तर कुणी करायची.”

मल्हारी, “ तुमच काम वाढवलं मात्र.”

उमा, “ असू देत. करते मी नीट.”

उमाने अंथरुण नीट लावले. व ती मल्हारीस दूध देऊ लागली.मल्हारी दूध घेतो. त्यांची नजरानजर झाली. तो उमाचे सौंदर्य न्याहाळू लागला.

उमा, “ घेताय ना दूध.”

मल्हारी, “ हा … बर तुम्ही.”

उमा, “ नाही..”

मल्हारी, “ मग हे घ्या अर्ध, तुम्ही प्या.”

उमाने मान हलवली. व तिने थोडं दूध प्याली.

मल्हारी राहिलेला ग्लास घेऊ लागला.

उमा, “ थांबा दुसरं आणते. हे उष्ट झालंय माझ्याकडून.”

मल्हारी, “ आज उष्ट बिष्ट सगळं चालतंय.”

तो राहिलेलं दूध पितो. लाईट बंद होते.

……. ….. ……

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उमा घरातील सर्व कामे करू लागली. तिचे काम पाहून सासू सासरे खुश होतात. सासूबाई उमाला बोलावून

लक्ष्मीबाई, “ उमा ये उमा, इकडे ये.”

उमा समोर आली.

सासूबाई , “ थांब इथे, आलेच.”

लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन दागिन्यांचा डबा आणतात. त्यातील एक दागिने उमाला देतात.

उमा, “ कुणाला? मला. “

अलका, “ घे की वहिनी, मस्त आहे की नाही.”

उमा हसली. व आत मध्ये गेली. ते पाहून जेवण खोलीत असलेल्या तिच्या जावा दागिने देताना पाहून.

पार्वती, “ पाहिलंस कशी काल आली नाही तोपर्यंत सासूबाईंनी लगेच दागिने तिला दिले.”

सरस्वती, “चल आपण पण जाऊ. आपल्याला पण मिळेल की.”

पार्वती, “ चल चल बघू.”

त्या लगबगीने बाहेर जाऊन उगाच.

सरस्वती, “ सासूबाई हे घ्या गुळपाणी.”

लक्ष्मीबाई, “ मी काय बाहेरून पाहुणी आलेय का गुळपाणी द्यायला.”

 लगेच पार्वती दूध घेऊन आली.

पार्वती, “ हे घ्या दूध.”

 लक्ष्मी, “ आज एकीवर एकीचं प्रेम उतू चाललेय.”

पार्वती, “तसं नाही, तुम्ही घरचा सगळा व्यवहार बघताय. त्यामुळे थकताय. तुमची कोण काळजी घेणार. म्हणून म्हंटलं आपणच घ्यायला पाहिजे. नाही का?”

लक्ष्मीबाई, “ अस म्हणताय. मग ठेवा. अन् जावा कामाला.”

सरस्वती, “ कस आहे. सासूबाई, माझा पण गळा मोकळा असतो. मला पण एखादी टीक किंवा माळ शोभेल की.”

पार्वती, “अन् माझे हात पण बघा ना, कसे रिकामे वाटतात. फक्त पाठल्याच आहेत. त्यात बिलवर कसे शोभून दिसतील ना, नाहीतर इकडे तिकडे सर्व नावे ठेवतात.”

लक्ष्मीबाई, “काय म्हणतात.”

पार्वती, “अस.. म्हणतात. की सासू जरी लक्ष्मी असली. तरी सुना लंकेच्या पार्वतीसारख्या आहेत. बघा ना, असं बोलणं त्यांना शोभत का? मी पण त्यांना ठणकावून सांगितलं की माझी सासू मला दागिन्यांनी मडवून टाकेल म्हणून.”

लक्ष्मीबाई, “ हो का बरं.”

सदाशिवराव, “ देऊन टाक एखादा दागिना त्यांना.”

लक्ष्मीबाई, “ तुम्ही गप्प बसा, या दोघी घरात आल्या तेव्हा काय घेऊन आल्या होत्या. हे जे आहे की नाही. ते आम्हीच दिलेलं आहे. मल्हारीच्या बायकोला ठेवलेले दागिने आता तिचे तिला दिले. अन् हे जे काही शिल्लक आहेत ना. ते माझ्या अलकाचे आहेत.”

 अलका, “ काय आई.”

लक्ष्मीबाई, “ हे घे, राहिलेले दागिने तुझे.”

पार्वती व सरस्वती दोघी नाराज होऊन उभ्या होत्या.

लक्ष्मीबाई, “ तुम्हा दोघींना दागिनेच हवेत ना. मग घ्या तुमच्या नवऱ्यांकडून. कुठल्या कामात लक्ष नाही. की शेतावर ध्यान. सगळं त्या मल्हारीन पहायचं. अन् या दोघी घरात नुसत्या काड्या लावायच्या कामाच्या. राबा आणि घाला दागिने म्हणावं.”

“ उभ्या काय राहिलाय. जावा कामाला, जेवण आटपा जावा, शेतात भाकरी द्यायच्या हाईत. काय त्यासाठी पण बाई लावू.”

त्या आत गेल्या. अलका दागिन्यांचा डब्बा घेऊन आईच्या खोलीत गेली.

…… ……… ………

त्या गेल्यावर.

सदाशिवराव, “ द्यायची होतीस एखादा दागिना वाईट वाटलं असेल त्यांना.”

लक्ष्मीबाई, “काय वाटेल. वाटलं तर वाटू देत. अगोचरा सारख्या आहेत दोघी. माझ्या पोराचं लग्न मोडत होत्या. घोरपडी. अन् यांना मी देतोय दागिने. चला , घ्या ते दूध तुमच्या सुनांनी आणलेल. मला नको. नातवंडांची काळजी नसती तर या दोघींना चांगलाच इंगा दाखवला असता.”

लक्ष्मीबाई आत गेल्या.

….. …… …..


क्रमशः पुढे .....




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा