शनिवार, ३० मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १५

 अस्तित्व पटकथा भाग १५


अस्तित्व पटकथा भाग १५ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,



क्रमशः पुढे चालू....

उमा बागेतील झाडाखाली बसली होती. शांतपणे विचार करत. तेथील शांततेने तिच्या अंतरंगात वेगळीच हालचाल जाणवत होती. तशी ती झाडाला टेकून बसली. तर वेगळीच शक्ती तिच्यामध्ये जागृत होत होती. व तिचा अल्लड स्वभाव शांत होत चाललेला होता. ती एकाग्र होत होती. इतक्यात पाठीमागून लपत छापत आलेला महादू तिला ‘भाव’ केला.

महादू, “घाबरली रे घाबरली.”

उमा, “ तुला वाटते का मी घाबरले असं.”

महादू, “ नाही.”

उमा, “ मग असं का म्हणालास?”

महादू, “ बर बाई, मी हरलो. एक सांग. तुला दाजीबा पसंत आहेत नव्ह.”

झाडावरून लोंबकलणारा व कैऱ्या तोडणारा अथर्व खाली येत म्हणाला, “ पसंत नसायला काय झालं. मस्त आहे. राजबिंडा, बुलेट चालवताना एखाद्या हिरो सारखा दिसतो.”

उमा, “तुला बरे माहिती, तू केव्हा पाहिलास.”

अथर्व, “ तू विटी मारलीस ना, तेव्हा पाहिलं. काय ती बुलेट, काय तो गॉगल, एकदम झ्याक दिसत होता.”

 शिरपा, “ पण उमाक्का तुला कशी पसंत केली तेनं.”

उमा, “म्हणजे? मी काय वाईट दिसते.”

शिरपा, “ एवढी विटी मारुन देखिल गडी शांतच कसा हा मला प्रश्न पडलाय बघ.”

महादू, “पसंत नसायाला काय झालं. आमची उमाक्का आहेच एका राजकुमारी सारखी. एखाद्या राजाला देखिल गुलाम बनविल.”

अथर्व, “काय ग, तू दाजीबाला गुलाम करणार?”

महादू, “गप्प लेका, तस म्हणायचं असतं. अस का कोण नवऱ्याला गुलाम करत होय.”

उमाच्या चेहऱ्यापुढे चहा देतानाचा मल्हारचा पाहिलेला चेहरा दिसू लागला.

….. ….. …..

उमाच्या लग्नाची बातमी गावात सर्वत्र पसरली. जगन पारावर बसलेला होता. तेथे गावातील दोन माणसे गप्पा मारत होती.

गोपाळ, “ काय सावजी पेरणीची तयारी कुठंपातूर आली.”

सावजी, “ आलीय आवरत, काल धाणनी, औत झालंय. आलय तयार होतं.”

धनाजी, “ गोपाळकाकानी नंबर मारलाय म्हणायचा.”

गोपाळ, “ केलंय तयार पण गावाबरोबरच टोकणनी करायची ठरलंय.”

इतक्यात तेथून श्याम भट्ट जाताना पाहून.

गोपाळराव, “ काय बुवा कसली गडबड चाललीय.”

श्याम भट्ट, “ पाटलाच्या उमाला स्थळ आलंय नव्हं. त्याच सारख वारख करायच चाललय.”

धनाजी, “ पाटलाची उमा लग्नाजोगी झाली.”

सावजी, “ मग काय, तिच्या बरोबरीच्या सर्व उजवल्या. हीच तेवढी राहिलीय.”

धनाजी, “ कुठलं स्थळ आलंय?”

श्याम भट्ट, “ सूर्यगावच्या सदाशिव पाटलांचा मुलगा मल्हारी. त्याच आलंय. पसंती झालीय. थोडीफार बोलणी करायची अन् उरकून टाकायचं.”

सावजी, “बर हाय की.”

श्याम भट्ट, “ येतो मग.”

गोपाळराव, “ हा चालेल.”

पारावर बसलेला जगन त्याचं बोलणं ऐकतो. तो आपल्या मनात….

जगन, ( मनात) “ उमीच लगीन काय? बघतोच कशी लग्न करते ते.”

तो तिथून उठला. व शंभू माळ्याच्या घरी गेला. शंभू माळी ओसरीतल्या पाळण्यावर बसलेला होता.

जगन, “ राम, राम, माळी काका.”

शंभू माळी, “ कोण जगन, ये… ये… बस. काय काम काढलस.”

जगन, “ काय काका, नाही म्हटलं तर तुमच्या कानावर बातमी आलीच असेल की.”

शंभू माळी, “ बातमी, ती आणि कोणती?”

जगन, “ अहो, ती नाही का गणपत पाटलाची पोरगी उमी. तिचं लगीन ठरतंय म्हणे.”

शंभू माळी, “ काय? उमीचं लगीन, ते अन् कुणाशी?”

जगन, “ आव ते सुर्यगावचं आहे ना पोरग. कोण ते हा मल्हारी की फिल्लारी हाय., हा त्याच्याशी ठरतंय._

शंभू माळी, “मग ठरू दे की, त्यात काय एवढं, वयात आलेल्या पोरी उजवून इकडून तिकडं अन् तिकडून इकडं जायच्याच.”

जगन, “अहो काका, तिनं एवढं तुमच्या बागेचं नुकसान केलं, अन् तुम्ही तिला अशी सोडणार.”

 शंभू माळी, “ मग काय करायचं म्हणतोस.”

 जगन, “ हा कान करा इकडं.”

जगन शंभू माळ्याच्या कानात कुजबुजत.

शंभू माळी, “अस म्हणतोस.”

