रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

वीरगळ भाग ५

वीरगळ भाग ५

 Day / evening / Mumbai City / chaupati

(आजोबा गाडी पार्क करतात. )

अश्विन :

आजोबा, इथे कशाला थांबलोय?

आजोबा :

 चल इथे थोडं चहा पाणी करू.

अश्विन :

 चला घरी, नकोय मला, उघड्यावरच खाऊ नका असे आई म्हणते.

आजोबा :

 ये गप्प, उगाच ट्याव ट्याव करू नको. उतर खाली, तुझ्या या नाजुकते मुळेच तुझं असं शोकेशच बावल झालेय. गप चल तिथे, झाडाखाली बाकावर गुपचुप बस. मला शिकवतोय.

( अश्विन शांतपणे तिथे बाकावर जाऊन बसतो. आजोबा मिसळ पाव घेऊन येतात. पुढ्यात ठेवत.)

आजोबा :

घे सुरु कर.

अश्विन :

नको मला, माझा घसा दुखेल. तब्येत बिघडेल माझी.

आजोबा :

 गप खा, म्हणे तब्येत बिघडेल , मला तुझ्यापेक्षा ती मुलेच जास्त स्ट्राँग वाटलीत.

अश्विन :

 उगाच काहीपण बोलू नका, मी फुटबॉल चॅम्पियन आहे.

आजोबा :

 ते दिसतंय मला, उगाच मोठ्या वल्गना करू नकोस.

चॅम्पियन म्हणे, पायावर ठीक उभारता तरी येतं का?

आज पाहिलेय शाळेत एखाद्या भिजलेल्या उंदरासारखा उभा होतास.

( अश्विन रडू लागतो. )

 आजोबा :

 हेच वागणं पसंत नाही मला, त्या जयाला सांगितलं की गावाकडे ठेव म्हणून, ऐकतो कुठे माझं? म्हणे अँडव्हान्स शिक्षण देतो. हे तुझं अँडव्हान्स शिक्षण होय. माझ्याकडे बघ जरा मी कसा स्ट्राँग आहे. अरे मी या वयात एवढा फिट्ट आहे. तू बघ तुझ्या स्वतःकडे

( अश्विन स्वतःकडे पहातो. नंतर आजोबांकडे पाहतो. )

 आजोबा :

 मी एवढी फौजेची नोकरी केली. प्रसंगी झाडाची पाने पण खाल्ली, कीडे मकोडे देखील खायची पाळी आली. कुठलं ही पाणी प्यायलो. काय झालं, आहे ना ठणठणीत, तू बघ तुझ्या स्वतःकडे. काय तुझी हालत झालेय बघ जरा. स्ट्राँग व्हायचं असेल तर निसर्गात जगायला शिक,

अश्विन :

 पण आईला कळलं तर.

आजोबा :

 कळेलच कसं, तू सांगितल्याशिवाय. माझ्या काय तोंडाला कुलूपच, अन् एवढे लोक खात आहेत. त्यांना नसेल का स्वतःची काळजी?

( अश्विन एक स्माइल करतो. व मिसळ खाऊ लागतो. )

Cut to …..

... …. …. …..

Next day / morning / 6’o’clock inter

मोबाईल गजर वाजतो. आजोबा उठतात. अश्विनच्या रूममध्ये येतात. अश्विन झोपलेला असतो.

आजोबा :

 अश्विन ये अश्विन

( अश्विन डोळे चोळत उठतो. )

 आजोबा :

 चल पार्क मध्ये.

अश्विन पण आजोबा.

आजोबा :

 अरे सकाळच्या ताज्या हवेत फिरलं की बर वाटेल तुला.

( अश्विन उठतो. )

Cut to. …..

…… …… …….

Morning / ६.३० o’ CLOCK /outer / Park

अश्विन एका पार्क मध्ये एका बाकड्यावर बसलेला आहे. आजोबा एक रपेट मारून येतात. व त्याजवळ बसतात.

आजोबा :

 बोल, कसं वाटतंय.

अश्विन :

 मस्त, एकदम फ्रेश

आजोबा :

 तू रोज का येत नाहीस?