 जगन, “ पण त्यासाठी खर्चापाणी लागलं, मग देताय ना, पाचशे रुपये.”

 शंभू माळी, “ बर… देऊया की, माझ्या आंब्याच्या झाडाच्या एका एका आंब्याचा बदला घ्यायचाय मला. हा थांब.”

शंभू माळी उठला. त्याने आपले फडताळ उघडून त्यातील डब्यातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून जगनला दिल्या. जगन पैसे घेऊन निघून गेला.

जगन जातच शंभू माळ्याची बायको आतून बाहेर आली.

शंभू माळी बायको, “काय हो, तो जगन्या कशाला आला होता?”

शंभू माळी, “ आलता काम होतं एक.”

बायको, “ मला माहिताय कसलं काम ते. उगाच चढता वेल कापू नका. नाहीतर आपला कुजल. हा सांगते. उगाच नसत्या उठाठेवी कशाला हव्यात. जर त्या पाटलाला अन् पाटलीनीला कळलं तर तो पाटील टांगेल आसगावच्या वेशीच्या बावीवर, अन् पाटलीन देईल मिरचीची धुरी मग समजल.”

शंभू माळी, “कळेल तेव्हा कळेल, तू तेवढी गप्प रहा म्हणजे झालं. बघतोच मी, माझं आंबे उतरते काय. चढ म्हणावं झाडावर, अन् खा आंबे.”

……………. ……… ………..

जगन आंतरदेशीय पत्र घेऊन त्यामध्ये उमेविरूद काही बाई लिहून घेऊन सूर्यगावला सायकल घेऊन गेला. वाड्याच्या बाहेर अंगणात शिवण्णा नोकर लाकडे फोडत होता. जगन पोस्टमन होऊन तिथे गेला.

जगन, “ पोस्टमन, पत्र घ्या.”

शिवण्णाने लाकडे फोडायची थांबवून पत्र घेतले. व आत नेऊन थोरल्या सुनेच्या हातात दिले.

शिवण्णा, “बाईसाब हे घ्या पत्र आलंय कुणाच?”

पार्वतीने पत्र घेतले. व ती जेवण खोलीत आली. सरस्वती तिथे भाजी नीट करत होती.

सरस्वती, “कुणाच ग पत्र.”

पार्वती, “ अगं, बाई यावर तर पत्ता दिसत नाही. फक्त मल्हारीस अस लिहिलंय.”

सरस्वती, “ आण बघू, काय लिहिलंय बघू.”

“ अग खरंच की असं नाव लिहिलंय म्हंटल्यावर काहीतरी भानगडच असणार.”

पार्वती, “ कसली भानगड?”

सरस्वती, “ थांब , फोडून बघते.”

सरस्वती पत्र फोडून वाचले. व आवाक होऊन.

पार्वती, “काय हाय ग पत्रात.”

 तिने तिच्या हातातील पत्र घेऊन वाचले.

पार्वती, “ चल, मस्त संधी आलेय. जाऊन सांगूया.”

सरस्वती, “थांब, आता नको, बरोबर मोक्यावर घाव घालायचा.”

पार्वती, “ म्हणजे?”

सरस्वती, “ म्हणजे वाघाचे पंजे, कान कर इकडे.”

तीने तिच्या कानात काहीतरी सांगितले.

……… ……….. …………




मंगळवार, २६ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १४

 अस्तित्व पटकथा भाग १४


अस्तित्व पटकथा भाग १४ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

मल्हारी घरी आला. वाटेत येताना मधुकर पुजारी काकांना सोडून तो वाड्यावर आला.त्याने आपली बुलेट पार्क केली. व हौदाला हात पाय धुवू लागला.

मुले त्याच्याभोवती ‘काका आला.’ असे म्हणत गोळा झाली. त्यांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या.

वासवीने इशारा करुन कार्तिकला विचाराय सांगितले.

मल्हारी, “ बोला, काय हवय.”

तानाजी, “ काकी कशी आहे?”

मल्हारी, “ अरे, आता तर पाहिलेय. बघू.”

कार्तिक, “ पाहिलीय ना, मग सांग दिसाय कशी आहे ती?”

मल्हारी, (तोंडाचा चंबू करुन आकाशाकडे पाहत.) “आहे बरी.”

वासवी, “ बरी म्हणजे कशी माझ्यासारखी आहे का?”

मल्हारी, “ आहे साधारण.”

अवंतिका, “ बरी आहे, साधारण आहे. हे सोड. सांग आपल्यात कुणासारखी दिसते.

मल्हारी, “ सांगू, आपल्या सरू सारखी.”

 मुले एकदम, “काय सरू सारखी.”

येसाजी, “ मग नकार कळंव.”

मल्हारी, “ ते माझ्या हातात नाही.”

अवंतिका, “ का?”

मल्हारी, “ आई साहेबांची पसंती. मी काय बोलणार.”

येसाजी, “ हे बघ, आम्ही मोठ्या आईला समजावून सांगतो.

पण आम्हाला काकी देखणी व हुशार हवी. आई व मधल्या काकी पेक्षा. सांगून ठेवतो.”

तानाजी, “ अन् हो मला हवे ते करुन घालणारी पाहिजे.”

अवंतिका, “ अन् माझी वेणी घालणारी व गजरा विणून देणारी हवी.”

वासवी, “ तुम्हाला काकी हवी की नोकरानी.”

सर्वजण, “ अपकोज काकी.”

वासवी, “ हे बघ तुला पसंत आहे का?”

मल्हारी, “ मला कोण विचारतं.”

येसाजी, “ लग्न तू करणार आहेस. की थोरली आई.”

इतक्यात मल्हारीचे आई वडील बाहेर आले. मल्हारी पाया पडला.

आई लक्ष्मीबाई, “ औक्षवंत हो.”

लक्ष्मीबाई, “ बर मुलगी कशी वाटली.”

 मल्हारी लाजत.

लक्ष्मीबाई, “ अरे, बोल की, पसंत आहे की नाही.”

 मान डोलावून होकार सांगु लागला.

लक्ष्मीबाई, “ उगाच नंदीबैल होऊ नको. स्पष्ट सांग. हो की नाही.”

मल्हारी, “ एवढं कळत नाही तुला. पसंत आहे.”

सदाशिवराव, “ अर्धी पसंती झाली. आता तिकडून होकार आला म्हणजे झालं.”

लक्ष्मीबाई, “होकार न यायला काय झाले. माझा मल्हारी आहेच मुळी लाखात एक. बघा येते की नाही खुशखबर.”

लक्ष्मीबाई, “मग, उभारणार म्हणा बोहल्यावर.”

मल्हारी, “हो.”

 तो आत जात होता. मुले त्याच्याकडे रागाने बघत होती.

येसाजी, “मघापासून आम्हाला खुळ्यात काढत होता. अन् मोठ्या आईपुढे बघितलस ना.”

अवंतिका, “आता काका आपला राहिला नाही.”

तानाजी, “अस का?”

अवंतिका, “खुळं लावलं काकीन.”

वासवी, “म्हणजे काकी दीसायला मस्त असणार.”

….. ……….. …..

आतमध्ये जेवण खोलीत

सरस्वती, “ काय ग कशी असेल, येणारी जाऊ?”

पार्वती, “ कशी पण असेना, आपल्या हाताखाली राबणारी हवी.”

सरस्वती, “ असेल का तशी.”

पार्वती, “ नसली तरी करुन घ्यायची.”

इतक्यात ननंद अलका तिथे आली. डेर्यातील पाणी घेऊन पिऊ लागली. पिऊन झाल्यावर…

अलका, “ काय वाहिनी कसली बोलणी चालल्यात.”

सरस्वती, ( मुरका मारत) “ नाही म्हटलं, भाऊजींच आज ना उद्या होईलच. आमच्या नंदुबाईना एखादा पृथ्वीराज घोड्यावर बसून कधी घेऊन जाईल.”

अलका, “एवढं काही वय झालं नाही हा माझं. आता कुठ अठरा लागलंय.”

पार्वती, “तरी म्हंटल, एखादा घरजावई तरी करुन घेतलेला बरा.”

 अलका, “काय, घर जावई.”

सरस्वती, “ नाहीतर काय, तू तर घरातील काम करत नाहीस. सासरात कसं व्हायचं तुझं.”

अलका, “ त्याची तुम्ही काळजी करू नका. माझं मी पाहून घेईन. अन तुमच बघा. नाहीतर येणारी वाघीण असली तर तुम्ही शेळ्या कोणत्या कोंडवाड्यात जाऊन बसशीला ते बघा. माझ्या लग्नाचं बोलत्यात. निम्या वयाच्या झाल्या. यांना साध्या भाकरी भाजता येत नाहीत.”

 ती बाहेर गेली. दाराशेजारी उभा राहिली.

पार्वती, “बघितलस ना, कशी बोलते. हिला चांगला चेचणारा नवरा मिळायला पाहिजे.”

सरस्वती, “तर काय, इथ आल्यापासून नुसती मोलकरीण करुन ठेवलीय.”

 बाहेरून अलका, “मला कसला ही नवरा मिळू दे, माझं मी बघीन. तुमची कामे आटपा नाहीतर आईला सांगून गोठा झाडायला लावीन. मी म्हणून तुमच्या चुकांवर पांघरूण घालते. नाहीतर… कवाच घरातल्यांनी हाकलल्या असत्या.”

सरस्वती, “बघितलस कशी सापाच्या कानाची आहे ते.”

पार्वती, “तर काय. आटप बाई. नाहीतर काय खरं नाही. ती सरी कुठं कलमडली. देव जाणे. इथं भाकरी करायच्या हाईत.”

पार्वती, “सरे, ये सरे.”

बाहेरील खोलीतून

सरू, “ हा, आले आले.”

……… …….. ………




शुक्रवार, २२ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १३

 अस्तित्व पटकथा भाग १३ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे......

पाटील, “ या बसा.”

मल्हारी, श्यामभट्ट व मधुकर पुजारी सोफा सेटवर बसले.

गणपतराव, “ डोक्याला काय लागले.”

पुजारी, “ मघाशी येताना वाटेत मुलांनी विटी मारली.”

गणपतराव, “ अस होय. “

आतमध्ये डोकावत,

“ अहो, ऐकलंत का? चहा पाण्याचं काहीतरी बघा. उमा आहे ना घरात.”

शकुंतला, “ हो आलीय,”

शकुंतलाने गड्याकडून पाणी बाहेर पाठवले. उमा साडी नेसत होती. राजश्रीची आई पोहे करण्यास मदत करत होती.

उमा, “ आजी, हे काय लगेच? तू तरी सांग.”

आजी, “ मी काय पिकलं पान, माझं कोण ऐकणार.”

बाहेरील बाजूस मधुकर भटजी ओळख करून देत.

मधुकर पुजारी, “ हा आमच्या गावच्या पाटलांचा मुलगा मल्हारी, बी.ए. सी. अँग्रीकल्चर आहे. भरपूर शेती आहे. त्यात नवनवीन प्रयोग करत असतो. याला दोन मोठे भाऊ विवाहित आहेत. मागे मंदिरात तुमच्या मुलीस पहिली. तेव्हा श्याम भट्टांकडे बोललो होतो.”

गणपतराव, “ हो बोलले होते शाम भट्ट मला. मला ही एक मुलगा व एक मुलगी आहे.”

गणपतराव, ( पत्नीस) : नाष्टा पाण्याचं काही बघताय की नाही.”

शकुंतला, “ हो झालंच.”

गड्याकडून शकुंतला नाष्टा लावून देते. उमा साडी नेसून तयार झाली.

आजी, “ बघू कशी दिसते.”

मायेने बोटे कपाळी नेऊन मोडली.

उमा, “ जड झालो व्हय, लगेच लग्नाचं बघायला.”

शकुंतला, “ मग काय बियाण्याला कनुगल्यात ठेवायची. उपवर मुलीचे हात पिवळे झालेले बरे.”

उमा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. चहा देताना मल्हारीने ओळखले. ती चहा खाली मान घालून देऊ लागली. व दिल्यावर तिने वर पाहिले. ती दचकली, काळजात धस्स झालं. मल्हारी मात्र तिला पाहतच होता.

मधुकर भट्ट, सावध करत.

“ काय मल्हारी, बघून घे, मुलगी पसंत आहे का बघ.”

मल्हारीने हसून चहा घेतला. भटजी बुवांनी उमाला औपचारिका प्रश्न विचारले.

“ बाळ नाव काय?“

“ उमा गणपतराव पाटील.”

“ शिक्षण “

“ H.s.c. सायन्स.”

“ छंद “

ती काही बोलत नाही.

आजी, “ तिला सर्व काही येते. जेवण, घरकाम, वगैरे ती सर्व करते. दारातील रांगोळी देखील तिनेच काढली आहे.”

मधुकर पुजारी, “ बरं.”

श्याम भट्ट, “ मल्हारी काय विचारणार आहेस का?”

मल्हारी, “ नाही, नको.”

( त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केले. उमा शांत होती. तिच्या मनात धाकधूक होती. अनेक प्रश्न मनात येत होते.”

उमा ( मनात ) : “ त्याने मला पाहिलं तर नसेल ना. माझी तक्रार तर करणार नाही ना? दिसावयास छान आहे. पण स्वभाव कसा असेल? देव जाणे. मला पसंत करेल का? नक्कीच नाही, कारण मी विटी मारली ना? अरेरे, बिचाऱ्याच्या डोक्याला लागलं. रक्त किती ओघळले असेल. तरी पण हा शांत कसा? याने मला पाहिलं ना? मग तक्रार कशी करत नाही. हा घरी आहे ना आमच्या. सांगेल नंतर नकार. खरंच का मला नकार देईल? की होकार. बापरे, देवा तूच मला वाचव या संकटातून.”

श्याम भट्ट, “ बर, बाळ जा आत.”

उमा ने वाकून नमस्कार केला. व आत गेली. परसदारी असणारी मुले खिडकीतून वाकून पाहून परसदारी आली. चर्चा करुन त्यांनी चिठ्ठी लिहिली.

थोड्या वेळाने मधुकर भट्ट, श्याम भट्ट व मल्हारी बाहेर पडले.

गणपतराव, “ बरं काय ते निरोप कळवा.”

 मधुकर पुजारी, “हा कळवतो.”

 मल्हारी वाडा, रांगोळी, परिसर पहात जात होता. एक मुलगा बोळातून आला. व मल्हारीस चिठ्ठी देऊन गेला. व सॉरी म्हणाला. मल्हारीने ती चिठ्ठी घेतली. व वाचू लागला. त्यात लिहिले होते.

मल्हारीने चिठ्ठी उघडून पहिली. त्यात खालील मजकूर होता.

“ आमची उमाताई खूप चांगली हाय. आम्हाला ती विटी मारायला शिकवत होती. तेव्हा ती विटी लागली. माफ करा. ती खूप चांगली आहे. आम्हाला चिंचा देते. आंबे काढून देते. आमचा अभ्यास घेते. पुरणपोळ्या छान बनवते. तुम्ही पाडव्याला या. आम्ही मस्त पुरणपोळ्या वाढू….. तुमचा गुन्हेगार म्हाद्या”

मल्हारी हसला. त्याने ती चिठ्ठी खिशात घातली. व निघाला. वाटेत जाताना गाडीवर

मधुकर पुजारी , “ काय मल्हारी, मुलगी पसंत आहे का?”

मल्हारीने होकारार्थी मान हलवली.

मधुकर पुजारी, “ शाम भट्ट मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीकडच्या लोकांनाही विचारून घ्या. मग बघू पुढच.”

 श्याम भट्ट, “चालेल, विचारतो त्यांना. देईन निरोप नंतर.”

मधुकर पुजारी, “चालेल. निघतो आम्ही.”

ते निघाले.

….. ….. …

मुलगा पाहून गेल्यावर उमाने सुटकेचा सुस्कारा टाकला. पाटीमागे घराच्या मुलांची कुजबुज चालू होती.

 शकुंतला आत आल्यावर

“ मला तर बाई मुलगा पसंत आहे.”

 आजी, “ तुला असून काय करायचे? तिला आहे का बघ. तूला नांदायला जायचं आहे थोडंच?”

शकुंतला ने इशारा केला. उमा कावरी बावरी झाली. तिला काही सुचत नव्हते. ती काहीच बोलली नाही. इतक्यात गणपतराव आत आले.

गणपतराव, “ मला तर मुलगा बरा वाटला. अगदी राजबिंडा आहे. अन् कष्टाळू ही आहे.”

आजी, “ पण त्याला पसंत आहे का? हे कळायला हवं.”

गणपतराव, “ पसंत असेल, असं मला तरी वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरून जाणवलं.”

शकुंतला, “ उमाला पसंत आहे का विचारा.”

आजी, “ काय ग, तुला पसंत आहे का?”

उमा विचारात असते. तिला हलवत.

उमा, “ ह.. हो आ…”

आजी, “ ह. हो. आ… काय? पसंत आहे का?”

उमा, “ त्याला पसंत आहे का? हे आधी विचारा.”

आजी, “ तुझं काय ते सांग?”

शकुंतला, “ एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळेल का?”

उमा, “ आधी तिकडून येऊ दे निरोप मग बघू.”

बाहेर मुलांचा गोंगाट चालू होता.

शकुंतला, “ उमा, त्या भांड्यात पोहे आहेत. दे जा त्या मुलांना एक एक घास. कारवानं नुसती काल काल करताहेत.”

उमा ने उठून भांड्यातील पोहे एका पितळीत घेतले. व बाहेर गेली व मुलांना वाटू लागली. मुले ‘मला दे, मला दे’ असा दंगा करू लागली.

उमा, “अरे, दंगा करु नका. ओळ करा सर्वांना देते.”

पोहे घेतल्यावर. महादू तिच्या जवळ गेला.

महादू, “उमक्का काळजी करु नकोस. दाजी होकार देतील.”

उमा, “ ए म्हसोबा, गप्प, अजून कशात काय, अन् फाटक्यात पाय. उगाच लगेच नाती जोडू नकोस. मला तर तो नकारच देईल असं वाटतंय.”

महादू, “ गप्प बस, बघ होकार येतो. की नाही. मी चिट्टी दिलेय दाजीला. फडतळातून कागद अन् शाई घेऊन.”

उमा, “काय, चिठ्ठी, आई गं, मेलो आता. काय लिहिलंस त्यात.”

 महादू, काही नाही ग, फक्तं एवढंच लिहिलं. आमची उमाक्का लई चांगली हाय. अन् चुकून इटी लागली. माफ करा. म्हणून..”

उमा, “ एवढं सगळं लिहिलंस.”

इतक्यात मागील श्रीपती, “ एवढंच नाही. तर पाडव्याला या म्हणालाय. पुरणपोळी खायला.”

उमा, “ अरे, माझ्या कर्मा, तू तर पुरावाच दिलास की हातात. आता सगळ अंगलट येणार.”

महादू, “ गप, येईल निरोप.”

इतक्यात गडी बाहेरुन आला.

गडी, “ मालक, मालक, श्यामभट्टानी सांगावा दिलाय.”

गणपतराव, “ काय म्हणाले?”

गडी, “ मुलग्याला मुलगी पसंत आहे म्हणाले.”

गणपतराव, “ वा, खूप आनंदाची बातमी दिलीस.”

पाळण्यावर बसून झोके देत.

 गणपतराव, “ अहो, ऐकलंत का?”

शकुंतला, “ काय ते?”

गणपतराव, “ मुलाला मुलगी पसंत आली.”

शकुंतला, “ देव पावला म्हणायचा.”

गणपतराव, “ लाडू वळायला घ्या आता.”

शकुंतला, “ ते तर झालंच. पण आपणही त्याचं घर पहायला हवं.”

गणपतराव, “ ते तर होईलच हो.”

शकुंतला, “ उमा, ये उमा.”

 उमा, “ ओ.. , आले.आले.”

शकुंतला, “ आले काय आले. होकार आलाय तिकडच्या स्वारींचा. आता तुझं काय ते सांग.”

 उमा, “ काय लगेच.”

शकुंतला, “लगेच काय लगेच. मग काय महिना लावायला पाहिजे होता.”

उमा, “तस नाही.”

शकुंतला, “ तस वस काय नाही. गुमान हो म्हण. आणि उभी रहा बोहल्यावर.”

मुले, ( ओरडत) “ ऐ..उमा ताईच् लगीन ठरलं.”

उमाच्या हातातील पोह्यांची पितळी हिसकावून घेऊन नाचू लागले.

उमा,( मनात) “मला लगेच कशी पसंत केली याने. मी एवढी विटी मारुन देखिल.”

 ती विचार करु लागली.

……… …………………

क्रमशः पुढे.......



सोमवार, ११ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १२

 

अस्तित्व पटकथा भाग १२ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

दुपारची वेळ मल्हारी गाडीवरून आसगावच्या हद्दीत रस्त्याने पुजारी काकांना घेऊन निघालेला होता. वाटेत पुजारी बुवांना लघुशंका आली म्हणून त्याने बुलेट थांबवली. पुजारी काका बाजूला उतरून रानात गेले. इतक्यात एक रस्त्याच्या बाजूच्या मोकळ्या शेतात मुले चिन्नी दांडू खेळ खेळत होती. पाटलाची उमा एका लहान मुलास चिन्नी कशी मारायची ते शिकवत होती.

उमा , “ये वेड्या बघ कशी चिन्नी मारायचं ते. साधी चिन्नी मारता येत नाही. नेमबाज कसा व्हायचचास. थांब मी दाखवते.”

तिने दांडू काढून घेतला व चिन्नी मारली. ती बुलेट वरून निघालेल्या व वाटेत पुजारी काकांना लघुशंका आली म्हणून थांबलेल्या मल्हारीस लागली.गेली,

 मल्हारी, “आई ग.”

 इतक्यात चिन्नी पकडायला गेलेल पोर, “अरे , पळा पळा, चिन्नी लागली वाटतं.”

 उमा, “ बापरे, हे काय झालं. पळालेल बर नाहीतर काही धडगत नाही.”

मल्हारी, “ ये, थांब.”

मल्हारीने डोक्यावर लागलेल्या ठिकाणी रुमाल लावला.

उमाने पळताना मागे वळून पाहिले. मल्हारी व तिची नजरा नजर झाली. ती व मुले पळून गेली. पुजारी लघुशंका करुन आले.

पुजारी, “अरे रे, चिन्नी लागली वाटतं.”

मल्हारी , “जास्त नाही, थोडी लागली.”

पुजारी, “नाही कसं रक्त आलेय. चल शामभट्टाकडे गेल्यावर पाहू.”

 ते गावात आले. देवळा जवळील घरात शाम भट्टांकडे आल्यावर.

पुजारी व मल्हारी घरात गेले.

शाम भट्ट, “अरे, काय लागलं.”

पुजारी, “वाटेत मुले खेळत होती. चिन्नी लागली.”

शाम भट्ट, “ ही मुले पण ना, गावात गोंधळ घालून देवळाजवळ खेळून खापर्या घराच्या व देवळाच्या फोडतात. म्हणून रानात पिटाळली तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची डोकी फोडत आहेत.”

श्याम भट्ट, “ अगं, जरा हळद आण.”

मल्हारी, “ नको कशाला, जास्त लागलं नाही.”

श्याम भट्ट, “ नाही कसं, रक्त ओघळत आहे. थांब…”

श्याम भट्टांची पत्नी हळद घेऊन आली. ती कपाळावर थोडी लावली. चहा पाणी झालं

मधुकर पुजारी, “ चार दिवसापूर्वी पाहिलेल्या मुलीच्या स्थळाच काय झालं.”

 श्याम भट्ट, “ आहे की थांबा आधी कल्पना देऊन येतो.”

श्यामभट्ट पाटलाच्या वाड्यावर गेले.

श्यामभट्ट , “ पाटील आहेत का?”

आतील खोलीतून पाटील व शकुंतला व आजी बाहेरील ज्योत्यावर आलीत.

गणपतराव, “ बोला, श्याम भट्ट, काय म्हणताय.”

श्याम भट्ट, “ अहो परवा बोललो होतो ना एका स्थळाबद्दल मंदिरात.”

 गणपतराव, “ काय झालं त्याचे.”

 श्याम भट्ट, “ तो मुलगा आलाय पहायला.”

गणपतराव, “ काय अचानक.”

 श्यामभट्ट, “ अहो, कालच तुम्ही म्हणाला होता ना, चालेल म्हणून.”

गणपतराव, “ बर, बोलवा त्यांना.”

 गणपतराव, ( शकुंतलास) “ अहो , उमा कुठाय?”

 शकुंतला, “असेल इथेच कुठेतरी.”

आजी, “ एवढी काय घाई लागलेय पोरीला द्यायची. अजून लहान आहे ती.”

शकुंतला, “ गप्प बसा, तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होऊन संसाराला लागल्या त्या. “

आजी, “ आणखी एक दोन वर्षे राहिली असती.”

 शकुंतला, “ तिचं काय लोणचं घालायचं आहे.”

श्याम भट्ट, “काय सांगू?”

गणपतराव शकुंतलाकडे पहात.

शकुंतला, “थोड्या वेळानं घेऊन या. तयारी करते.”

 गणपतरावांनी नजरेने इशारा केला.

शकुंतला आपल्या लहान मुलास

शकुंतला, “ बाळ जा, उमा ताई कुठे असेल तिथून बोलावून आण.”

तो धावत रानाकडे गेला. मुले एका झाडाखाली बसली होती. उमा झाडास उभा होती.

महादेव, “ कशाला एवढ्या जोरात मारलीस डोचकं फुटलं नव्ह त्याचं.”

उमा, “ मला काय माहित त्याला लागेल ते?”

महादेव, “ हा शिरप्या काय खोट सांगतोय व्हय.”

शिरपा, ( उठून) “ तर कसली जापून लागली, रगात आलं बिचाऱ्याला.”

उमा, “ लई लागली व्हय रं.”

शिरपा, “ तर काय एवढी खोप पडली, रक्तं गळंल भळभळा. माहिताय का?”

उमा, “ खरंच, देवा वाचव रे.”

 अथर्व, “ उगाच, शिरपा काय पण सांगू नको, तुझं माहिताय आम्हाला हातभर लाकूड अन सहा हात ढलपी असते. “ “गप ग, उगाच टेन्शन घेऊ नको. जर वेळ आली. तर मी अंगावर घेईन तुझा आरोप.”

शिरपा, “ म्हणं मी घेईन, लेका दांडू तरी धरायला येतो का”

महादेव, “ये गप्प आता, उगाच कालवा नको. काही झालं तरी आपल्या उमक्काला वाचवलं पाहिजे. तिचे किती उपकार आहेत आपल्यावर, किती पेरु, बोरं, कटक्या, चांगुण्या तीनं दिल्यात. गाभुळल्या चिंचा तर कितीतरी वेळा काढून दिल्यात तिनं.”

मुले, “ होय, खरं हाय.”

इतक्यात उमाचा भाऊ तिथे ओरडत पळत आला. धापा टाकत

भाऊ सुशांत, “ उमाक्का , उमाक्का”

महादू, “ काय झालं रे एवढं पळायाला. कुत्रा माग लागलाय का?”

सुशांत, “ उमाक्काला आईनं बोलावलय. अर्जंट काम हाय.”

शिरपा, “ शकुंतला काकीनी बोलावलंय म्हणजे झालं. वाड्यावर बातमी पोचली वाटत.”

उमा कावरी बावरी झाली.

महादू, “ वेळ आली तर मी सांगतो. मी मारली इटी म्हणून.”

शिरपा, “ पण त्याने विटी मारताना पाहिलंय ना तिला?”

महादेव, “ बघू चल काय झालंय ते, सगळ्या खेळाचा सत्यानाश झाला.”

तोपर्यंत आणखी एक मुलगा धावत आला.

मुलगा, “ ताई, ताई चल बोलावलंय तुला.”

 उमा लगेच घरला निघाली. पाठीमागून मुले चालली. वाटेत त्यांना तिने थांबायला सांगितलं. तरी देखील ते तिच्यामागे निघाले. दबक्या पावलांनी उमा परस दाराने ती आत घरात आली. मुले थोड्या अंतरावर उभा राहिली. शकुंतलाने त्यांना स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून पाहिले.

शकुंतला, “आली वानर टोळी.”

 दरवाजाजवळ जात उमास..

 शकुंतला, “ झालं उंदरा सारखं उंडारुन, मग हात पाय धू. अन् नेस ती साडी.”

शकुंतला मुकाटपणे साडी उचलून. व आतील दालनात गेली. मुले तिथे येऊ लागल्यावर.

शकुंतला, “ थांबा तिथंच, तुमच काय काम, बसा तिकडे ओट्यावर. नंतर बघते तुम्हाला.”

ती मुले शांतपणे ओट्यावर एकमेकाकडे पहात बसली. श्यामभट्ट व मधुकर पुजारी अन् मल्हारी वाड्यात पुढील दराने आले. आत येताना वाडा बारकाईने न्याहाळत मल्हारी आत आला.

क्रमशः पुढे........


गुरुवार, ७ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ११

 अस्तित्व पटकथा भाग ११ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


मल्हारी ( मनात) , “ खरंच, ती काळी असेल. असली तर. असूदे बघू.”

पाठीमागून धप्पा घालत मुले तिथे आली.

कार्तिक, “ काका , कसला विचार चाललाय?”

अवंतिका, “ कसला म्हणजे काकींचा, आणखी कोणाचा?”

येसाजी व तानाजी, “ काय खरंच.”

अवंतिका, “ मघाशी मी खांबा अडून ऐकलं, मघाशी मोठी आई, आजोबा अन् पुजारी काका बोलत होते.”

येसाजी, “ मग, ही तर आनंदाची बातमी आहे. त्यात काय झालं एवढं उदास व्हायला.”

अवंतिका, “ उदास होतील नाहीतर काय, मघाशी आई व लहान काकी बोलत होत्या. की कोळशाची खाण येणार आहे म्हणून.”

कार्तिक, “ म्हणजे, मी नाही समजलो.”

अवंतिका, “ अरे, वेडा रे वेडा, एवढं समजत नाही, काकी काळी आहे ना, म्हणून टोमणा मारत होत्या, काकांना.”

कार्तिक, “ काळी असली म्हणून काय झालं.”

येसाजी, “ गुण चांगले असले म्हणजे झालं.”

अवंतिका, “ पण मला माहितीये काकी कशी आहे ते.”

काका, “ काय, सांग कशी आहे ते.”

 अवंतिका, “मग मला काय देशील.”

काका, “ तुला लॉलीपॉप देईन.”

अवंतिका, “ नको.”

काका, “ यात्रेत छानशी पर्स देईन.”

अवंतिका, “नको.”

काका, “मग, काय हवे? ”

अवंतिका, “ मला बुलेट वरून संपूर्ण गावाची सफर करुन आणायची”

मल्हारी, “चालेल, सांग.”

अवंतिका, “मी पाहिलं मोठी आई आजोबांना सांगताना डावा डोळा तिने बारीक करुन इशारा केला.”

मल्हारी, “ ही काय बातमी झाली, मला वाटलं तू फोटो पाहिला असशील.”

येसाजी, “ काका, एवढं कळत नाही का? काकी व आईला बेसावध ठेवण्यासाठी तुझी बायको काळी आहे म्हणून सांगितलं असणार.”

तानाजी, “हे मात्र अगदी बरोबर आहे. मागे एकदा स्थळ आलेलं होतं. तेव्हा स्थळाचा फोटो पाहिल्यावर आई घरात आदळ आपट करीत होती.”

कार्तिक, “ माझा विश्वास आहे. मोठी आई, चुकीचा निर्णय घेणार नाही.”

येसाजी, “ आता जाणारच आहेस ना, मुलगी पहायला. मग समजेलच की. दूधाच दूध व पाण्याचं पाणी होईल.

मल्हारी, “ अस असेल तर तुझ्या तोंडांत साखर पडो.”

 कार्तिक, “ काय फक्त साखरंच. लाडू नाही.”

 मल्हारी, “ अखंड डब्बा घे.”

 मुले नाचू लागली.

…… ……. …

मुलगी पहायला जाताना मल्हारी आपला मेकअप करताना.

सरू, “ काय धाकलं मालक, आज लई आरशात बघताय.”

मल्हारी, ( हसत) : मग काय केस विंचरत असताना फरशीकडे बघू.”

सरू, “ तस नाही, रोजच्यापेक्षा जास्त पाहताय म्हणून म्हंटल. “

मल्हारी, “सरू इकडे ये.”

सरू पाण्याची घागर काखेत घेऊन जवळ येत.

सरू, “बोला, काय सेवा करू, नवरदेवाची.”

मल्हारी, “ नवरदेव म्हणू नको ग, उगाच चिडवतेस अजून कशात काय नाही.”

सरू, “ नाही कसं, मोठ्या बाई साहेबांनी स्थळ पाहिलंय म्हंटल्यावर पक्क झालं म्हणायचं.”

मल्हारी , “ बरं, ते राहू दे, मला सांग कसा दिसतोय मी?”

सरू, “ खरं सांगू, लई झ्याक दिसताय.”

आतून मोठी वाहिनी दुसऱ्या खोलीत जाताना

पार्वती, “ दिसून काय करायचं, येणारी तर काळतोंडीच आहे ना. तिला काय नवरा गोरा की काळा, कसलापण चालेल. मी काढलेलं स्थळ नको झालं. शेवटी आईच्या सांगण्याने डोलणाऱ्या नंदी बैलाच्या गळ्यात कोळसाच पडणार?”

सरू, ( हळू आवाजात) पुजारी काकांनी स्थळ काढलंय व मोठ्या बाईसाहेबांनी सांगितलय म्हणजे मुलगी चांगलीच असणार. तुम्ही जावा घोड्यावर बसून.”

मल्हारी, “ तसं जर झालं, तर मी पार्टी देईन सगळ्यांना.”

( तेवढ्यात तिथे मुले लपत छापत आली.)

येसाजी, “काय, झाली का तयारी.”

मल्हारी, “ कसा दिसतो मी?”

येसाजी, “ मस्त दिसतोस पण ती टोपी…”

मल्हारी, “ काय झालं, चांगली दिसत नाही का?”

( टोपी काढून केसांवर कंगवा फिरवत.)

 कार्तिक, “ हा, आता मस्त दिसताय.”

अवंतिका, “ काका नवरी पहायला कशातून जाणार रथातून की घोड्यावरून.”

 वासवी, “ अस काय म्हणतेस, बाहेर बघितली नाहीस का?”

तानाजी, “काय?”

वासवी, “ काळी घोडी उभा आहे ते.”

कार्तिक, “ कुठे आहे? मला दिसली नाही.”

येसाजी, “ अरे वेड्या, काळी घोडी म्हणजे बुलेट रे.”

कार्तिक हसू लागला.

वासवी, “ हसायला काय झालं.”

 कार्तिक, “ बुलेट ठीक आहे. पण पुजारी काकांना नीट न्या म्हणजे झालं. नाहीतर हाड खिळखिळी करशीला.”

सर्व हसू लागले.

……….

पुजारी काका आले. अंगणात सरू वाळवण घालत होती. लक्ष्मीबाई व सदाशिवराव बोलत बसले होते. पुजारी काकांना पाहून.

लक्ष्मीबाई, “ या बसा बुवा.”

लक्ष्मीबाई, ( सरू) “ सरू ते काम ठेव. व मल्हारीस जाऊन सांग त्या आरशात पाहत बसू नकोस म्हणावं. जसा आहेस तसा पसंत होशील आटप म्हणावं. अन् त्या महाराणींनी चहा केला असेलं तर घेऊन ये. त्यांना काय, बाहेर कोण आलंय, गेलंय याचं काही नाही. बसल्या असतील खादडत. कधी सुधारतील देव जाणे.

सरला आत गेली. मल्हारीस

सरला, “ ओ साहेब, आवरा लवकर मुराळी आलाय बाहेर. “

मल्हारी आपले आवरून बाहेर आला. बाहेरील लक्ष्मीबाईंचा आवाज ऐकून दचकलेल्या सुना एकमेकीला.

पार्वती, “म्हातारीला आतलं कसं कळतं देव जाणे. “

सरला, “ कसं म्हणजे त्रिकालज्ञानी आहेत त्या. अन् हो तुमच्या गवती चहाचा वास सगळीकडे पसरला आहे.”

सरस्वती, “ घे, बाई घेऊन जा.”

 सरला चहाचा ट्रे घेऊन आली.

सरला, “ मालकीण घ्या चहा.”

लक्ष्मीबाई, “ मला नको, पुजारी काका व मल्हारीस दे. अन् हो माझ्या खोलीत पलंगावर एक पिशवी आहे ती घेऊन ये.”

सरला , “जी.”

(तिने चहा दिला.)

लक्ष्मीबाई, “ वासवी ए वासवी.”

वासवी, “ काय मोठी आई.”

लक्ष्मीबाई, “ हे बघ, जेवण खोलीत जा. व एका वाटीतून दही साखर घेऊन ये. त्या मांजरिणीच्या तडाख्यातून राहिले असेल तर.”

इतक्यात मल्हारी सर्वांच्या पाया पडला. शिवण्णाच्या ही पाया पडला.

शिवण्णाने आशीर्वाद दिला.

शिवण्णा, “ आयुष्यमान भव.”

मल्हारी, “ चला बुवा.”

लक्ष्मीबाई, “ चला कुठं, थांब एक मिनिट.”

लक्ष्मीबाई, “ सरू ये सरू, सापडली नाही का पिशवी.”

सरू, “ हा सापडली, आले आले.”

लक्ष्मीबाई, “ वासवी ते वासवी.”

वासवी, “ आले, आले.”

वासवी दही साखर घेऊन जेवण खोलीतून जाताना.

सरस्वती, “ बघूया, कुठली अप्सरा आणतात ते.”

पार्वती, “ आमच्या पेक्षा डावीच मिळणार.”

वासवी, “ तुम्ही काही पण म्हणा, पण काकांचं लग्न झालं की तुमची काही धडगत नाही.”

पार्वती, “ कारटे, आजीची चोमडी कुठली?’

वासावी बाहेर आली. दही साखर पुजारी व मल्हारी काकांच्या हातावर दिले. ते प्राशन त्यांनी केले . इतक्यात सरू आली. तिने पिशवी दिली. पुजारी बुवांनी चहाचा कप सरुच्या हातात देवून मल्हारीच्या गाडीवर बसले. ते दोघे निघाले.

…… …,. ……..


क्रमशः पुढे ......