अश्विन :

 कोणासोबत येणार?

 आजोबा :

बाबांसोबत तुझ्या.

अश्विन :

 ते तर कामावरून उशिरा येतात. व सकाळी आठ नंतर उठतात. त्यासोबत काय नऊ वाजता येऊ?

आजोबा :

 मग मित्रांसोबत का येत नाहीस?

अश्विन :

 मग झालं, हे काय गाव नाही, हाक मारले की सारे गोळा व्हायला.

आजोबा :

 काय खरं नाही बुवा तुझं!

अश्विन :

 अस काही म्हणू नका ना, तुम्हीच काहीतरी सुचवा की.

आजोबा :

 बर, सुट्टी कधी पडणार तुला?

अश्विन :

 मे महिन्यात.

आजोबा :

 सुट्टी लागली रे लागली की ये माझ्याकडे गावी, बघ तुला कसा रफ आणि टफ बनवतो ते.

अश्विन :

 आता नेणार नाही.

आजोबा :

 तुझी शाळा आहे ना,

अश्विन :

 मला तिथे जाऊस वाटत नाही.

आजोबा :

 का?

अश्विन :

 मला ती मुले पुन्हा मारतील. त्या दिवशी सुदैवाने वाचलो.

आजोबा :

 अरे, पण अस घाबरून कस चालेल. व आता अर्ध वर्ष आहे अजून, असा आधी मधी दाखला काढणं म्हणजे तुझं नुकसान नाही का होणार?

अश्विन :

 मरण्यापेक्षा ते नुकसान झालेल बरं

आजोबा :

 म्हणजे तू ही त्या मंगेश सारखं हार मानून पलायन करणार तर?

 अश्विन :

 प्रतिकूल प्रसंग असल्यावर माघार घेण्यातच शहाणपणा नाही का?

आजोबा :

 लढायच्या आधीच हार मानलीस म्हण.

अश्विन :

 जर ते तिघे एक एकटे आले असते. तर गोष्ट निराळी होती, पण ते एखाद्या तरसा सारखं टोळी करून आल्यावर एकट्याचे काय चालणार? बोला

आजोबा :

 समस्या गंभीर आहे, विचार करून मार्ग काढायला हवा.

बर चल घरी, काढू काहीतरी मार्ग.

( ते निघतात. अश्विन लंगडत चालत आहे.)

Cut to ….

….. ….. …… …

Day / afternoon / inter / dayning holl Ashvin HOME Mumbai

( गंभीर वातावरण, सर्वजण आजोबा, जयवंत, माधवी जेवत आहेत. अश्विन आपल्या रूममध्ये आहे. )

 तात्या आजोबा :

 मला वाटत, यावर काहीतरी उपाय करायला हवा.

जयवंत :

 आपण पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर.

 तात्या आजोबा :

 त्याने काय होईल, त्या मुलांचे नुकसानच ना, व आपला मुलगा कधी स्ट्राँग होणार?

 माधवी :

 मला तरी काही सुचत नाही.

तात्या आजोबा :

 हे चार - पाच महिने त्याला सुरक्षित सोडणे व आणण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

जयवंत :

 मी केलं असतं, पण माझं ऑफीस टायमिंग व अंतर पाहता ते अशक्य आहे. मी जाताना सोडू शकतो. येताना कस करायचं?

तू का नाही जात.

माधवी :

 माझं आवरुन जायला. मला खूप वेळ लागेल. तोपर्यंत.

जयवंत :

समीरला सांग की. त्याची बदली इथेच झालेय ना?

माधवी :

 नको, त्याला नको, उगाच आयुष्यभर टोमणे कोण खाणार त्याच्या बायकोचे?

तात्या आजोबा :

 हा आहे एक माझ्या ओळखीचा गावातील एक पोलिस इथेच असतो. तो आणेल ना रोज सांगतो मी.

जयवंत :

 कोण काशिनाथ,

 तात्या आजोबा :

 हा, काशिनाथ.

जयवंत :

 हा त्याला जमेल. आणेल तो.

Cut to .

…… ….. ….. ……


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा